16.11.2016
शब्द चिंतन........
चिंता ,काळजी ,फिकीर ,वरी
एकाच अर्थाचे शब्द आहेत वेगवेगळ्या भाषेतील?? होय ना ? असे वाटते पण अर्थच्छटा वेगळ्याच आहेत.
चिंता म्हणजेच काळजी असे समजतात साधरणपणे.
काळजी पूर्णपणे मराठमोळा शब्द.
त्याचा बाजच वेगळा.काजळी नि काळजी सारखी अक्षरे पण भिन्न क्रम.
परिणामही भिन्न.अर्थ तर वेगळाच.
दिव्याचा प्रकाश न पोहचता जो धूर (न दिसताही) जमा होतो त्याची काजळी तयार होते. ती काळी असते.
जेव्हा विचार कृतीत उतरत नाही फक्त डोक्याला कुरतडतो तेव्हा काळजी लागते.
काजळीने सभोवतालचा पटल/पृष्ठभाग काळवंडतो तर काळजीने मुख(कमल /चंद्र)पटल काळवंडतो.
चिंता पण घोर लावते. चिंता >चिंतन>चिंतणे>चित्त यांचा सहसंबंध आहे कां ?? नक्कीच.
चिंत् या मूळधातूची ही विविध रूपं..................चिंता मनात ढवळाढवळ करते पण.........
त्यातून बाहेर पडण्याचे साधक-बाधक उपाय सुचवते. आपल्या अनुभवातून ते सफ़ल वा विफल ठरतात.हा चिंतेचा विषयच नाही ,नशिबाचा म्हटल्या जातो समाजात.
फिकीर हा फार्सी शब्दाचे मराठीकरण आहे .फ़िकर चे फिकीर झाले.म्हणून जिवाचा गुंता कमी झाला नाही.
डोन्टवरी हा परवलीचा शब्द झालाय आजकालच्या मराठीत ,थ्यँक्यू सारखा. नुसता वरी वापरायचा नाही. वरवरच वापरायचा...
शब्द काहीही योजा ....परिणाम मात्र स्वत:ला अपेक्षित ठेवा म्हणजे झाले.
मन काळवंडू नये इतकी दक्षता घ्याच.
©डॉ.प्रज्ञा देशपांडे.
शब्द चिंतन........
चिंता ,काळजी ,फिकीर ,वरी
एकाच अर्थाचे शब्द आहेत वेगवेगळ्या भाषेतील?? होय ना ? असे वाटते पण अर्थच्छटा वेगळ्याच आहेत.
चिंता म्हणजेच काळजी असे समजतात साधरणपणे.
काळजी पूर्णपणे मराठमोळा शब्द.
त्याचा बाजच वेगळा.काजळी नि काळजी सारखी अक्षरे पण भिन्न क्रम.
परिणामही भिन्न.अर्थ तर वेगळाच.
दिव्याचा प्रकाश न पोहचता जो धूर (न दिसताही) जमा होतो त्याची काजळी तयार होते. ती काळी असते.
जेव्हा विचार कृतीत उतरत नाही फक्त डोक्याला कुरतडतो तेव्हा काळजी लागते.
काजळीने सभोवतालचा पटल/पृष्ठभाग काळवंडतो तर काळजीने मुख(कमल /चंद्र)पटल काळवंडतो.
चिंता पण घोर लावते. चिंता >चिंतन>चिंतणे>चित्त यांचा सहसंबंध आहे कां ?? नक्कीच.
चिंत् या मूळधातूची ही विविध रूपं..................चिंता मनात ढवळाढवळ करते पण.........
त्यातून बाहेर पडण्याचे साधक-बाधक उपाय सुचवते. आपल्या अनुभवातून ते सफ़ल वा विफल ठरतात.हा चिंतेचा विषयच नाही ,नशिबाचा म्हटल्या जातो समाजात.
फिकीर हा फार्सी शब्दाचे मराठीकरण आहे .फ़िकर चे फिकीर झाले.म्हणून जिवाचा गुंता कमी झाला नाही.
डोन्टवरी हा परवलीचा शब्द झालाय आजकालच्या मराठीत ,थ्यँक्यू सारखा. नुसता वरी वापरायचा नाही. वरवरच वापरायचा...
शब्द काहीही योजा ....परिणाम मात्र स्वत:ला अपेक्षित ठेवा म्हणजे झाले.
मन काळवंडू नये इतकी दक्षता घ्याच.
©डॉ.प्रज्ञा देशपांडे.
Very nice!!
ReplyDeleteएकदम मस्त ����
ReplyDeleteawesome ..gd pradhnya
ReplyDelete