Wednesday, May 26, 2021

#सहजोक्त

 #शब्दचिंतन.

मराठी  ही  जुनी , समृद्ध भाषा आहे. तिच्या अनेक बोली आहेत. आजही  महाराष्ट्राच्या छोट्या मोठ्या भागात त्या बोली दैनिक व्यवहारात आहेत. काही काही शब्द त्या विशिष्ट पट्ट्यातच  वापरतात. म्हणून ते खास न् वेगळे असतात.

आमच्या  नागपुरात "सांबार" हा शब्द  सहज व्यवहारात आहे. कोथिंबीर म्हटले तर भाजीवाल्याला कळणार नाही. 

कधीतरी पुण्यातील प्रशिक्षणा दरम्यानचा किस्सा आठवतो. संपूर्ण महाराष्ट्रातील आम्ही संस्कृत शिक्षक एकत्र होतो.  सायंकाळी अनौपचारिक गप्पांमध्ये विविध खाद्यपदार्थांचा विषय रंगला होता. अोघात मी "सांबार" म्हटले. मुंबई+पुण्याच्या मैत्रिणीने  लगेच विचारले की म्हणजे काय ?  मला नेमकं कोथिंबीर सांगायला सुचले नाही. कोणी तरी मग सांगितले. त्यावर तिची प्रतिक्रिया होती की "अगं काय हे ? कसा बर हा शब्द ?"  

तिने  सांबार  शब्दाचे  सांबरशी  ( हरिणासारखा प्राणी) सहसंदर्भ जोडला.  सर्व जण हसत होते. बोलीविशेषांची महिती सहज कळत होती.

संस्कृत शब्दसंग्रहात काही शोधत असताना एक शब्द गवसला. तसा तो शब्द मराठीत  नेहमीच वापरतात.  शब्द आहे , 'सम्भार'  .  केशसंभार , पुष्पसंभार वगैरे नेहमीचे परिचित शब्द आहेत. 

संभार शब्दाचा शब्दकोशीय अर्थ  संभूती , समूह , संग्रह असा आहे. 

 सांबार हे तृणवर्गसदृश  छोटेखानी झुडूप आहे. जमिनीतून वर आल्यावर अनेक कोवळ्या पानाळ शाखांनी संपूर्ण झाड बहरून येते. पान-फुलं-फळे सारे काही गुच्छा सारखे  , संग्रह केल्या सारखे समूहानी एकत्र असतात. 

 कदाचित ही सारी  गुणवैशिष्ट्ये पाहून नागपुरी बोलीत संभार चे सांबार झाले असावे, असे मला वाटते. 

कोथिंबीर शब्दाची व्युत्पत्ती मात्र अजून सापडली नाही.

संभार> सांभार> सांबार असे परिवर्तन होत होत नागपुरी बोलीत सांबार आला असेल की  काय ? 

संभार>संबार  असे हिंदीत झाले असेल ,नाही  काय ? 

नागपुरी बोलीवर हिंदीचाही छाप आहे म्हणून इथे हा शब्द रुळला असेल  , नाही कां ? 

सांबार हा अस्सल तद्भव शब्द आहे. तर अशा प्रकारे एका  बोलीशब्दाचे कुळ-मूळ सापडले न् आनंद झाला. यापुढे न लाजता 'आपल्याच बोलीत' बोलावे   न् शब्दांची व्युत्पत्ती  शोधत रहावी , हे मात्र खरे.

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Tuesday, May 11, 2021

#सहजोक्त

 #कोरोना-मुक्ती ~ माझा अनुभव . 

 "कोरोना"  नेमका कसा न् कां होतो , हे कळत नाही. झाल्यावर सर्वत्र  मिळणारी भीतियुक्त अस्पृश्यता असहनीय असते. 

  "स्वस्थ" म्हणजे शरीर-मन निरोगी असणे. ज्या ज्या उपायांनी शरीर स्वस्थ होईल तो करण्याचा आपला स्वभाव असतो तसेच अधिकारही असतो.

