अतुल्य भारत !
लंदन देखा
पैरिस देखा
और देखा जापान
माईकल देखा, एल्विस देखा
सब देखा मेरी जान
सारे जग में कहीं नहीं है दूसरा हिंदुस्तान
दूसरा हिंदुस्तान
ये दुनिया एक दुल्हन
दुल्हन के माथे की बिंदिया
ये मेरा इंडिया
आई लव माई इंडिया
आधुनिक काळातही भारत-प्रशंसेची अनेक फिल्मी ,गैरफिल्मी गाणी नव्या पिढीच्या तोंडी सहज बसलेली आहेत.
आसेतु-हिमाचल पसरलेला विस्तीर्ण देश म्हणजे भारत. भारत ,भारतदेश ,भारतवर्ष ,भारतमाता , हिंदुस्थान ,इंडिया अशा विविध नावांनी अोळखल्या जाणारा आपला हा विशाल देश .
आपल्या देशाचे मूळ नाव भारत , जे पुराणकाळातील एका पराक्रमी राजा (सम्राट भरत , दुष्यंत-शकुंतलेचा पुत्र) यांच्या नावावरून ठेवले गेले , असे म्हणतात. तर भारत या शब्दाची अशी ही व्युत्पत्ती करतात -> 'भा म्हणजे (ज्ञानाचे) तेज , रत म्हणजे मग्न" भारत म्हणजे नेहमीच ज्ञानाच्या तेजात मग्न असणारा देश.
असा आपला भारत देश जगातील अतिप्राचीन संस्कृती टिकवून ठेवलेला अद्वितीय देश आहे.
आज जगात अस्तित्वात असलेल्या अनेक देशांना स्वतःचा भूगोल आहे पण इतिहास नाही . काही देशांना भूगोल-इतिहास आहे पण संस्कृती नाही. तर काही देशांना भूगोल-इतिहास-संस्कृती असूनही वैविध्याने परिपूर्ण शाश्वत वारसा नाही. अशा मानवी जगांमध्ये माझा भारत देश भूगोल-इतिहास-संस्कृती-वैविध्यपूर्ण शाश्वत वारसा यांनी संपन्न आहे. लाखो-हजारों वर्षांचा समृद्ध वारसा असलेल्या भारताचा 'मी' नागरिक आहो , ही निर्विवादपणे सर्व भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे. ब्रह्मवैवर्त पुराण , खंड ૪ ,अध्याय ९७ यात म्हटले आहे ,
'दुर्लभं भारते जन्म , मानुषं तत्र दुर्लभम् ।
अनेकजन्म तपसा संभूय भारते द्विजः ॥
अर्थात भारतात जन्म मिळणे ही दुर्मिळ घटना आहे , त्यातही मानवीजन्म मिळणे अधिक दुर्लभ आहे. त्यातही अनेक जन्मांच्या तपश्चर्येनंतर द्विज (म्हणजे वेदादी ज्ञानार्जन करणारे ऋषी-मुनी ) या श्रेणीत जन्म लाभतो.
आधुनिक युगातील अतुल्य भारत = भारत हा भौगोलिक , सांस्कृतिक , ऐतिहासिक आदी अनेक आयामांनी अतिशय अतुलनीय व एकमेवाद्वितीय आहे. आता यातील एकेका आयामांचा विचार करू.
• भारताचे भौगोलिक स्थान असे वैशिष्ट्यपूर्ण आहे की येथे विविध ऋतु , नैसर्गिक स्थाने , हवामान-विभिन्नता , वैविध्यपूर्ण भूरूपे इत्यादी इत्यादी अनेक बाबींमधील वेगवेगळेपणा भरभरून दिसून येतो. भारत कोणत्या अक्षांश-रेखांश श्रेणीत येतो ? भारत कोणत्या कटिबंधात येतो ? भारतातील विविध भूरूपे व प्रसिद्ध स्थाने कोणती ? भारतातील जागतिक वारसास्थळे कोणती ? भारतातील प्रमुख नद्या व उपनद्या कोणत्या ? भारतातील खनिज संपत्ती , याविषयी पीपीटी तयार करा. भारतीय वन्यजीव-वैविध्य , यावर स्लाईडशो तयार करा . भारतातीय रेल्वे व भारतातील पर्वतावलींची नावे सांगा ? भारतातील पठारी प्रदेश व तेथील जीवनमान , याविषयी सचित्र प्रदर्शनी आयोजित करा. भारतीय समुद्र-किनारा व खाडी याविषयी माहिती संकलन करा . भारतातील अभयारण्ये व राखीव जंगल यांची सचित्र माहिती गोळा करा. थरचे वाळवंट व भारतीय जनजीवन यांच्यावर टीपा लिहा. भारतातील पर्यटनव्यवसायातील आवाहने व संधी यावर आपले मत काय ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे भारताताचे भौगोलिक अतुल्यत्व आपल्याला पुरेपुर जाणवून देतील. वरील सर्व प्रश्नांची उत्तरे माहितीच्या अधिकृत स्रोतातून गोळा करणे जास्त सयुक्तिक ठरेल.
• भारताचा गौरवशाली इतिहास विस्मयकारक आहे. परचक्राच्या आक्रमणामुळे जगातील अनेक देश , संस्कृती व धर्म धराशायी झाले . भारतातही पडझड झाली , बरीच हानीही झाली पण तरीही गरिमा आजही अबाधित आहे. आजही "भारत" उभा आहे कारण त्याचा भक्कम पाया अजूनही अबाधित आहे. भारतीय गौरवशाली इतिहास जाणून घ्यायचा असेल तर अधिकृत माहिती देणारे अनेक पुस्तके , वेबसाईट , सोशलमिडिया साईट उपलब्ध आहे. उदाहरणार्थ भारतीय शिक्षणमंडळ द्वारे प्रकाशित धर्मपालजी लिखित दहा पुस्तकांचा संच , लेखक श्री. प्रकाश पोळ यांचे , "भारतीय ज्ञानाचा खजिना" , फेसबुक कम्युनिटी पेज 'इतिहासाच्या पाऊलखुणा' इत्यादी. आपण सर्व भारतीय एका तेजस्वी ज्ञानपरंपरेचे वारस आहोत , हे आत्मभान सर्वांनाच असणे गरजेचे आहे .
श्री. प्रशांत पोळ यांच्या पुस्तकाच्या आधारे भारतीय इतिहासातील काही निवडक तथ्य इथे वानगी दाखल देत आहे.
१. पेशावर/रावळपिंडीपासून ते जावा-सुमात्रा (इंडोनेशिया) पर्यंतच्या भूभागावर सन २०० BC ते सन १००० अशी सुमारे १२०० वर्ष संस्कृत ही भाषा बोलली जायची.
२. 'तक्षशिला' विद्यापीठात जगभरातून विद्यार्थी शिकायला यायचे. चाणक्य, पाणिनी ही त्यापैकी काही विद्यार्थ्यांची नावे. जहाज बांधणी शास्त्रापासून वैद्यकापर्यंत आणि खगोल शास्त्रापासून धातू शास्त्रापर्यंत असे सुमारे २५ विषय तिथे शिकवले जायचे. एकावेळी १०,००० विद्यार्थी बसू शकतील एवढे मोठे तिथे सभागृह होते.
३. 'मगध' राज्यातले (आताचे बिहार) नालंदा विद्यापीठ ही असेच. चीनमधला युआन श्वांग तिथे राहून १० वर्षे शिकला आणि त्यावेळच्या बऱ्याच नोंदी त्याने करून ठेवल्या आहेत. पुढे १२०० साली खिलजीने ते विद्यापीठ जाळून टाकले आणि सगळे पुरावे नष्ट झाले.
