#चिंतन.
भाषा . अभिव्यक्तीचे साधन. व्यक्तिमत्त्वाचे अविभाज्य अंग. भाषा ही प्रवाही , कालौघानुसार परिवर्तनशील असते. काळ-समाज-व्यवसायावरून भाषेत अंतर पडते.
भाषेचे मूळ अक्षरे आहेत. अक्षरांपासून शब्द तयार होतात. शब्दांचे वाक्य. वाक्यातून साहित्य. वाक्यातून व्यवहार. व्यवहार नि साहित्य दोन्ही ही भाषेला समृद्ध करतात.
जगात अनेक भाषा आहेत. प्रत्येक भाषेचे स्वत:चे वैशिष्ट्य असतेच.भाषांच्या अभ्यासाला भाषाविज्ञान म्हणतात. भाषाविज्ञान ही पाश्चात्यांची देण आहे ,यात दुमत नाही.
भाषाविज्ञानात ध्वनि ,रूप आदिंचा विचार केल्या जातो.विविध भाषांची समानस्थळे , विभिन्नता ,वैशिष्ट्य ,वैविध्य यांचा व्यवस्थित ,रितसर अभ्यास करण्याचे हे शास्त्र होय. भाषाविज्ञानाने मानवी दृष्टिकोण विशाल होण्यास मदत होते. तसे बघता हे शास्त्र बरेच अलीकडचे आहे.
भारतीय ज्ञानपरंपरा अतिशय प्राचीन आहे. वेद व वेदवाङ्मय हे भारतीय ज्ञानाचे मूळ स्रोत आहेत.
वेद चार भागात विभागले आहेत. चारही वेद पाठ असलेले चतुर्वेदी . तीन वेद पाठ असलेले त्रिवेदी ,दोन वेद पाठ असलेले द्विवेदी.
आज ही केवळ अडनावे आहेत. वेद शिकण्यासाठी जे सहायीभूत विषय आहेत त्यांना वेदांगे असे म्हणतात.
वेदांगे सहा आहेत.वेदांगात जो निष्णात तो मिश्र.
मिश्र ही पदवी होती प्राचीन काळी ,आज अडनाव आहे. वेदांगे पुढील प्रमाणे.
शिक्षा =उच्चारण शास्त्र
कल्प = यज्ञ मांडणी करण्यासाठी मोजमाप
छंद = वृत्त ,पद्य लयीत व सुरात म्हणण्यासाठी रचनाशास्त्र
ज्योतिष = काळ-वेळ ,ग्रह-तारे , भूगोल-खगोल ,यांचे गणित ज्यांच्या योग्य मेळातून यज्ञ निर्विघ्न व्हावा.
व्याकरण = शब्दानुशासन . शब्दांचे नियमन ,संयोजन , आयोजन ज्यात केले जाते. ते व्याकरण.
निरुक्त = शब्दव्युत्पत्ती शास्त्र.निरुक्त म्हणजे सोप्या भाषेत प्राचीन भाषाविज्ञान . निरुक्ताचे रचनाकार यास्काचार्य होय.
ज्योतिष व व्याकरण तसे जनसामान्यांनाही माहित असलेले विषय.
मात्र निरुक्त तितके माहित नसते. खरं तर दैनंदिन जीवनात जे शब्द वापरतो त्यांचे मूळ शोधणे हा रंजक विषय होय. वेदांमधील शब्दांचे समानार्थी कोष निघंटू नावाने अोळखल्या जातो. हा जगातील प्राचीनतम कोश होय.
निरुक्त हा विषय मोठा रंजक आहे.
त्यात शब्द कसे तयार झाले ते उलगडून सांगितले आहे. वेदांगांवर सविस्तर लिहायला हवेच .या लेखात जस्ट ट्रेलर!
काही शब्दांची व्युत्पत्ती पाहू.
शाखा = ख म्हणजे आकाश नि श म्हणजे झोपणारे. आकाशात झोपतात त्या म्हणून त्यांना शाखा म्हणतात.