' कोरोना झाला' , हे कळल्यावर मी सरकारी मार्गदर्शक सूत्रानुसार  विलगीकरण पाळले. कोरोनावर तसं कोणतंही अौषध नाही , हे सर्वविद् आहे. 

व्हिटॅमिन्स/मिनरल्स केवळ प्रतिकार शक्ती वाढवणारे असतात. 

 लहानपणापासून अपवादात्मक परिस्थितीत अॅलोपॅथी अौषधे घेत असते. वैद्यकीय क्षेत्रात अफाट क्रांती करणा-या वैद्यकतंत्रज्ञानावर माझा ठाम विश्वास आहे.  शस्त्रकिया करण्यासाठी अॅलोपॅथीच उपयुक्त आहे , हे मला माहीत आहे.  शासकीय वैद्यक यंत्रणेवर माझा पक्का विश्वास आहे. कोरोना-महामारी येण्यापूर्वी काही वैद्यकीय चाचण्या/निदान  मेयोतूनच केले आहे आणि ते यशस्वी सुद्धा झाले आहे. 

 परंतु  सद्यपरिस्थितीत सरकारी हॉस्पिटल्स अोव्हरलोडेड आहेत , खाजगी रुग्णायलात कोरोनासाठी अजिबात जायचे नाही , हे निश्चितच केले होते.

 

अॅलोपॅथी अौषधे घेण्यास माझं मन-शरीर नेहमीच नकार देते. 

 माझी स्वाभाविक प्रकृती जाणून योग्य तो उपचार करायचा , असे मी ठरवले.  

 माझा मोठा भाऊ डॉ. मुकुल गुरु हा भारत सरकारच्या आयुष विभागाची मान्यता प्राप्त निसर्गोपचार-तज्ज्ञ आहे. नागपूर जिल्ह्याचे दायित्व त्याच्याकडे आहे. सुदैवाने तो माझ्या घरासमोर रहातो. 

  "योग-निसर्गोपचार" याच चिकित्सापद्धतीने उपचार करायचा हे मी ठरवले. 

  मुकुलदादा दिवसातून तीनदा फोन करून काय करायचे ते सांगायचा न् जराही काही फरक जाणवला तर त्यावर उपाय सांगायचा.  

  

  

  वीस दिवसांच्या या सर्व प्रवासात मला जाणवलेले मुद्दे मी इथे मांडत आहे.


•   प्रत्येक व्यक्ती ही स्वतंत्र न् भिन्न असते. त्यामुळे एकाला ज्याने फायदा होतो , तसेच्या तसे उपचार  आंधळेपणाने , स्वतःच्या मनानी करू नये. योग्य व तज्ज्ञ मार्गदर्शकाच्याच सल्ल्याने उपचार करावे.


• मन व शरीर यांचे अतुट नाते आहे.

 भीतीमुळे , नसलेले रोगही बळावतात. मन निर्भय होण्यासाठी प्रयत्न करावा.

  • विचार-आचार-आहार-विहार यांच्यावर रोगी/ निरोगीपणा अवलंबून आहे.

  • स्वतः भोवती आश्वासक , सकारात्मक व सुखद वातावरण कायम  जपावे.

  • निसर्गाचा एक घटक असलेले मानवी शरीर निसर्गनियमानेच स्वस्थ होऊ शकते.

  • सकस , ताजे , सात्विक न् पौष्टिक अन्न  ; स्वास्थ्यकारक असते. 

  •   आसने व प्राणायाम इतकेच शरीर-शुद्धिक्रिया महत्त्वाच्या आहेत.

  •   शरीर-शुद्धिक्रिया (म्हणजे नेती , धौती, विरेचन , बस्ती वगैरे)   आपल्या मनाने करू नयेत , तज्ज्ञमार्गदर्शकाच्या समोर प्रत्यक्ष शिकून मगच कराव्या.

  •   काय खावे ? कसे खावे ? किती खावे ? याचेही मार्गदर्शन चिकित्सकाकडून  वेळोवेळी घ्यावे.