४. आपला शिक्षण आणि व्यापार ह्या दोन्हीमध्ये जगात पहिला क्रमांक होता. एक्स्पोर्टसाठी जगात आपला २९% शेअर होता आणि आजतागायत हे रेकॉर्ड ब्रेक झाले नाही. युरोपिअन इतिहाज्ज्ञांनी तशा नोंदी त्यांच्या इतिहासात करून ठेवल्या आहेत.
५. कर्नाटकातले 'हंपी' हे शहर तर जवळपास जगाचीच राजधानी होते. (१४०० साल) त्याचं टाऊन प्लॅनिंग जागतिक दर्जाचं होतं. रस्त्यावर भाजी विकायला बसतात तसे लोक सोनं चांदी विकायला बसायचे आणि लोक भाजीपाल्यासारखे ते विकत घ्यायचे अशी नोंद परदेशातल्या इतिहासतज्ज्ञांनी करून ठेवली आहे.
६. 'ऋग्वेद' हा जगातला सगळ्यात जुना ग्रंथ. ५००० वर्षांपेक्षा जुना. त्यातल्या उपनिषदांमधल्या सूक्तांमध्ये आणि श्लोकांमध्ये सूर्याचे पृथीपासूनचे अंतर आणि प्रकाशाचा वेग लिहून ठेवला आहे.
७. 'सिरीभूवलय' ग्रंथ - हा ग्रंथ कोणत्याही भाषेत/ लिपीत लिहिलेला नाही तर अंकांमध्ये लिहिलेला आहे. हे अंक १ ते ६४ असे आहेत. ते विशिष्ट पद्धतीनं वाचले की विशिष्ट भाषेत विशिष्ट ग्रंथ वाचता येतो. मूळच्या १६,००० पानी ह्या ग्रंथापैकी १२७० पानेच सध्या उपलब्ध असून मूळ ग्रंथात ५६ अध्याय असताना त्यातल्या ३ अध्यायांचीच उकल (डी-कोडींग) आजपर्यंत होऊ शकली आहे. १८ लिप्या आणि ७१८ भाषांत हा ग्रंथ वाचता येतो. रामायण, महाभारत, वेद, उपनिषदे, गणित, खगोलशास्त्र, रसायनशास्त्र, इतिहास, वैद्यक, तत्वज्ञान ह्यासारख्या विषयांवरील ग्रंथदेखील त्यातच वाचता येतात.
८. 'कटपयादी' (सर्व अक्षरांना एक एक अंक देऊन त्याचं कोष्टक करून ती भाषा वापरण्याची संकल्पना म्हणजे 'कटपयादी' संख्या संकल्पना) सूत्राच्या मदतीने 'पाय' ह्या गणिती संकल्पनेबद्दलचं आपलं संशोधन, पायची किंमत दशांशाच्या ३१ व्या स्थानापर्यंत काढून ती एखाद्या श्लोकात एम्बेड करणं ह्यासारखी जबरदस्त माहिती पुस्तकात मिळते.
९. 'डोसा' हा पदार्थ २००० वर्ष जुना आहे तसेच मसाल्यांपासून ते रेशीम, धान्य इत्यादी आयटम्स सगळ्या जगात एक्स्पोर्ट व्हायचे.. ह्याबद्दलची सविस्तर माहिती पुस्तकात वाचायला मिळते.
१०. गुजरातेत असलेल्या सोमनाथ मंदिराजवळ एक स्तूप आहे जो ३००० वर्ष जुना आहे (कार्बन डेटिंग पद्धतीनुसार) आणि त्यावर एक संस्कृत श्लोक आहे. त्याचा अर्थ आहे 'इथून पुढे दक्षिण ध्रुवापर्यंत सरळ रेषा काढली असता मध्ये कोणताही मोठा भूखंड येत नाही'. ह्याचाच अर्थ आपले लोक जगभर फिरत होते. 'वास्को द गामा' हा त्याच्या जहाजापेक्षा पाच पट मोठ्या भारतीय जहाजांच्या मदतीनं भारतापर्यंत पोहोचला. मात्र भारताचा शोध त्यानं लावला असं आपला इतिहास आपल्याला शिकवतो ! १८०० सालच्या सुमारास ब्रिटिशांनी आपल्या जहाज बांधणी कारखान्यांना बंदी घातली आणि आपले जहाज बांधणी शास्त्राचे सर्व ज्ञान लयाला गेले.
११. थायलंड मधल्या एअरपोर्टवर समुद्र मंथनाचा मोठा देखावा उभा केला आहे. सिंगापूरचे आधीचे नाव सिंहपूर होते. यूरोपमध्ये बोलली जाणारी 'केल्टिक' भाषा, रशिया जवळच्या युक्रेन देशातल्या मुर्त्या, इराक-सीरिया प्रदेशातले 'येझदी' लोक, कंबोडिया, व्हिएतनाम मधली मंदिरे, शिल्पे ही सगळी भारतीय रूपे आहेत.
१२. प्लास्टिक सर्जरीचा शोध आपण लावला आहे आणि त्यालाही २००० वर्षे झाली.
• सांस्कृतिक भारत = संस्कृती हा शब्द अनेक अंगांनी योजला जातो. संस्कारांची सातत्याने ,पिढी दरपिढी जपणूक ज्यातून होते ती संस्कृती , असे ढोबळमानाने म्हणता येईल . संस्कृती ही रहाणीमान , भाषा , पेहराव , खानपान सवयी , रूढी ,परंपरा , सामाजिक रचना इत्यादींतून ठळकपणे जाणवते . बरेचदा धर्म व संस्कृत , धर्म व भाषा यांची सरमिसळ होते . ती होणे एका मर्यादे पर्यंत गरजेचेही आहे. पण कधी कधी जागतिक इतिहासात अशी काही उदाहरणे सापडतात की धर्मापेक्षा भाषा वा संस्कृती जास्त प्रभावी झालेली दिसते.
अनेक धर्मांची मुख्यालये वा उगमस्थांमध्ये पालन केल्या जाणारे धर्मसंस्कार , जगात अगदी तंतोतंत पालन केल्याच जातात , असे स्पष्ट आढळून येत नाही. किंबहुना देश-काल-परिस्थिती नुसार तेथे बदल अपरिहार्यच असतात. अशी अनेक उदाहरणे सहज सापडतात . त्यांची जंत्री करून मानवी समूह व त्यावरील धर्मप्रभावावर परिणाम करणारे घटक समजून घेणे रंजक उपक्रम तर आहेच , शिवाय मानवीबुद्धीची समायोजन क्षमता व समूहवर्तनाची मानसिकता यावरही प्रकाश टाकते.
वैदिक-संस्कृती पासून ते आजतागायत अनेक स्थित्यंतरे व सरमिसळ झालेला आपला देश आजही सांस्कृतिक-समायोजनात जगात अव्वल आहे. नवता स्वीकारण्याची भारतीयांची क्षमता अफाट आहे.
• भारताची खाद्य संस्कृती =
आसेतुहिमाचल पसरलेला आपला भारत सुजलाम् सुफलाम् असून खाद्यविविधतेने नटलेला आहे. धान्य-कडधान्ये -भाजीपाला , फळेफळावळे , सुकामेवा इत्यादी सर्वच बाबतीत वैविध्य दिसून येते. भारतातील प्रत्येक प्रांताची , भागाची स्वतःची वैशिष्ट्यपूर्ण खाद्यसंस्कृती आहे. वानगी दाखल काही भागातील खाद्यपदार्थांची संक्षिप्त माहिती देत आहे.
१. महाराष्ट्र - पुरणपोळी , झुणका-भाकरी, वांग्याचे भरीत हे प्रसिध्द आहेत . ज्वारी , बाजरीचे भाकरी , सर्व प्रकारचे कडधान्य पालेभाज्या यांचा समावेश असतो.