हस्त = कोणावर उगारायला वा कोणापासून वाचायला जो आड येतो तो हात.
छात्र = गुरुचे दोष जो झाकून नेतो तो छात्र.
पुत्र = पुम् नामक नरकातून पितरांना वाचवतो ,तो पुत्र.
अन्य =न आनेय इति परक्याला आणू नये या अर्थाने मूळ शब्द आता अन्य ,दुसरा ,परका या अर्थाने रूढ आहे.
कर्ण = कृन्त् नावाच्या मूळ धातू पासून तयअर झालेला हा शब्द. कानाचे द्वार कापलेले असते म्हणून.
अक्षी = डोळे या अर्थी असलेला हा शब्द.चक्ष् या पाहणे अर्थी धातूपासून तयार झाला आहे.अजून एका मता नुसार हा शब्द अञ्ज् लेपणे या अर्थाच्या धातूपासून तयार झालाय कारण डोळा प्रकाशाने वस्तूला लेपतो मगच ती दिसते.
हृद = हृद् ,आवाज करणे या अर्थी असलेल्या धातूपासून तयार झालेला शब्द . याचा अर्थ मोठी विहीर हा होतो.
चित्त = चित् विचार करणे या अर्थी असलेल्या धातूपासूनथयार झालाय हा शब्द. चित्त नेहमी विचार करते.
आदित्य = किरणांच्या द्वारे जो पृथ्वीवरील रस शोषून घेतो तो आदित्य.
राजा = राज् ,सत्ता गाजवणे या अर्थी असलेल्या धातूपासून हा शब्द तयार झाला.
सेना = स+इन . जिला स्वामी ,नेता आहे ती. किवा जी समान गतीने चालते ती.
असे अनेक शब्दांची व्युत्पत्ती निरुक्तात सांगितली आहे. एकूणच निरुक्त वाचणे म्हणजे भाषिक प्रगल्भता प्राप्त करणे होय.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
भाषा . अभिव्यक्तीचे साधन. व्यक्तिमत्त्वाचे अविभाज्य अंग. भाषा ही प्रवाही , कालौघानुसार परिवर्तनशील असते. काळ-समाज-व्यवसायावरून भाषेत अंतर पडते.
भाषेचे मूळ अक्षरे आहेत. अक्षरांपासून शब्द तयार होतात. शब्दांचे वाक्य. वाक्यातून साहित्य. वाक्यातून व्यवहार. व्यवहार नि साहित्य दोन्ही ही भाषेला समृद्ध करतात.
जगात अनेक भाषा आहेत. प्रत्येक भाषेचे स्वत:चे वैशिष्ट्य असतेच.भाषांच्या अभ्यासाला भाषाविज्ञान म्हणतात. भाषाविज्ञान ही पाश्चात्यांची देण आहे ,यात दुमत नाही.
भाषाविज्ञानात ध्वनि ,रूप आदिंचा विचार केल्या जातो.विविध भाषांची समानस्थळे , विभिन्नता ,वैशिष्ट्य ,वैविध्य यांचा व्यवस्थित ,रितसर अभ्यास करण्याचे हे शास्त्र होय. भाषाविज्ञानाने मानवी दृष्टिकोण विशाल होण्यास मदत होते. तसे बघता हे शास्त्र बरेच अलीकडचे आहे.
भारतीय ज्ञानपरंपरा अतिशय प्राचीन आहे. वेद व वेदवाङ्मय हे भारतीय ज्ञानाचे मूळ स्रोत आहेत.
वेद चार भागात विभागले आहेत. चारही वेद पाठ असलेले चतुर्वेदी . तीन वेद पाठ असलेले त्रिवेदी ,दोन वेद पाठ असलेले द्विवेदी.
आज ही केवळ अडनावे आहेत. वेद शिकण्यासाठी जे सहायीभूत विषय आहेत त्यांना वेदांगे असे म्हणतात.
