Thursday, January 12, 2017

कुणी कुणाचे नाही

कुणी कुणाचे नाही .........

कुणी कुणाचे नाही
       येथ रे
कुणी कुणाचे नाही।धृ।।

जोवर होता वृक्ष बहरला ,
पक्षी गाती गाणी।
दुष्काळी तो एकाकी तरु
 गातो विराणी ।।१।।

निळसर पाणी तुडुंब जलाशय,
जीवा संजीवनी।
पाणी आटता किंवा दूषिता,
गटारगंगा म्हणी ।।२।।

दुग्धदायिनी सवत्स धेनु ,
गोमाता हो जनी।
बाखड होता जराग्रस्त ती
 कत्तलखान्या गणी ।।३।।

पैसा सत्ता संपत्तीमुळे,
मानव श्रेष्ठ म्हणी ।
परिस्थितीचा नूर पलटता
 काय तया मोजणी ।।४।।

नात्यांमधले गोड गोडवे
संधी अनुलक्षुनी ।
पिळ पडता प्रतिकूलतेचे
 कोण कुणाला सही ।।५।

येताना एकाकी आलो
 रमलो या जीवनी।
परत पुन्हा एकाकी परतण्या
 विषाद कां रे मनी।।६।


3 comments:

  1. Khup chan manala bhawali hi rachana

    ReplyDelete
  2. truth of life.......


    म्हणुनी म्हणती आचार्य शंकर करावे केशव कीर्तन !
    कृष्ण हेची शाश्वत सुख बाकी सारे कालभंगुर !!

    ReplyDelete
  3. truth of life.......


    म्हणुनी म्हणती आचार्य शंकर करावे केशव कीर्तन !
    कृष्ण हेची शाश्वत सुख बाकी सारे कालभंगुर !!

    ReplyDelete