प्रत्येकाचे असते त्याचे त्याचे आकाश।
ज्याच्या त्याच्या परी तेच असते खास।।१।।
वास्तवाचे चटके ज्याचे त्याला जाळी।
आपलेच भोग जणु आपल्याच भाळी।।२।।
डोंगरभर कष्ट आणि ऊरभर आशा।
ज्याने त्याने सांभाळावा आपलाच गाशा।।३।।
प्रत्येकाच्या डोळ्यात असते गोड स्वप्न।
रक्ताचेही पाणी करून त्याला नीट जपणं।।४।।
वास्तवात झेपत नाही स्वप्नामधली बात ।
तेव्हा घेतो प्रत्येक जण आकाशाची साथ।।५।।
प्रत्येकच्या आकाशात असतात खुप कप्पे।
त्यात अधिक भर टाकतात आयुष्यातील टप्पे।।६।।
आयुष्य म्हणजे चढउतार ।
आकाश कायम नितळ अपार।।७।।
आयुष्याला घेरतात कधी निराशेचे क्षण।
आकाशातील स्वप्नचांदणं उजळून टाकतात मन ।।८॥
प्रत्येकाला असावे असे खास आकाश।
ज्याने त्याने व्हावा स्वत:चाच प्रकाश।।९।।
२८/७/२०१६ प्रज्ञा देशपांडे
ज्याच्या त्याच्या परी तेच असते खास।।१।।
वास्तवाचे चटके ज्याचे त्याला जाळी।
आपलेच भोग जणु आपल्याच भाळी।।२।।
डोंगरभर कष्ट आणि ऊरभर आशा।
ज्याने त्याने सांभाळावा आपलाच गाशा।।३।।
प्रत्येकाच्या डोळ्यात असते गोड स्वप्न।
रक्ताचेही पाणी करून त्याला नीट जपणं।।४।।
वास्तवात झेपत नाही स्वप्नामधली बात ।
तेव्हा घेतो प्रत्येक जण आकाशाची साथ।।५।।
प्रत्येकच्या आकाशात असतात खुप कप्पे।
त्यात अधिक भर टाकतात आयुष्यातील टप्पे।।६।।
आयुष्य म्हणजे चढउतार ।
आकाश कायम नितळ अपार।।७।।
आयुष्याला घेरतात कधी निराशेचे क्षण।
आकाशातील स्वप्नचांदणं उजळून टाकतात मन ।।८॥
प्रत्येकाला असावे असे खास आकाश।
ज्याने त्याने व्हावा स्वत:चाच प्रकाश।।९।।
२८/७/२०१६ प्रज्ञा देशपांडे
मस्तच!!
ReplyDeleteमाई जीवनाच्या वास्तविकतेचे उत्कट दर्शन आपल्या कवितेतून दिसते
ReplyDeleteमॅडम खुप सुंदर कविता.
ReplyDeleteसध्या अज्ञान करतयं जगाचा सर्वनाश।
त्यातुन तरायला लागेलच प्रज्ञेचा प्रकाश।।
छान 👌💐
ReplyDeleteसागर ,गुणसागर ,ज्ञानसागर......
ReplyDelete