२ . दिल्ली - मुघलांची राजधानी असलेल्या दिल्लीत बादशाहांच्या काळात एकेकावेळी दीडशे प्रकारचे भात बनत होते. आज चांदणी चौकातील पराठे, काबाब, कचोरी, चत , कुल्फी हे खास पदार्थ आहेत.
३. गुजरात - शाक रोटी, खिचडी, कडी, दोकला, हंडवा, ठेपला, खाकरा हे गुजराती लोकप्रिय पदार्थ आहेत.
४. जम्मू- काश्मीर - काश्मिरी जेवणावर मध्य आशिया, उझबेकिस्तान येथील खाद्य संस्कृतीचा प्रभाव आहे. खाद्य दही, तेल, मसाले इत्यादींचा जास्त तर कांदा लसणाचा कमी वापर होतो.
५. दक्षिण भारत (आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक केरळ)- इथल्या साउथ इंडियन डिशेश जगप्रसिध्ध आहेत. इडली-सांबर, वडा- सांबर, नारळाची चटणी, भात, उथ्थप्प हे प्रसिध्द आहेत.
६. झारखंड- बेन्गणी चोप ही प्रसिध्ध डिश आहे. इथले भाहुतेक पदार्थ भातापासून बनवतात
७. मध्य प्रदेश- इंदोर उज्जैन येथे दुधाचा वापर मुबलक प्रमाणात होता. पोहे जिलेबी लस्सी उसाचा रस दल बाफला इत्यादींची खासियत आहे.
८. पश्चिम बंगाल- मासे भात मुख्य अन्न आहे त्याचप्रमाणे बंगाली मिठाई प्रसिध्द आहे.
९. बिहार - मिट्टी, चोखा हे सातूच पीठ, गव्हाच्या पीठाचे पदार्थ दल्पुरि, मालपुवा बालुशाही, हे पदार्थ प्रसिध्द आहे
१० ओडीसा - मांसाहार जास्त खाल्ला जातो. पख्ल, दल्मा, कट्टा, भात इत्यादी पदार्थ प्रसिद्ध आहे.
११ उत्तर प्रदेश - कबाब, कोरमा, बिर्याणी, रुमाली रोटी, पराठा इत्यादी पदार्थंचा समावेश असतो.
१२ मणिपूर - भात पालेभाज्या मासे मुख्य अन्न आहे. सोयाबीन चा जास्त वापर करतात. मणिपुरी लोक आपल्या दारात भाज्या पिकवतात.
१३ मेघालय- येथे लोणचे, मिनील सोंग, भाताचे पदार्थ प्रिय आहेत.
१४ पंजाब - पंजाबी जेवण जगभर प्रसिध्द आहे. पराठे, लस्सी पनीरच्या भाज्या मक्के कि रोटी, सरसो का साग, तंदुरी इत्यादी जेवणाची खासियत आहे.
१५ राजस्थान - बेसन चा मोठ्या प्रमाणात वापर करतात, दल भाती खाडी धीवर पनच्कुत ,लापशी, कदिबुन्दि बिकानेरी भुजिया दल्कचोरि प्रसिद्ध आहे.
१६ उत्तराखंड - पालक मेथीचा भरपूर वापर करतात डाळी कडधान्य सोयाबीन झोळी कापा रायते हे प्रसिद्ध पदार्थ आहे
१७ गोवा - मासांचे अनेक प्रकार करतात पाव सोलकडी मोगागाठी भात केक इत्यादी गोवन जेवणाची गोडी इथल्या पदार्थांना असते.
या प्रांतातील खाद्य वैशिष्ट्यांसह जाती-धर्मातील विशिष्ट खाद्य पदार्थ प्रख्यात आहेत. उदाहरणार्थ मारवाडी दालबाटी, कांजीवडे आदी ,ब्राह्मणी कढी , गोडामसाला , मुसलमानांचा शिरखुर्मा ,नागपुरचा सावजी जेवण , कोल्हापुरचा तांबडा-पांढरा रस्सा , छत्तीसगढी आदिवासींची लालमुंग्यांची चटणी , सारस्वतांचे सामिष पदार्थ , कोकणातील उकडीचे मोदक इत्यादी इत्यादी.
भारतात अतिप्राचिन काळापासून ते आज पर्यंत देशविदेशातील लोकं भारतात मसाल्याचे पदार्थ व विविध खाद्यपदार्थ यांच्या आकर्षणाने येत असतात.
• भारताची वस्त्र संस्कृती = खंडप्राय पसरलेल्या देशात अतिशय प्राचीन काळापासून वस्त्रवैविध्य आढळते. वनस्पतीजन्य धाग्यांपासून वस्त्र निर्मितीतर सामान्य आहेच शिवाय पशु-कीटक ,धातू , यांपासून धागे तयार करून त्यांच्या मिश्रणातून वस्त्र निर्मितीचे कौशल्य भारतातील प्राचीन कौशल्याचा नमुना आहे.
साडी हे भारतीय संस्कृतीतील महावस्त्र व मानबिंदू . त्यातील वैविध्य जगाला थक्क करते.
वेगवेगळ्या शैलीतील साड़्यांमध्ये कांजीवरम साड़ी, बनारसी साड़ी, पटोला साड़ी आणि हकोबा इत्यादी विशेष आहेत. मध्य प्रदेशाची चंदेरी, महेश्वरी, मधुबनी छपाई, आसामची मूंगा रेशमी , अोरिसाची बोमकई, राजस्थानाची बंधेज म्हणजे बांधणी व कोटा साडी , गुजरातची गठोडा, पटौला, बिहारची तसर, काथा, छत्तीसगढ़ची कोसा रेशमी, दिल्लीची रशमी साड़ी , झारखंडची कोसा साडी , महाराष्ट्राची पैठणी ,इरकल हिमरू, तमिलनाडुची कांजीवरम, उत्तर प्रदेशाची तांची, जामदानी, जामवर ए तसेच पश्चिम बंगालची बालूछरी व कांथा टंगैल आदी प्रसिद्ध साड़्या आहेत.
कोसा ,रेशीम ,खादी ,लोकर , जरतारी ,भरजरी ,पश्मिना , तात ,ज्युट असे अनेक धागे भारतात अतिशय प्राचीन काळापासून तयार केल्या जात असे. शिवाय धाग्यांना रंग देण्याचे कसबही बरेच जुने आहे. या शिवाय रेशमी-कापडी धग्यांमध्ये धातूचे पातळ तार करून वस्त्र निर्माण करण्याची कला हे तर भारतीय कौशल्याचे अद्वितीय प्रकटीकरण आहे.
अशा प्रकारे वस्त्रनिर्मितीतील अतुल्यता हा भारतीयांच्या प्राचीन वारश्याचाच परिपाक आहे.
भारताची अतुल्यता =
याशिवाय भारताची संस्कृती जाणून घेण्याची अनेक परिमाणे आहेत . त्यांची थोडक्यात यादी पुढील प्रमाणे
१) गीत-
२)वाद्य-
३) नृत्य
૪)चित्रकला
५)शिल्पकला
६) धातुकला
७) काष्ठ कला
९) रांगोळी
१०) मूर्तिकला
११) विहिर-तलाव बांधणी
१२) मंदिरस्थापत्य
१३) उद्यानविद्या
१૪) कलाकुसरीचे सामान निर्मिती
१५) पशुपालन व संगोपन
१६) मर्दन शास्त्र
१७) आयुर्वेद
१८) निसर्गोपचार
इत्यादी अनेक कौशल्ये भारतीयांना वंशपरंपरागत पद्धतीने आत्मगत झालेली आहेत. काळाच्या अोघात त्यातील अनेक कौशल्ये लुप्त होत आहेत. त्याचे पुनरुज्जीवन व विकसन करणे अत्यंत गरजेचे आहे.