वेदांगे सहा आहेत.वेदांगात जो निष्णात तो मिश्र.
मिश्र ही पदवी होती प्राचीन काळी ,आज अडनाव आहे. वेदांगे पुढील प्रमाणे.
शिक्षा =उच्चारण शास्त्र
कल्प = यज्ञ मांडणी करण्यासाठी मोजमाप
छंद = वृत्त ,पद्य लयीत व सुरात म्हणण्यासाठी रचनाशास्त्र
ज्योतिष = काळ-वेळ ,ग्रह-तारे , भूगोल-खगोल ,यांचे गणित ज्यांच्या योग्य मेळातून यज्ञ निर्विघ्न व्हावा.
व्याकरण = शब्दानुशासन . शब्दांचे नियमन ,संयोजन , आयोजन ज्यात केले जाते. ते व्याकरण.
निरुक्त = शब्दव्युत्पत्ती शास्त्र.निरुक्त म्हणजे सोप्या भाषेत प्राचीन भाषाविज्ञान . निरुक्ताचे रचनाकार यास्काचार्य होय.
ज्योतिष व व्याकरण तसे जनसामान्यांनाही माहित असलेले विषय.
मात्र निरुक्त तितके माहित नसते. खरं तर दैनंदिन जीवनात जे शब्द वापरतो त्यांचे मूळ शोधणे हा रंजक विषय होय. वेदांमधील शब्दांचे समानार्थी कोष निघंटू नावाने अोळखल्या जातो. हा जगातील प्राचीनतम कोश होय.
निरुक्त हा विषय मोठा रंजक आहे.
त्यात शब्द कसे तयार झाले ते उलगडून सांगितले आहे. वेदांगांवर सविस्तर लिहायला हवेच .या लेखात जस्ट ट्रेलर!
काही शब्दांची व्युत्पत्ती पाहू.
शाखा = ख म्हणजे आकाश नि श म्हणजे झोपणारे. आकाशात झोपतात त्या म्हणून त्यांना शाखा म्हणतात.
हस्त = कोणावर उगारायला वा कोणापासून वाचायला जो आड येतो तो हात.
छात्र = गुरुचे दोष जो झाकून नेतो तो छात्र.
पुत्र = पुम् नामक नरकातून पितरांना वाचवतो ,तो पुत्र.
अन्य =न आनेय इति परक्याला आणू नये या अर्थाने मूळ शब्द आता अन्य ,दुसरा ,परका या अर्थाने रूढ आहे.
कर्ण = कृन्त् नावाच्या मूळ धातू पासून तयअर झालेला हा शब्द. कानाचे द्वार कापलेले असते म्हणून.
अक्षी = डोळे या अर्थी असलेला हा शब्द.चक्ष् या पाहणे अर्थी धातूपासून तयार झाला आहे.अजून एका मता नुसार हा शब्द अञ्ज् लेपणे या अर्थाच्या धातूपासून तयार झालाय कारण डोळा प्रकाशाने वस्तूला लेपतो मगच ती दिसते.
हृद = हृद् ,आवाज करणे या अर्थी असलेल्या धातूपासून तयार झालेला शब्द . याचा अर्थ मोठी विहीर हा होतो.
चित्त = चित् विचार करणे या अर्थी असलेल्या धातूपासूनथयार झालाय हा शब्द. चित्त नेहमी विचार करते.
आदित्य = किरणांच्या द्वारे जो पृथ्वीवरील रस शोषून घेतो तो आदित्य.
राजा = राज् ,सत्ता गाजवणे या अर्थी असलेल्या धातूपासून हा शब्द तयार झाला.
सेना = स+इन . जिला स्वामी ,नेता आहे ती. किवा जी समान गतीने चालते ती.
असे अनेक शब्दांची व्युत्पत्ती निरुक्तात सांगितली आहे. एकूणच निरुक्त वाचणे म्हणजे भाषिक प्रगल्भता प्राप्त करणे होय.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
No comments:
Post a Comment