.
न केवलं यो महतोऽपभाषते श्रृणोति तस्मादपि यः स पापभाक् ।
कालिदास विरचित कुमारसंभंवाच्या पाचव्या अंकातील चौदाव्या श्लोकातील हा उत्तरार्ध आहे.
महान लोकांविषयी (सज्जन व संतांविषयी) जो अपशब्द बोलतो न् जो (परनिंदा) ऐकतो , तो देखील पापाचा वाटेकरी होतो.
ऐकणाराच नसेल तर सांगणारा कोणाला सांगेल ? चुगल्या करणाऱ्या इतकाच चुगल्या ऐकणारा दोषी असतो.
समाजातील कलुषितता कमी करायची असेल तर परनिंदा/चुगल्या/विद्वेष पसरवण्यांचे साधन बनणे सोडावे लागेल.
कोणी काय बोलावे ? हे आपल्या हातात नाही . पण आपण काय ऐकावे ? न् काय ऐकूच नये , याची निवड आपल्याच हाती ठेवावी. याकाळात तर हा गुण नक्की अंगी बाणायला हवा , नाही कां ?
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
No comments:
Post a Comment