भारताची अतुल्यता = आपला भारत हा जगातील एकमेवाद्वितीय देश आहे , याबद्दल सामान्य नागरिकांपासून शासनापर्यंत सगळ्यांचे एकमत आहे. अनेक उत्तमोत्तम बाबींमुळे जगभरातील पर्यटकांना आकर्षून घेण्याची क्षमता भारतात आहे. याची जाणीव होऊन भारतीय पर्यटन विभागाने २००२ मध्ये "अतुल्य भारत !" , हे अभियान सुरु केले. या अभियानामुळे पर्यटन व्यवसायात निरंतर वृद्धी होत आहे. २०१०च्या आकडेवारी नुसार भारतात ५.५८ मिलियन विदेशी पर्यटक व ६५००૪ भारतातील पर्याटक यांनी भारतातील विविध पर्यटन स्थळांना भेटी दिल्या. पर्यटन व्यवसायाने २०१० मध्ये भारताला अंदाजे ६.२३% GDP. इतका व्यवसाय मिळवून दिला तर ८.७८% इतके रोजगार क्षेत्र निर्माण करून दिले.
२०१२च्या नोंदींनुसार भारतातील सात ताजमहाल , कोणार्क सूर्य मंदिर , नालंदा , स्वर्णमंदिर -अमृतसर , मीनाक्षी सुंदरेश्वर मंदिर , तवांगमठ , जैसलमेर किल्ला ही स्थाने पर्याटकप्रिय ठरली. २०१૪ पासून भारतीय प्रशासनाने व्हीसा धोरणांमध्ये अनेक अामूलाग्र बदल केले , ज्यामुळे विदेशी पर्यटकांना प्रवास करणे सोपे झाले. तेव्हापासून भारतीय पर्यटन व्यवसाय दिवसोंदिवस वाढत आहे.
भारताची भौगोलिक अतुल्यता =
जगात जवळ जवळ २३१ देश आहेत . त्यात भारत हा एकमेवाद्वितीय देश आहे.
भारताचे अधिकृत नाव भारत गणराज्य, इंग्रजीमध्ये ( Republic of India) आहे . भारत , दक्षिण आशियातील भारतीय उपमहाद्वीपातील सगळ्यात मोठा देश आहे .पूर्णपणे उत्तरगोलार्धात असलेला भारत, भौगोलिकदृष्ट्या विश्वातील सातवा सगळ्यात मोठा व लोकसंख्येच्या दृष्टीने जगातील दुसरा मोठा देश आहे. भारताच्या पश्चिम-उत्तर (वायव्य ) सीमेवर पाकिस्तान, उत्तर-पूर्वेला (नैऋत्य) चीन, नेपाल आणि भूतान , पूर्व सीमेवर बांग्लादेश आणि म्यान्मार हे देश आहेत . हिन्दी महासागर ह्याच्या दक्षिण दिशेला आहे. भारताच्या दक्षिण-पश्चिमेला मालदीव, दक्षिणेला श्रीलंका व दक्षिण-पूर्वेला इंडोनेशिया ,या देशाशी भारताच्या सामुद्रिक सीमा जुळलेल्या आहेत. भारताच्या उत्तरदिशेची सीमा हिमालय-पर्वताने व्याप्त आहे. तर दक्षिणेची सीमा हिन्दीमहासागर आहे . भारताच्या पूर्व दिशेला में बंगालची खाड़ी आहे तर पश्चिमेला अरबी समुद्र आहे. हिमालयातून उगम पावणारी गंगानदी पूर्वेकडे वाहत जाऊन जेथे समुद्राला मिळते ,तो गंगासागर . तर हिमालयातूनच उगम पावणारी सिंधुनदी जेथे सागराला मिळते तो सिंधुसागर होय.
जगातील मोजक्या पर्यावरण संपन्न देशांपैकी आपला भारत एक देश आहे. यात हिमाच्छादित प्रदेश , नदीखोरे , पर्वतीय प्रदेश , डोंगराळ प्रदेश , पठारी प्रदेश , वाळवंटी प्रदेश , मैदानी प्रदेश , समुद्र किनारी प्रदेश इत्यादी वैविध्य आहे.
भारतात सहा प्रकारचे हवामानी प्रदेश आहेत , जसे अल्पाईन (ध्रूवीय प्रदेशासम थंड) , उष्णकटीबंधीय , शीतोष्ण हवामान , आर्द्र हवामान ,अर्धशुष्क व शुष्क .
भारतातील हिमाच्छादित प्रदेश म्हणजे जम्मू-काश्मीर , सिक्किम , हिमाचलप्रदेश ,उत्तराखंड हे आहेत.
भारतात पुढील नदी खोरे प्रसिद्ध आहेत , जसे गंगाचे हजारो मैल पसरलेले सुपीक खोरे . या शिवाय नर्मदा , यमुना ,कावेरी , वैनगंगा ,कृष्णा ,सिंधु ,तापी , गोदावरी , प्राणहिता ,तुंगभद्रा , पेरियार ,चंबळ इत्यादी अनेक नद्यांच्या खो-यांमुळे भारत हा सुजल-सुफल व सस्यश्यामल झाला आहे यात शंकाच नाही.
राजस्थानातील थरचे वाळवंट हे जगातील प्रसिद्ध वाळवंटांपैकी एक आहे. त्याचे क्षेत्रफळ जवळजवळ १७५००० इतके किलोमिटर असून त्याचा काही भाग पाकिस्तानात आहे.
अंदमान-निकोबार , लक्षद्वीप ही द्वीपसमूहे भारताच्या भूवैविध्यात भर टाकतात.
भारतात ज्वालामुखी प्रवण प्रदेशही आहेत . दख्खनचे पठार , गुजराथ चा काही भाग , अंदमानातील काही भाग , हरियाणाचा काही भाग तसेच हिमालय पर्वत पायथ्याचा काही भाग असे भूभाग विशेषत्वाने सांगता येतील.
वसंत , ग्रीष्म , वर्षा ,शरद ,हेमंत , शिशिर असे सहाही ऋतु अनुभवायला मिळतात असा आपला भारतदेश आहे.
विविध भूरूपे ,भूप्रदेश ,विविध हवामान ,ऋतुचक्र इत्यादींच्या विविधतेमुळे भारत हा निसर्गसंपन्न देश आहे. जागतीक वारसा स्थळे म्हणून जाहीर केलेल्या युनेस्कोच्या यादीत ३० भारतीय-पर्यटन स्थळांना जागा मिळाली.
भारत एक राष्ट्र =
भारताचा राष्ट्रध्वज हा तिरंगा आहे. तर राष्ट्रवाक्य "सत्यमेव जयते" (संस्कृत) म्हणजे सत्याचाच विजय होतो. भारताचे राष्ट्रगान जन गण मन (हिन्दी) तर राष्ट्र गीत (संस्कृत)
वन्दे मातरम् हे आहे.
भारताची राजधानी नवी दिल्ली ही आहे . भारत हा बहुभाषिक देश आहे . भारतात जवळपास २०० प्रमुख भाषा व अंदाजे ८०० बोलीभाषा आहेत. जवळ जवळ ५८ भाषांमध्ये शालेय शिक्षण उपलब्ध आहे. भारतीय राज्यघटनेनुसार इंग्रजी भाषा आणि हिंदी भाषा केंद्र सरकारच्या व्यवहाराच्या अधिकृत भाषा आहेत . आठव्या अनुसूची नुसार भारतातील मान्यताप्राप्त राजभाषा बावीस भाषा आहेत.
अासामी , बंगाली , बोडो , गुजराथी ,डोगरी , कन्नड़, काश्मीरी , कोंकणी , मैथिली , मणिपुरी , मल्याळम , मराठी , नेपाळी , उडिया , पंजाबी , संस्कृत , संथाली , मैतेयी , सिन्धी , तामिळ , तेलुगू , उर्दू .