  

  •   रोग-लक्षणे दिसली की उपचार घ्यायचा न् लक्षणे संपली की उपचार सोडून द्यायचा , असे निसर्गोपचारात चालत नाही.

  •   कोरोनानंतर उद्भवणारे काही लक्षणे टाळण्यासाठी वर्षभर न् नंतर सवय करून आजीवन निसर्गानुरूप दिनचर्य़ा आचरावी. 

  •   आपले शरीर चैतन्यमय न् जिवंत असते. स्वतःहून स्वस्थ होण्याचा त्याचा स्वभाव असतो. आपण केवळ त्याला जरासा आधार द्यावा , परावलंबी करू नये.

  •   प्रत्येक अौषधीचा प्रभाव (इफेक्ट) पडतो म्हणजे कुप्रभावही (साईड-इफेक्ट) पडूच शकतो.   कोणतेही अौषध (आयुर्वेदिक /होमियोपॅथी/अॅलोपॅथी) आपल्याच मनाने  घेऊ नये. 

  • गुगलवर आज कोरोनाविषयक प्रचंड माहिती खुली आहे. पण  योग्य उपचार करण्याचा विवेक त्यात नसतो. म्हणून तज्ज्ञ-चिकित्सकाच्या मार्गदर्शनातच उपचार घ्यावे.

  • कोणत्याही रोगावर शरीर आतून उपचार करतेच करते. बाह्य अौषधी घेतल्यावर , शरीराची प्रतिक्रिया वेगवान होते.  अौषधाला गुण यायला वेळ लागतो . रुग्णाने आधीर होऊ नये. 

  • कोणत्याही रोगामध्ये शरीराचीच नाही तर मनाचीही प्रतिकारशक्ती कमी होत असते. मनाच्या संवर्धनासाठी उत्तम वाचन , अध्यात्मिक वाचन ,  मंत्र/श्लोक/अभंगादी वाचावे /म्हणावे.

  •मानवी शरीर हे अतिशय जटील व गुंतागुंतीचे आहे. शरीरातील सहस्रावधी पेशी चैतन्यमय असतात.  क्षणाक्षणाला त्या बदलत असतात , स्वतःहून स्वतःला दुरुस्त करीत असतात. 

  •योग्य आहार , योग्य व्यायाम , मनासाठी सर्जक उपक्रम , पुरेपूर झोप , योग्य मलविसर्जन या सर्वांच्या मदतीने शरीर-मन नक्की स्वस्थ होते.



अशा प्रकारे माझा कोरोना-परिचर्येचा अनुभव इथे मांडला आहे.

"हाच योग्य  उपचार" असा माझा दावा नाही. पण मला या उपचाराने फायदा झाला , हे नक्की. 

कोरोना काय किंवा  येऊ घातलेले जैवशस्त्रे काय ? ही सर्व दुर्दैवाने  विज्ञानाचीच  काळी बाजू आहे.   माणूस दिवसोंदिवस निसर्गाच्या दूर जातो आहे न् त्यामुळे या काळ्याबाजूला बळी पडत आहे. 

प्रत्येकानेच प्रकृतीला जपत , संस्कृती वाढवावी . विकृतीला थारा देऊ नये.  

जीवमशैलीमध्ये जरासा बदल केल्याने ब-याच विकृतींपासून बचाव होऊ शकतो , हे निश्चित. 

#जिज्ञासुंसाठी डॉ. मुकुल गुरु यांचा वेब अॅड्रेस व फोन नंबर देत आहे.


 www.yogsanskar.org

 

 +919371538645

 ©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

 #कोरोना-मुक्ती ~ माझा अनुभव . 

 "कोरोना"  नेमका कसा न् कां होतो , हे कळत नाही. झाल्यावर सर्वत्र  मिळणारी भीतियुक्त अस्पृश्यता असहनीय असते. 

  "स्वस्थ" म्हणजे शरीर-मन निरोगी असणे. ज्या ज्या उपायांनी शरीर स्वस्थ होईल तो करण्याचा आपला स्वभाव असतो तसेच अधिकारही असतो.

