Saturday, March 29, 2025

#सहजोक्त.

#एक श्लोकी साहित्य. 

 उद्या गुढीपडावा. उद्यापासून श्रीरामाचे नवरात्र  सुरु होते. तसेच देवीचेही नवरात्र सुरु होते. चैत्र-महिन्यातील प्रतिपदे(गुढी पाडवा)  पासून ते पौर्णिमा (हनुमान जयंती) पर्यंतचा काळ हा जागृत उपासनेचा काळ आहे.  या काळात  रामरक्षा-स्तोत्र सिद्ध करतात. तसेच देवी सप्तशती, श्रीसूक्त आदिचे पारायण केल्या जाते. खूप जास्त वेळ पारायण करण्यात जातो म्हणून उपासनाच न करणारे अनेक आहेत.  
'फुल ना फुलाची पाकळी' तरी उपासना करावी. 
पण "वेळ नाही" असे वाटणाऱ्यांसाठी सुद्धा आपल्या संस्कृतीत उपासेनासाठी उत्तम पर्याय आहे. 
संपूर्ण रामायण,  सुंदरकांड, देवी-सप्तशती आदींचे सार एका श्लोकात लिहिलेले आढळते.  हा एक श्लोक पाठ करून म्हटला तरी संपूर्ण ग्रंथ, स्तोत्र म्हटल्याचे समाधान लाभते. एक श्लोक म्हणायला एका मिनिटाहून कमीच वेळ लागतो.   
तर यंदाच्या चैत्र-पर्वात किमान *एक-श्लोकी* उपासना करू या कां? 
(1) एक श्लोकी रामायण
आदौ रामतपोवनादि गमनं, 
हत्वा मृगं कांचनम्।
वैदेहीहरणं जटायुमरणं, 
सुग्रीवसंभाषणम् ।।
बालीनिग्रहणं समुद्रतरणं,
 लंकापुरीदाहनम्।
पश्चाद् रावण कुम्भकर्ण हननम, 
एतद्धि रामायणम्।।
या श्लोकात रामायणातील सर्वच महत्त्वपूर्ण घटना आल्या आहेत. हा श्लोक शार्दूलविक्रीडीत
वृत्तात आहे.
(म्हणजे मंगलाष्टके रचतात ती चाल किंवा "या कुंदेदुतुषारहार धवला" ची चाल.)  
गमन, संभाषण, निग्रहण, तरण, दाहन, हनन, अयन  इत्यादी शब्द 'कृदंत' आहेत.   अशा शब्दांनी  अनुप्रास, यमक आदी साधले आहेच.  यामुळे श्लोक अधिक रंजक झाला तसेच  वाक्य रचना सुटसुटीत आणि सारगर्भ झाली.  
(2) एक-श्लोकि-सुन्दरकाण्ड.
यस्य श्रीहनुमाननुग्रहबला
-त्तीर्णाम्बुधिर्लीलया 
लङ्कां प्राप्य निशाम्य रामदयितां 
भङ्क्त्वा वनं राक्षसान्। 
अक्षादीन् विनिहत्य वीक्ष्य दशकं 
दग्ध्वा पुरीं तां पुनः 
तीर्णाब्धिः कपिभिर्युतो यमनमत् 
तं रामचन्द्रं भजे।।
रामायणात सात कांडे आहेत.
बालकांड, अयोध्याकांड, अरण्यकांड, किष्किंधाकांड, सुंदरकांड, लंकाकांड आणि उत्तरकांड.  यातील सुंदर कांडाचे सार,  वर दिलेल्या एका श्लोकात  आहे. हाही श्लोक शार्दूलविक्रीडीत  वृत्तात आहे. 


(3) एक-श्लोकी देवी सप्तशती.

या ह्यम्बा मधुकैटभप्रमथिनी 

या माहिषोन्मूलिनी 

या धूम्रेक्षणचण्डमुण्डमथिनी 

या रक्तबीजाशिनी। 

शक्तिः शुम्भनिशुम्भदैत्यदलिनी 

या सिद्धिलक्ष्मीः परा

 सा दुर्गा नवकोटिविश्वसहिता

मां पातु विश्वेश्वरी।।

चैत्री-नवरात्रात शारदीय नवरात्रा इतका गवगवा नसतो.  पण हेही नवरात्र मोठेच असतें.  दुर्गा सप्तशती, श्रीसूक्त आदीची पारायणे करतात. पण तेच की वेळ, बैठक करण्याची सवय, तसेच इच्छा या सर्वांच्या अभावाने  दिवसोंदिवस   शक्तिउपासना कमी होते आहे. 

वरील एका श्लोकात  शक्तीचा महिमा वर्णीला आहे.  या नवरात्रात हा श्लोक रोज सकाळ संध्याकाळी म्हणू या.


या शिवाय 

महाभारत, भागवत,  विष्णुसहस्रनाम, नवग्रहस्तोत्र  आदी सर्वांचे एक-श्लोकी सारांश उपलब्ध आहे. 