भारताची बहुभाषिकता हे भारताचे बलस्थान आहे.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
लंदन देखा
पैरिस देखा
और देखा जापान
माईकल देखा, एल्विस देखा
सब देखा मेरी जान
सारे जग में कहीं नहीं है दूसरा हिंदुस्तान
दूसरा हिंदुस्तान
ये दुनिया एक दुल्हन
दुल्हन के माथे की बिंदिया
ये मेरा इंडिया
आई लव माई इंडिया
आधुनिक काळातही भारत-प्रशंसेची अनेक फिल्मी ,गैरफिल्मी गाणी नव्या पिढीच्या तोंडी सहज बसलेली आहेत.
आसेतु-हिमाचल पसरलेला विस्तीर्ण देश म्हणजे भारत. भारत ,भारतदेश ,भारतवर्ष ,भारतमाता , हिंदुस्थान ,इंडिया अशा विविध नावांनी अोळखल्या जाणारा आपला हा विशाल देश .
आपल्या देशाचे मूळ नाव भारत , जे पुराणकाळातील एका पराक्रमी राजा (सम्राट भरत , दुष्यंत-शकुंतलेचा पुत्र) यांच्या नावावरून ठेवले गेले , असे म्हणतात. तर भारत या शब्दाची अशी ही व्युत्पत्ती करतात -> 'भा म्हणजे (ज्ञानाचे) तेज , रत म्हणजे मग्न" भारत म्हणजे नेहमीच ज्ञानाच्या तेजात मग्न असणारा देश.
असा आपला भारत देश जगातील अतिप्राचीन संस्कृती टिकवून ठेवलेला अद्वितीय देश आहे.
आज जगात अस्तित्वात असलेल्या अनेक देशांना स्वतःचा भूगोल आहे पण इतिहास नाही . काही देशांना भूगोल-इतिहास आहे पण संस्कृती नाही. तर काही देशांना भूगोल-इतिहास-संस्कृती असूनही वैविध्याने परिपूर्ण शाश्वत वारसा नाही. अशा मानवी जगांमध्ये माझा भारत देश भूगोल-इतिहास-संस्कृती-वैविध्यपूर्ण शाश्वत वारसा यांनी संपन्न आहे. लाखो-हजारों वर्षांचा समृद्ध वारसा असलेल्या भारताचा 'मी' नागरिक आहो , ही निर्विवादपणे सर्व भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे. ब्रह्मवैवर्त पुराण , खंड ૪ ,अध्याय ९७ यात म्हटले आहे ,
'दुर्लभं भारते जन्म , मानुषं तत्र दुर्लभम् ।
अनेकजन्म तपसा संभूय भारते द्विजः ॥
अर्थात भारतात जन्म मिळणे ही दुर्मिळ घटना आहे , त्यातही मानवीजन्म मिळणे अधिक दुर्लभ आहे. त्यातही अनेक जन्मांच्या तपश्चर्येनंतर द्विज (म्हणजे वेदादी ज्ञानार्जन करणारे ऋषी-मुनी ) या श्रेणीत जन्म लाभतो.
आधुनिक युगातील अतुल्य भारत = भारत हा भौगोलिक , सांस्कृतिक , ऐतिहासिक आदी अनेक आयामांनी अतिशय अतुलनीय व एकमेवाद्वितीय आहे. आता यातील एकेका आयामांचा विचार करू.
• भारताचे भौगोलिक स्थान असे वैशिष्ट्यपूर्ण आहे की येथे विविध ऋतु , नैसर्गिक स्थाने , हवामान-विभिन्नता , वैविध्यपूर्ण भूरूपे इत्यादी इत्यादी अनेक बाबींमधील वेगवेगळेपणा भरभरून दिसून येतो. भारत कोणत्या अक्षांश-रेखांश श्रेणीत येतो ? भारत कोणत्या कटिबंधात येतो ? भारतातील विविध भूरूपे व प्रसिद्ध स्थाने कोणती ? भारतातील जागतिक वारसास्थळे कोणती ? भारतातील प्रमुख नद्या व उपनद्या कोणत्या ? भारतातील खनिज संपत्ती , याविषयी पीपीटी तयार करा. भारतीय वन्यजीव-वैविध्य , यावर स्लाईडशो तयार करा . भारतातीय रेल्वे व भारतातील पर्वतावलींची नावे सांगा ? भारतातील पठारी प्रदेश व तेथील जीवनमान , याविषयी सचित्र प्रदर्शनी आयोजित करा. भारतीय समुद्र-किनारा व खाडी याविषयी माहिती संकलन करा . भारतातील अभयारण्ये व राखीव जंगल यांची सचित्र माहिती गोळा करा. थरचे वाळवंट व भारतीय जनजीवन यांच्यावर टीपा लिहा. भारतातील पर्यटनव्यवसायातील आवाहने व संधी यावर आपले मत काय ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे भारताताचे भौगोलिक अतुल्यत्व आपल्याला पुरेपुर जाणवून देतील. वरील सर्व प्रश्नांची उत्तरे माहितीच्या अधिकृत स्रोतातून गोळा करणे जास्त सयुक्तिक ठरेल.
• भारताचा गौरवशाली इतिहास विस्मयकारक आहे. परचक्राच्या आक्रमणामुळे जगातील अनेक देश , संस्कृती व धर्म धराशायी झाले . भारतातही पडझड झाली , बरीच हानीही झाली पण तरीही गरिमा आजही अबाधित आहे. आजही "भारत" उभा आहे कारण त्याचा भक्कम पाया अजूनही अबाधित आहे. भारतीय गौरवशाली इतिहास जाणून घ्यायचा असेल तर अधिकृत माहिती देणारे अनेक पुस्तके , वेबसाईट , सोशलमिडिया साईट उपलब्ध आहे. उदाहरणार्थ भारतीय शिक्षणमंडळ द्वारे प्रकाशित धर्मपालजी लिखित दहा पुस्तकांचा संच , लेखक श्री. प्रकाश पोळ यांचे , "भारतीय ज्ञानाचा खजिना" , फेसबुक कम्युनिटी पेज 'इतिहासाच्या पाऊलखुणा' इत्यादी. आपण सर्व भारतीय एका तेजस्वी ज्ञानपरंपरेचे वारस आहोत , हे आत्मभान सर्वांनाच असणे गरजेचे आहे .
श्री. प्रशांत पोळ यांच्या पुस्तकाच्या आधारे भारतीय इतिहासातील काही निवडक तथ्य इथे वानगी दाखल देत आहे.
१. पेशावर/रावळपिंडीपासून ते जावा-सुमात्रा (इंडोनेशिया) पर्यंतच्या भूभागावर सन २०० BC ते सन १००० अशी सुमारे १२०० वर्ष संस्कृत ही भाषा बोलली जायची.
२. 'तक्षशिला' विद्यापीठात जगभरातून विद्यार्थी शिकायला यायचे. चाणक्य, पाणिनी ही त्यापैकी काही विद्यार्थ्यांची नावे. जहाज बांधणी शास्त्रापासून वैद्यकापर्यंत आणि खगोल शास्त्रापासून धातू शास्त्रापर्यंत असे सुमारे २५ विषय तिथे शिकवले जायचे. एकावेळी १०,००० विद्यार्थी बसू शकतील एवढे मोठे तिथे सभागृह होते.
३. 'मगध' राज्यातले (आताचे बिहार) नालंदा विद्यापीठ ही असेच. चीनमधला युआन श्वांग तिथे राहून १० वर्षे शिकला आणि त्यावेळच्या बऱ्याच नोंदी त्याने करून ठेवल्या आहेत. पुढे १२०० साली खिलजीने ते विद्यापीठ जाळून टाकले आणि सगळे पुरावे नष्ट झाले.
