किती बरे करावा मनापासून धावा?।
कधी पावशील सांग ना मला तू देवा ?।
श्रद्धेमध्ये खोट नाही ,नाही खंड तपात।
सातत्याने ध्यानीमनी मग्न मी जपात ॥
तुझेच काय चुकते जरा बघ बरं एकदा
किती काळ तिष्ठवशील असे तू अनेकदा ?।
देव आहे ठिक ,मान्य पसारा तुझा मोठा ॥
सावरता ही येत नाही तर मिरवतो कां ताठा ?।
कां म्हणून भान दिले जगण्याचे आम्हाला ?।
तुझ्याविना जगण्यापेक्षा मरण धाड मला ॥
चराचरात व्यापला आहेस ,सांगू नकोस मला ।
असशील खरा देव प्रकटून सोबत कर आम्हाला ॥
@डॉ.प्रज्ञा देशपांडे.
No comments:
Post a Comment