' कोरोना झाला' , हे कळल्यावर मी सरकारी मार्गदर्शक सूत्रानुसार  विलगीकरण पाळले. कोरोनावर तसं कोणतंही अौषध नाही , हे सर्वविद् आहे. 

व्हिटॅमिन्स/मिनरल्स केवळ प्रतिकार शक्ती वाढवणारे असतात. 

 लहानपणापासून अपवादात्मक परिस्थितीत अॅलोपॅथी अौषधे घेत असते. वैद्यकीय क्षेत्रात अफाट क्रांती करणा-या वैद्यकतंत्रज्ञानावर माझा ठाम विश्वास आहे.  शस्त्रकिया करण्यासाठी अॅलोपॅथीच उपयुक्त आहे , हे मला माहीत आहे.  शासकीय वैद्यक यंत्रणेवर माझा पक्का विश्वास आहे. कोरोना-महामारी येण्यापूर्वी काही वैद्यकीय चाचण्या/निदान  मेयोतूनच केले आहे आणि ते यशस्वी सुद्धा झाले आहे. 

 परंतु  सद्यपरिस्थितीत सरकारी हॉस्पिटल्स अोव्हरलोडेड आहेत , खाजगी रुग्णायलात कोरोनासाठी अजिबात जायचे नाही , हे निश्चितच केले होते.

 

अॅलोपॅथी अौषधे घेण्यास माझं मन-शरीर नेहमीच नकार देते. 

 माझी स्वाभाविक प्रकृती जाणून योग्य तो उपचार करायचा , असे मी ठरवले.  

 माझा मोठा भाऊ डॉ. मुकुल गुरु हा भारत सरकारच्या आयुष विभागाची मान्यता प्राप्त निसर्गोपचार-तज्ज्ञ आहे. नागपूर जिल्ह्याचे दायित्व त्याच्याकडे आहे. सुदैवाने तो माझ्या घरासमोर रहातो. 

  "योग-निसर्गोपचार" याच चिकित्सापद्धतीने उपचार करायचा हे मी ठरवले. 

  मुकुलदादा दिवसातून तीनदा फोन करून काय करायचे ते सांगायचा न् जराही काही फरक जाणवला तर त्यावर उपाय सांगायचा.  

  

  

  वीस दिवसांच्या या सर्व प्रवासात मला जाणवलेले मुद्दे मी इथे मांडत आहे.


•   प्रत्येक व्यक्ती ही स्वतंत्र न् भिन्न असते. त्यामुळे एकाला ज्याने फायदा होतो , तसेच्या तसे उपचार  आंधळेपणाने , स्वतःच्या मनानी करू नये. योग्य व तज्ज्ञ मार्गदर्शकाच्याच सल्ल्याने उपचार करावे.


• मन व शरीर यांचे अतुट नाते आहे.

 भीतीमुळे , नसलेले रोगही बळावतात. मन निर्भय होण्यासाठी प्रयत्न करावा.

  • विचार-आचार-आहार-विहार यांच्यावर रोगी/ निरोगीपणा अवलंबून आहे.

  • स्वतः भोवती आश्वासक , सकारात्मक व सुखद वातावरण कायम  जपावे.

  • निसर्गाचा एक घटक असलेले मानवी शरीर निसर्गनियमानेच स्वस्थ होऊ शकते.

  • सकस , ताजे , सात्विक न् पौष्टिक अन्न  ; स्वास्थ्यकारक असते. 

  •   आसने व प्राणायाम इतकेच शरीर-शुद्धिक्रिया महत्त्वाच्या आहेत.

  •   शरीर-शुद्धिक्रिया (म्हणजे नेती , धौती, विरेचन , बस्ती वगैरे)   आपल्या मनाने करू नयेत , तज्ज्ञमार्गदर्शकाच्या समोर प्रत्यक्ष शिकून मगच कराव्या.