४. आपला शिक्षण आणि व्यापार ह्या दोन्हीमध्ये जगात पहिला क्रमांक होता. एक्स्पोर्टसाठी जगात आपला २९% शेअर होता आणि आजतागायत हे रेकॉर्ड ब्रेक झाले नाही. युरोपिअन इतिहाज्ज्ञांनी तशा नोंदी त्यांच्या इतिहासात करून ठेवल्या आहेत.
५. कर्नाटकातले 'हंपी' हे शहर तर जवळपास जगाचीच राजधानी होते. (१४०० साल) त्याचं टाऊन प्लॅनिंग जागतिक दर्जाचं होतं. रस्त्यावर भाजी विकायला बसतात तसे लोक सोनं चांदी विकायला बसायचे आणि लोक भाजीपाल्यासारखे ते विकत घ्यायचे अशी नोंद परदेशातल्या इतिहासतज्ज्ञांनी करून ठेवली आहे.
६. 'ऋग्वेद' हा जगातला सगळ्यात जुना ग्रंथ. ५००० वर्षांपेक्षा जुना. त्यातल्या उपनिषदांमधल्या सूक्तांमध्ये आणि श्लोकांमध्ये सूर्याचे पृथीपासूनचे अंतर आणि प्रकाशाचा वेग लिहून ठेवला आहे.
७. 'सिरीभूवलय' ग्रंथ - हा ग्रंथ कोणत्याही भाषेत/ लिपीत लिहिलेला नाही तर अंकांमध्ये लिहिलेला आहे. हे अंक १ ते ६४ असे आहेत. ते विशिष्ट पद्धतीनं वाचले की विशिष्ट भाषेत विशिष्ट ग्रंथ वाचता येतो. मूळच्या १६,००० पानी ह्या ग्रंथापैकी १२७० पानेच सध्या उपलब्ध असून मूळ ग्रंथात ५६ अध्याय असताना त्यातल्या ३ अध्यायांचीच उकल (डी-कोडींग) आजपर्यंत होऊ शकली आहे. १८ लिप्या आणि ७१८ भाषांत हा ग्रंथ वाचता येतो. रामायण, महाभारत, वेद, उपनिषदे, गणित, खगोलशास्त्र, रसायनशास्त्र, इतिहास, वैद्यक, तत्वज्ञान ह्यासारख्या विषयांवरील ग्रंथदेखील त्यातच वाचता येतात.
८. 'कटपयादी' (सर्व अक्षरांना एक एक अंक देऊन त्याचं कोष्टक करून ती भाषा वापरण्याची संकल्पना म्हणजे 'कटपयादी' संख्या संकल्पना) सूत्राच्या मदतीने 'पाय' ह्या गणिती संकल्पनेबद्दलचं आपलं संशोधन, पायची किंमत दशांशाच्या ३१ व्या स्थानापर्यंत काढून ती एखाद्या श्लोकात एम्बेड करणं ह्यासारखी जबरदस्त माहिती पुस्तकात मिळते.
९. 'डोसा' हा पदार्थ २००० वर्ष जुना आहे तसेच मसाल्यांपासून ते रेशीम, धान्य इत्यादी आयटम्स सगळ्या जगात एक्स्पोर्ट व्हायचे.. ह्याबद्दलची सविस्तर माहिती पुस्तकात वाचायला मिळते.
१०. गुजरातेत असलेल्या सोमनाथ मंदिराजवळ एक स्तूप आहे जो ३००० वर्ष जुना आहे (कार्बन डेटिंग पद्धतीनुसार) आणि त्यावर एक संस्कृत श्लोक आहे. त्याचा अर्थ आहे 'इथून पुढे दक्षिण ध्रुवापर्यंत सरळ रेषा काढली असता मध्ये कोणताही मोठा भूखंड येत नाही'. ह्याचाच अर्थ आपले लोक जगभर फिरत होते. 'वास्को द गामा' हा त्याच्या जहाजापेक्षा पाच पट मोठ्या भारतीय जहाजांच्या मदतीनं भारतापर्यंत पोहोचला. मात्र भारताचा शोध त्यानं लावला असं आपला इतिहास आपल्याला शिकवतो ! १८०० सालच्या सुमारास ब्रिटिशांनी आपल्या जहाज बांधणी कारखान्यांना बंदी घातली आणि आपले जहाज बांधणी शास्त्राचे सर्व ज्ञान लयाला गेले.
११. थायलंड मधल्या एअरपोर्टवर समुद्र मंथनाचा मोठा देखावा उभा केला आहे. सिंगापूरचे आधीचे नाव सिंहपूर होते. यूरोपमध्ये बोलली जाणारी 'केल्टिक' भाषा, रशिया जवळच्या युक्रेन देशातल्या मुर्त्या, इराक-सीरिया प्रदेशातले 'येझदी' लोक, कंबोडिया, व्हिएतनाम मधली मंदिरे, शिल्पे ही सगळी भारतीय रूपे आहेत.
१२. प्लास्टिक सर्जरीचा शोध आपण लावला आहे आणि त्यालाही २००० वर्षे झाली.
• सांस्कृतिक भारत = संस्कृती हा शब्द अनेक अंगांनी योजला जातो. संस्कारांची सातत्याने ,पिढी दरपिढी जपणूक ज्यातून होते ती संस्कृती , असे ढोबळमानाने म्हणता येईल . संस्कृती ही रहाणीमान , भाषा , पेहराव , खानपान सवयी , रूढी ,परंपरा , सामाजिक रचना इत्यादींतून ठळकपणे जाणवते . बरेचदा धर्म व संस्कृत , धर्म व भाषा यांची सरमिसळ होते . ती होणे एका मर्यादे पर्यंत गरजेचेही आहे. पण कधी कधी जागतिक इतिहासात अशी काही उदाहरणे सापडतात की धर्मापेक्षा भाषा वा संस्कृती जास्त प्रभावी झालेली दिसते.
अनेक धर्मांची मुख्यालये वा उगमस्थांमध्ये पालन केल्या जाणारे धर्मसंस्कार , जगात अगदी तंतोतंत पालन केल्याच जातात , असे स्पष्ट आढळून येत नाही. किंबहुना देश-काल-परिस्थिती नुसार तेथे बदल अपरिहार्यच असतात. अशी अनेक उदाहरणे सहज सापडतात . त्यांची जंत्री करून मानवी समूह व त्यावरील धर्मप्रभावावर परिणाम करणारे घटक समजून घेणे रंजक उपक्रम तर आहेच , शिवाय मानवीबुद्धीची समायोजन क्षमता व समूहवर्तनाची मानसिकता यावरही प्रकाश टाकते.
वैदिक-संस्कृती पासून ते आजतागायत अनेक स्थित्यंतरे व सरमिसळ झालेला आपला देश आजही सांस्कृतिक-समायोजनात जगात अव्वल आहे. नवता स्वीकारण्याची भारतीयांची क्षमता अफाट आहे.
• भारताची खाद्य संस्कृती =
आसेतुहिमाचल पसरलेला आपला भारत सुजलाम् सुफलाम् असून खाद्यविविधतेने नटलेला आहे. धान्य-कडधान्ये -भाजीपाला , फळेफळावळे , सुकामेवा इत्यादी सर्वच बाबतीत वैविध्य दिसून येते. भारतातील प्रत्येक प्रांताची , भागाची स्वतःची वैशिष्ट्यपूर्ण खाद्यसंस्कृती आहे. वानगी दाखल काही भागातील खाद्यपदार्थांची संक्षिप्त माहिती देत आहे.
१. महाराष्ट्र - पुरणपोळी , झुणका-भाकरी, वांग्याचे भरीत हे प्रसिध्द आहेत . ज्वारी , बाजरीचे भाकरी , सर्व प्रकारचे कडधान्य पालेभाज्या यांचा समावेश असतो.
