कालच कळले फेसबुकने रंगीत पार्श्वभूमी ची सोय केली. गंमतच वाटली.
एक कोड नेहमीच पडतं की तंत्रज्ञान भारी की मानवी सर्जकता ??
कधी कधी वाटतं तंत्रज्ञानच अमर्याद असू दे.
आयुष्यात मनाजोगे रंग निसर्गत: मिळावेतच. पण नाही कधी मिळाले तर तंत्रज्ञानाने हवे ते रंग भरून घेता यावेत.
नको ते प्रसंग ,नको त्या आठवणी ,नको ती पार्श्वभूमी हवी तशी बदलण्याची सोय असावी.
मग पुन्हा विचार येतो की सगळेच बदलायला लागले तर खरे काय ??
स्थिर काय??
ध्रुव काय??
अढळ काय ??
सारे क्षणिक ,मनमर्जीचे , म्हणजे कृत्रिमच.
त्यात उत्कंठा ,उत्सुक्ता ,आव्हान ,निराशेतून येणारे गंभीर भाव कसे लाभतील ?
जाऊ दे . जे जसे आहे तसेच उत्तम.
माझ्यासारख्या तंत्र-आळशींना तर बरेच बरे सारे.
No comments:
Post a Comment