  •   काय खावे ? कसे खावे ? किती खावे ? याचेही मार्गदर्शन चिकित्सकाकडून  वेळोवेळी घ्यावे.

  

  •   रोग-लक्षणे दिसली की उपचार घ्यायचा न् लक्षणे संपली की उपचार सोडून द्यायचा , असे निसर्गोपचारात चालत नाही.

  •   कोरोनानंतर उद्भवणारे काही लक्षणे टाळण्यासाठी वर्षभर न् नंतर सवय करून आजीवन निसर्गानुरूप दिनचर्य़ा आचरावी. 

  •   आपले शरीर चैतन्यमय न् जिवंत असते. स्वतःहून स्वस्थ होण्याचा त्याचा स्वभाव असतो. आपण केवळ त्याला जरासा आधार द्यावा , परावलंबी करू नये.

  •   प्रत्येक अौषधीचा प्रभाव (इफेक्ट) पडतो म्हणजे कुप्रभावही (साईड-इफेक्ट) पडूच शकतो.   कोणतेही अौषध (आयुर्वेदिक /होमियोपॅथी/अॅलोपॅथी) आपल्याच मनाने  घेऊ नये. 

  • गुगलवर आज कोरोनाविषयक प्रचंड माहिती खुली आहे. पण  योग्य उपचार करण्याचा विवेक त्यात नसतो. म्हणून तज्ज्ञ-चिकित्सकाच्या मार्गदर्शनातच उपचार घ्यावे.

  • कोणत्याही रोगावर शरीर आतून उपचार करतेच करते. बाह्य अौषधी घेतल्यावर , शरीराची प्रतिक्रिया वेगवान होते.  अौषधाला गुण यायला वेळ लागतो . रुग्णाने आधीर होऊ नये. 

  • कोणत्याही रोगामध्ये शरीराचीच नाही तर मनाचीही प्रतिकारशक्ती कमी होत असते. मनाच्या संवर्धनासाठी उत्तम वाचन , अध्यात्मिक वाचन ,  मंत्र/श्लोक/अभंगादी वाचावे /म्हणावे.

  •मानवी शरीर हे अतिशय जटील व गुंतागुंतीचे आहे. शरीरातील सहस्रावधी पेशी चैतन्यमय असतात.  क्षणाक्षणाला त्या बदलत असतात , स्वतःहून स्वतःला दुरुस्त करीत असतात. 

  •योग्य आहार , योग्य व्यायाम , मनासाठी सर्जक उपक्रम , पुरेपूर झोप , योग्य मलविसर्जन या सर्वांच्या मदतीने शरीर-मन नक्की स्वस्थ होते.



अशा प्रकारे माझा कोरोना-परिचर्येचा अनुभव इथे मांडला आहे.

"हाच योग्य  उपचार" असा माझा दावा नाही. पण मला या उपचाराने फायदा झाला , हे नक्की. 

कोरोना काय किंवा  येऊ घातलेले जैवशस्त्रे काय ? ही सर्व दुर्दैवाने  विज्ञानाचीच  काळी बाजू आहे.   माणूस दिवसोंदिवस निसर्गाच्या दूर जातो आहे न् त्यामुळे या काळ्याबाजूला बळी पडत आहे. 

प्रत्येकानेच प्रकृतीला जपत , संस्कृती वाढवावी . विकृतीला थारा देऊ नये.  

जीवमशैलीमध्ये जरासा बदल केल्याने ब-याच विकृतींपासून बचाव होऊ शकतो , हे निश्चित. 

#जिज्ञासुंसाठी डॉ. मुकुल गुरु यांचा वेब अॅड्रेस व फोन नंबर देत आहे.


 www.yogsanskar.org

 

 +919371538645

 ©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

लो लो लागला

  🙏🙏अकरावी माळ 2/10/2025🙏🙏 #श्री रेणुका मातेची आरती. ही आरती देविभक्तां मध्ये प्रसिद्ध आहे. ह्या आरतीचे रचियता तानाजी देशमुख आहेत. त्यां...