२ . दिल्ली - मुघलांची राजधानी असलेल्या दिल्लीत बादशाहांच्या काळात एकेकावेळी दीडशे प्रकारचे भात बनत होते. आज चांदणी चौकातील पराठे, काबाब, कचोरी, चत , कुल्फी हे खास पदार्थ आहेत.
३. गुजरात - शाक रोटी, खिचडी, कडी, दोकला, हंडवा, ठेपला, खाकरा हे गुजराती लोकप्रिय पदार्थ आहेत.
४. जम्मू- काश्मीर - काश्मिरी जेवणावर मध्य आशिया, उझबेकिस्तान येथील खाद्य संस्कृतीचा प्रभाव आहे. खाद्य दही, तेल, मसाले इत्यादींचा जास्त तर कांदा लसणाचा कमी वापर होतो.
५. दक्षिण भारत (आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक केरळ)- इथल्या साउथ इंडियन डिशेश जगप्रसिध्ध आहेत. इडली-सांबर, वडा- सांबर, नारळाची चटणी, भात, उथ्थप्प हे प्रसिध्द आहेत.
६. झारखंड- बेन्गणी चोप ही प्रसिध्ध डिश आहे. इथले भाहुतेक पदार्थ भातापासून बनवतात
७. मध्य प्रदेश- इंदोर उज्जैन येथे दुधाचा वापर मुबलक प्रमाणात होता. पोहे जिलेबी लस्सी उसाचा रस दल बाफला इत्यादींची खासियत आहे.
८. पश्चिम बंगाल- मासे भात मुख्य अन्न आहे त्याचप्रमाणे बंगाली मिठाई प्रसिध्द आहे.
९. बिहार - मिट्टी, चोखा हे सातूच पीठ, गव्हाच्या पीठाचे पदार्थ दल्पुरि, मालपुवा बालुशाही, हे पदार्थ प्रसिध्द आहे
१० ओडीसा - मांसाहार जास्त खाल्ला जातो. पख्ल, दल्मा, कट्टा, भात इत्यादी पदार्थ प्रसिद्ध आहे.
११ उत्तर प्रदेश - कबाब, कोरमा, बिर्याणी, रुमाली रोटी, पराठा इत्यादी पदार्थंचा समावेश असतो.
१२ मणिपूर - भात पालेभाज्या मासे मुख्य अन्न आहे. सोयाबीन चा जास्त वापर करतात. मणिपुरी लोक आपल्या दारात भाज्या पिकवतात.
१३ मेघालय- येथे लोणचे, मिनील सोंग, भाताचे पदार्थ प्रिय आहेत.
१४ पंजाब - पंजाबी जेवण जगभर प्रसिध्द आहे. पराठे, लस्सी पनीरच्या भाज्या मक्के कि रोटी, सरसो का साग, तंदुरी इत्यादी जेवणाची खासियत आहे.
१५ राजस्थान - बेसन चा मोठ्या प्रमाणात वापर करतात, दल भाती खाडी धीवर पनच्कुत ,लापशी, कदिबुन्दि बिकानेरी भुजिया दल्कचोरि प्रसिद्ध आहे.
१६ उत्तराखंड - पालक मेथीचा भरपूर वापर करतात डाळी कडधान्य सोयाबीन झोळी कापा रायते हे प्रसिद्ध पदार्थ आहे
१७ गोवा - मासांचे अनेक प्रकार करतात पाव सोलकडी मोगागाठी भात केक इत्यादी गोवन जेवणाची गोडी इथल्या पदार्थांना असते.
या प्रांतातील खाद्य वैशिष्ट्यांसह जाती-धर्मातील विशिष्ट खाद्य पदार्थ प्रख्यात आहेत. उदाहरणार्थ मारवाडी दालबाटी, कांजीवडे आदी ,ब्राह्मणी कढी , गोडामसाला , मुसलमानांचा शिरखुर्मा ,नागपुरचा सावजी जेवण , कोल्हापुरचा तांबडा-पांढरा रस्सा , छत्तीसगढी आदिवासींची लालमुंग्यांची चटणी , सारस्वतांचे सामिष पदार्थ , कोकणातील उकडीचे मोदक इत्यादी इत्यादी.
भारतात अतिप्राचिन काळापासून ते आज पर्यंत देशविदेशातील लोकं भारतात मसाल्याचे पदार्थ व विविध खाद्यपदार्थ यांच्या आकर्षणाने येत असतात.
• भारताची वस्त्र संस्कृती = खंडप्राय पसरलेल्या देशात अतिशय प्राचीन काळापासून वस्त्रवैविध्य आढळते. वनस्पतीजन्य धाग्यांपासून वस्त्र निर्मितीतर सामान्य आहेच शिवाय पशु-कीटक ,धातू , यांपासून धागे तयार करून त्यांच्या मिश्रणातून वस्त्र निर्मितीचे कौशल्य भारतातील प्राचीन कौशल्याचा नमुना आहे.
साडी हे भारतीय संस्कृतीतील महावस्त्र व मानबिंदू . त्यातील वैविध्य जगाला थक्क करते.
वेगवेगळ्या शैलीतील साड़्यांमध्ये कांजीवरम साड़ी, बनारसी साड़ी, पटोला साड़ी आणि हकोबा इत्यादी विशेष आहेत. मध्य प्रदेशाची चंदेरी, महेश्वरी, मधुबनी छपाई, आसामची मूंगा रेशमी , अोरिसाची बोमकई, राजस्थानाची बंधेज म्हणजे बांधणी व कोटा साडी , गुजरातची गठोडा, पटौला, बिहारची तसर, काथा, छत्तीसगढ़ची कोसा रेशमी, दिल्लीची रशमी साड़ी , झारखंडची कोसा साडी , महाराष्ट्राची पैठणी ,इरकल हिमरू, तमिलनाडुची कांजीवरम, उत्तर प्रदेशाची तांची, जामदानी, जामवर ए तसेच पश्चिम बंगालची बालूछरी व कांथा टंगैल आदी प्रसिद्ध साड़्या आहेत.
कोसा ,रेशीम ,खादी ,लोकर , जरतारी ,भरजरी ,पश्मिना , तात ,ज्युट असे अनेक धागे भारतात अतिशय प्राचीन काळापासून तयार केल्या जात असे. शिवाय धाग्यांना रंग देण्याचे कसबही बरेच जुने आहे. या शिवाय रेशमी-कापडी धग्यांमध्ये धातूचे पातळ तार करून वस्त्र निर्माण करण्याची कला हे तर भारतीय कौशल्याचे अद्वितीय प्रकटीकरण आहे.
अशा प्रकारे वस्त्रनिर्मितीतील अतुल्यता हा भारतीयांच्या प्राचीन वारश्याचाच परिपाक आहे.
भारताची अतुल्यता =
याशिवाय भारताची संस्कृती जाणून घेण्याची अनेक परिमाणे आहेत . त्यांची थोडक्यात यादी पुढील प्रमाणे
१) गीत-
२)वाद्य-
३) नृत्य
૪)चित्रकला
५)शिल्पकला
६) धातुकला
७) काष्ठ कला
९) रांगोळी
१०) मूर्तिकला
११) विहिर-तलाव बांधणी
१२) मंदिरस्थापत्य
१३) उद्यानविद्या
१૪) कलाकुसरीचे सामान निर्मिती
१५) पशुपालन व संगोपन
१६) मर्दन शास्त्र
१७) आयुर्वेद
१८) निसर्गोपचार
इत्यादी अनेक कौशल्ये भारतीयांना वंशपरंपरागत पद्धतीने आत्मगत झालेली आहेत. काळाच्या अोघात त्यातील अनेक कौशल्ये लुप्त होत आहेत. त्याचे पुनरुज्जीवन व विकसन करणे अत्यंत गरजेचे आहे.