(4) एक-श्लोकी- महाभारत.

आदौ पाण्डवधार्तराष्ट्रजननं

 लाक्षागृहे दाहनं

 द्यूते श्रीहरणं वने विहरणं 

मत्स्यालये वर्तनम्।

 लीलागोग्रहणं रणे विहरणं

 सन्धिक्रियाजृम्भणं 

पश्चाद्भीष्मसुयोधनादिनिधनं 

ह्येतन्महाभारतम् ।।


(5)एक-श्लोकी-भागवत.

आदौ देवकी देव गर्भजननं,

गोपी गृहे वर्धनं |

माया पूतना जीव ताप हरणं

 गोवर्धनोद्धारणं।

 कंसच्छेदनं कौरवादिहननं,

कुंतीसुता पालनम् |

एतद्भागवतं पुराणकथितं, 

श्रीकृष्णलीलामृतम्||


(6) एक-श्लोकी-विष्णु सहस्रनाम.

नमो स्तवन अनंताय सहस्त्रमूर्तये, सहस्त्रपादाक्षिशिरोरुबाहवे। 

सहस्त्र नाम्ने पुरुषाय शाश्वते, 

सहस्त्रकोटि युगधारिणे नम:।। 


(7) एक-श्लोकी-नवग्रह-स्तोत्र

आरोग्यं प्रददातु नो दिनकरः

 चन्द्रो यशो निर्मलं 

भूतिं भूमिसुतः सुधांशुतनयः

 प्रज्ञां गुरुर्गौरवम्।

काव्यः कोमलवाग्विलासमतुलां

 मन्दो मुदं सर्वदा 

राहुर्बाहुबलं विरोधशमनं 

केतुः कुलस्योन्नतिम् ॥

इत्येकश्लोकी नवग्रहस्तोत्रं समाप्तम् ।


हे सर्व श्लोक आपल्याला ते ते मूळ धार्मिक साहित्य समजावून तर देतच आहेत. शिवाय 

कमी वेळात आपल्या धार्मिक ग्रंथाची पर्यायाने आपल्या प्राचीन वारश्याची ओळख टिकवून ठेवतात.

या श्लोकां च्या स्पष्टीकरणा साठी रामायण-महाभारत, देविपुराण, भागवत आदितील  अनेक कथा रंगवून सांगता येतील. 

या श्लोकां च्या रचना बघितल्या तर अल्प शब्दातून सारांश कसा लिहावा याचा वास्तुपाठ दिसतो. तसेच श्लोक स्पष्टीकरण करता करता त्या विषयक लघुनिबंध नक्कीच रचला जातो.

इतकेच नाही तर वृत्त, अलंकार याचीही माहिती होईल. शिवाय नवनवीन शब्दसंग्रह वाढेल.

आपली भारतीय ज्ञान परंपरा खरोखर महान आहे, नाही कां?

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

नागपूर.




35 comments:

  1. Replies
    1. खूप सहज शक्य होणारा उपक्रम.

      Delete
    2. धन्यवाद

      Delete
    3. युगानुकुल उपासना... छानच

      Delete
  2. खूप छान

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद

      Delete
    2. खूप सुंदर !हल्ली मनात असते पण वेळच मिळत नाही अशी तक्रार खूप जण करतात.त्यांच्यासाठी तर परवणीच !
      🙏🙏👌👌

      Delete
  3. खूप छान उपक्रम👌👍🙏🙏

    ReplyDelete
  4. खूप छान उपक्रम आणि माहिती पण...

    ReplyDelete
  5. फारच सुंदर ! 👏👏👏

    ReplyDelete
  6. वाह खूप सुंदर.👍👍👍

    ReplyDelete
  7. खूप महत्वपूर्ण माहिती. धन्यवाद

    ReplyDelete
  8. Khup khup dhanyawad Mam

    ReplyDelete
  9. खरं आहे. सहज म्हणता येतील असे श्लोक आहेत.

    ReplyDelete
    Replies
    1. नौकरी करणार्‍या स्त्रियांना फार वेळ स्तोत्र पठण करणे, पूजा अर्चना करणे ह्यासाठी पुरेसा वेळ नसतो तेव्हा हे सर्व श्लोक त्यांच्या साठी अतिशय उपयोगी आहेत....धन्यवाद

      Delete
  10. खूप छान उपक्रम आहे

    ReplyDelete
  11. खूप छान व उपयुक्त 🙏

    ReplyDelete
  12. खूप छान!

    ReplyDelete
  13. खूप छान

    ReplyDelete
  14. खूप छान

    ReplyDelete
  15. आपल्या पूर्वजांना भविष्यात वंशज ईमोजी द्वारा ज्ञान प्राप्त करण्यात तज्ज्ञ होतील, हे माहिती असावे।त्यामुळे च त्यांनी या प्रकारे कमी शब्दात अनेक शास्त्रांचे अल्प शब्दात ज्ञान देण्याचा उपक्रम केला असावा.

    ReplyDelete