कुणी कुणाचे नाही .........
कुणी कुणाचे नाही
येथ रे
कुणी कुणाचे नाही।धृ।।
जोवर होता वृक्ष बहरला ,
पक्षी गाती गाणी।
दुष्काळी तो एकाकी तरु
गातो विराणी ।।१।।
निळसर पाणी तुडुंब जलाशय,
जीवा संजीवनी।
पाणी आटता किंवा दूषिता,
गटारगंगा म्हणी ।।२।।
दुग्धदायिनी सवत्स धेनु ,
गोमाता हो जनी।
बाखड होता जराग्रस्त ती
कत्तलखान्या गणी ।।३।।
पैसा सत्ता संपत्तीमुळे,
मानव श्रेष्ठ म्हणी ।
परिस्थितीचा नूर पलटता
काय तया मोजणी ।।४।।
नात्यांमधले गोड गोडवे
संधी अनुलक्षुनी ।
पिळ पडता प्रतिकूलतेचे
कोण कुणाला सही ।।५।
येताना एकाकी आलो
रमलो या जीवनी।
परत पुन्हा एकाकी परतण्या
विषाद कां रे मनी।।६।
कुणी कुणाचे नाही
येथ रे
कुणी कुणाचे नाही।धृ।।
जोवर होता वृक्ष बहरला ,
पक्षी गाती गाणी।
दुष्काळी तो एकाकी तरु
गातो विराणी ।।१।।
निळसर पाणी तुडुंब जलाशय,
जीवा संजीवनी।
पाणी आटता किंवा दूषिता,
गटारगंगा म्हणी ।।२।।
दुग्धदायिनी सवत्स धेनु ,
गोमाता हो जनी।
बाखड होता जराग्रस्त ती
कत्तलखान्या गणी ।।३।।
पैसा सत्ता संपत्तीमुळे,
मानव श्रेष्ठ म्हणी ।
परिस्थितीचा नूर पलटता
काय तया मोजणी ।।४।।
नात्यांमधले गोड गोडवे
संधी अनुलक्षुनी ।
पिळ पडता प्रतिकूलतेचे
कोण कुणाला सही ।।५।
येताना एकाकी आलो
रमलो या जीवनी।
परत पुन्हा एकाकी परतण्या
विषाद कां रे मनी।।६।
Khup chan manala bhawali hi rachana
ReplyDeletetruth of life.......
ReplyDeleteम्हणुनी म्हणती आचार्य शंकर करावे केशव कीर्तन !
कृष्ण हेची शाश्वत सुख बाकी सारे कालभंगुर !!
truth of life.......
ReplyDeleteम्हणुनी म्हणती आचार्य शंकर करावे केशव कीर्तन !
कृष्ण हेची शाश्वत सुख बाकी सारे कालभंगुर !!