भारताची अतुल्यता = आपला भारत हा जगातील एकमेवाद्वितीय देश आहे , याबद्दल सामान्य नागरिकांपासून शासनापर्यंत सगळ्यांचे एकमत आहे. अनेक उत्तमोत्तम बाबींमुळे जगभरातील पर्यटकांना आकर्षून घेण्याची क्षमता भारतात आहे. याची जाणीव होऊन भारतीय पर्यटन विभागाने २००२ मध्ये "अतुल्य भारत !" , हे अभियान सुरु केले. या अभियानामुळे पर्यटन व्यवसायात निरंतर वृद्धी होत आहे. २०१०च्या आकडेवारी नुसार भारतात ५.५८ मिलियन विदेशी पर्यटक व ६५००૪ भारतातील पर्याटक यांनी भारतातील विविध पर्यटन स्थळांना भेटी दिल्या. पर्यटन व्यवसायाने २०१० मध्ये भारताला अंदाजे ६.२३% GDP. इतका व्यवसाय मिळवून दिला तर ८.७८% इतके रोजगार क्षेत्र निर्माण करून दिले.
२०१२च्या नोंदींनुसार भारतातील सात ताजमहाल , कोणार्क सूर्य मंदिर , नालंदा , स्वर्णमंदिर -अमृतसर , मीनाक्षी सुंदरेश्वर मंदिर , तवांगमठ , जैसलमेर किल्ला ही स्थाने पर्याटकप्रिय ठरली. २०१૪ पासून भारतीय प्रशासनाने व्हीसा धोरणांमध्ये अनेक अामूलाग्र बदल केले , ज्यामुळे विदेशी पर्यटकांना प्रवास करणे सोपे झाले. तेव्हापासून भारतीय पर्यटन व्यवसाय दिवसोंदिवस वाढत आहे.
भारताची भौगोलिक अतुल्यता =
जगात जवळ जवळ २३१ देश आहेत . त्यात भारत हा एकमेवाद्वितीय देश आहे.
भारताचे अधिकृत नाव भारत गणराज्य, इंग्रजीमध्ये ( Republic of India) आहे . भारत , दक्षिण आशियातील भारतीय उपमहाद्वीपातील सगळ्यात मोठा देश आहे .पूर्णपणे उत्तरगोलार्धात असलेला भारत, भौगोलिकदृष्ट्या विश्वातील सातवा सगळ्यात मोठा व लोकसंख्येच्या दृष्टीने जगातील दुसरा मोठा देश आहे. भारताच्या पश्चिम-उत्तर (वायव्य ) सीमेवर पाकिस्तान, उत्तर-पूर्वेला (नैऋत्य) चीन, नेपाल आणि भूतान , पूर्व सीमेवर बांग्लादेश आणि म्यान्मार हे देश आहेत . हिन्दी महासागर ह्याच्या दक्षिण दिशेला आहे. भारताच्या दक्षिण-पश्चिमेला मालदीव, दक्षिणेला श्रीलंका व दक्षिण-पूर्वेला इंडोनेशिया ,या देशाशी भारताच्या सामुद्रिक सीमा जुळलेल्या आहेत. भारताच्या उत्तरदिशेची सीमा हिमालय-पर्वताने व्याप्त आहे. तर दक्षिणेची सीमा हिन्दीमहासागर आहे . भारताच्या पूर्व दिशेला में बंगालची खाड़ी आहे तर पश्चिमेला अरबी समुद्र आहे. हिमालयातून उगम पावणारी गंगानदी पूर्वेकडे वाहत जाऊन जेथे समुद्राला मिळते ,तो गंगासागर . तर हिमालयातूनच उगम पावणारी सिंधुनदी जेथे सागराला मिळते तो सिंधुसागर होय.
जगातील मोजक्या पर्यावरण संपन्न देशांपैकी आपला भारत एक देश आहे. यात हिमाच्छादित प्रदेश , नदीखोरे , पर्वतीय प्रदेश , डोंगराळ प्रदेश , पठारी प्रदेश , वाळवंटी प्रदेश , मैदानी प्रदेश , समुद्र किनारी प्रदेश इत्यादी वैविध्य आहे.
भारतात सहा प्रकारचे हवामानी प्रदेश आहेत , जसे अल्पाईन (ध्रूवीय प्रदेशासम थंड) , उष्णकटीबंधीय , शीतोष्ण हवामान , आर्द्र हवामान ,अर्धशुष्क व शुष्क .
भारतातील हिमाच्छादित प्रदेश म्हणजे जम्मू-काश्मीर , सिक्किम , हिमाचलप्रदेश ,उत्तराखंड हे आहेत.
भारतात पुढील नदी खोरे प्रसिद्ध आहेत , जसे गंगाचे हजारो मैल पसरलेले सुपीक खोरे . या शिवाय नर्मदा , यमुना ,कावेरी , वैनगंगा ,कृष्णा ,सिंधु ,तापी , गोदावरी , प्राणहिता ,तुंगभद्रा , पेरियार ,चंबळ इत्यादी अनेक नद्यांच्या खो-यांमुळे भारत हा सुजल-सुफल व सस्यश्यामल झाला आहे यात शंकाच नाही.
राजस्थानातील थरचे वाळवंट हे जगातील प्रसिद्ध वाळवंटांपैकी एक आहे. त्याचे क्षेत्रफळ जवळजवळ १७५००० इतके किलोमिटर असून त्याचा काही भाग पाकिस्तानात आहे.
अंदमान-निकोबार , लक्षद्वीप ही द्वीपसमूहे भारताच्या भूवैविध्यात भर टाकतात.
भारतात ज्वालामुखी प्रवण प्रदेशही आहेत . दख्खनचे पठार , गुजराथ चा काही भाग , अंदमानातील काही भाग , हरियाणाचा काही भाग तसेच हिमालय पर्वत पायथ्याचा काही भाग असे भूभाग विशेषत्वाने सांगता येतील.
वसंत , ग्रीष्म , वर्षा ,शरद ,हेमंत , शिशिर असे सहाही ऋतु अनुभवायला मिळतात असा आपला भारतदेश आहे.
विविध भूरूपे ,भूप्रदेश ,विविध हवामान ,ऋतुचक्र इत्यादींच्या विविधतेमुळे भारत हा निसर्गसंपन्न देश आहे. जागतीक वारसा स्थळे म्हणून जाहीर केलेल्या युनेस्कोच्या यादीत ३० भारतीय-पर्यटन स्थळांना जागा मिळाली.
भारत एक राष्ट्र =
भारताचा राष्ट्रध्वज हा तिरंगा आहे. तर राष्ट्रवाक्य "सत्यमेव जयते" (संस्कृत) म्हणजे सत्याचाच विजय होतो. भारताचे राष्ट्रगान जन गण मन (हिन्दी) तर राष्ट्र गीत (संस्कृत)
वन्दे मातरम् हे आहे.
भारताची राजधानी नवी दिल्ली ही आहे . भारत हा बहुभाषिक देश आहे . भारतात जवळपास २०० प्रमुख भाषा व अंदाजे ८०० बोलीभाषा आहेत. जवळ जवळ ५८ भाषांमध्ये शालेय शिक्षण उपलब्ध आहे. भारतीय राज्यघटनेनुसार इंग्रजी भाषा आणि हिंदी भाषा केंद्र सरकारच्या व्यवहाराच्या अधिकृत भाषा आहेत . आठव्या अनुसूची नुसार भारतातील मान्यताप्राप्त राजभाषा बावीस भाषा आहेत.
अासामी , बंगाली , बोडो , गुजराथी ,डोगरी , कन्नड़, काश्मीरी , कोंकणी , मैथिली , मणिपुरी , मल्याळम , मराठी , नेपाळी , उडिया , पंजाबी , संस्कृत , संथाली , मैतेयी , सिन्धी , तामिळ , तेलुगू , उर्दू .
भारताची बहुभाषिकता हे भारताचे बलस्थान आहे.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
No comments:
Post a Comment