Saturday, August 18, 2018

#सहजोक्त.


आज दोन लेख वाचले. एक मराठी व दुसरा हिंदी.
दोन्ही लेखांचा मूळ हेतू मातृभाषेतून शिक्षणाची महती हाच आहे.
दोन्ही लेख छान व विषयाला पूर्ण न्याय देणारे होते.
शिक्षणात मातृभाषेचे स्थान अनन्यसाधारण आहे यात शंकाच नाही.
या दोन्ही लेखाची सुरुवात एकाच संस्कृत श्लोकाने झाली हा योगायोग. नेमकं दोन्ही लेखात तो श्लोक निर्दोष दिलेला नाही. संस्कृत ही मायबोली नाही त्यामुळे  असो. त्यावर मी रचना केली.
मातृभाषा महती ।
मातृभाषां परित्यज्य भाषामन्यामुपासते ।
ते चक्रासन्दमासाद्य
स्वपादहीनपङ्गवः ॥
©डॉ.प्रज्ञा देशपांडे
भारत हा बहुभाषिक देश आहे. बहुभाषिकत्व हे भारताचे बलस्थान आहे.भारतीय शिक्षणात भाषा हा महत्वाचा घटक आहे. भाषावार प्रान्त रचनेमुळे प्रादेशिक ,भाषिक अस्मिता वाढणे नैसर्गिक आहे. आजकाल कुठेतरी ही अस्मिता व राष्ट्रियता  यांच्यात उगाच दावा उभा केल्या जातोय की काय असे वाटते. या प्रकारांमुळे भारताचे बलस्थानच कमकुवत होते आहे असे वाटते.
सर्व भारतीय ,राष्ट्रियत्व जपणा-या सुजाण नागरिकांनी भाषा शिक्षणाकडे डोळसपणे बघणे ही काळाची गरज आहे.
 परिसरबोली ,मातृभाषा ,राजभाषा,राष्ट्रभाषा ,
 जागतिकभाषा  यांच्या गलबल्यात शिक्षण अडकवण्यापेक्षा  भाषिकसामंजस्य ,भाषाशिक्षण या विषयाला गांभीर्याने घ्यायला हवे.
 भाषा ही संस्कृतीचे वहन करते न् भारतीयांची विशिष्ट संस्कृती आहे असे जर अभ्यासकांना वाटत असेल तर भारतीय भाषांचे वैविध्य व परस्पर पूरकता ,अंतर्गत साम्य नव्या पिढीला सोदाहरण समजावून देणे हे त्यांचे महत्वाचे कर्तव्य आहे.
 ©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

No comments:

Post a Comment