Wednesday, June 6, 2018

#चित्रकविता.


किती बरे करावा मनापासून धावा?।
कधी पावशील सांग ना मला तू देवा ?।

श्रद्धेमध्ये खोट नाही ,नाही खंड तपात।
सातत्याने ध्यानीमनी मग्न मी जपात ॥

तुझेच काय चुकते जरा  बघ बरं एकदा
किती काळ तिष्ठवशील असे तू अनेकदा ?।

देव आहे ठिक ,मान्य पसारा तुझा मोठा ॥
सावरता ही येत नाही  तर मिरवतो कां ताठा ?।

कां म्हणून भान दिले जगण्याचे आम्हाला ?।
तुझ्याविना जगण्यापेक्षा मरण धाड मला ॥

चराचरात व्यापला आहेस ,सांगू नकोस मला ।
असशील खरा देव  प्रकटून सोबत कर आम्हाला ॥

@डॉ.प्रज्ञा देशपांडे.

No comments:

Post a Comment