.
पूर्वार्ध
जगात सद्गुणांना प्रतिष्ठा मिळाली तुझ्याच मुळे.
तूच नात्यांचे सुंदर बंध जपायला शिकविले.
त्यागाची परिसीमा स्वचारित्र्यातून गाठलीस तू .
वै-याशीही कसे वागावे हे ही शिकविलेस तू.
सर्व सुरळीत असताही अल्पसंख्यांकाच्या आरोपास बधला.
बहुसंख्य सोबत असूनही , असंतुष्टांना झेलत बसला.
स्वतःच्या चांगुलपणात तुझा तूच अडकला.
परिटाचे काय गेले? आप्त-स्वकीय भरडला.
कर्तव्यकठोर भूमिकेने तुझ्या अर्धांगिनीची परवड झाली.
पितृगृही जन्माच्या हक्कापासून लवकुशही वंचित झाली .
कळवळले मन सीतेचे पण तिने सारे पचवले.
शेवटी सल उरात ठेऊन तिथेच भूम्यार्पण केले.
सर्व दुःख , सर्व सल पचवून तू रामराज्य घडवण्यात मग्न झाला .
सर्वस्व अर्पून , लोकरंजनात रमला न् जनहृदयी राम झाला.
जन मनात वसला राम , अयोध्या मात्र आढ्य झाली.
जिथे तिथे शंकासुराचा बाणा उगारत सुटली.
तू होता तोपर्यंत सर्वत्र राम होता
नंतर केवळ नावातच सत्य उरला.
उत्तरार्ध
तू होता तोपर्यंत सर्वत्र राम होता
नंतर केवळ नावातच सत्य उरला.
असे वाटून प्रतिष्ठितकलियुगात अयोध्या शेफारली.
सीताचारित्र्य सोडा चक्क जन्मभूमीवरच शंका घेऊ लागली.
तेव्हा सुद्धा अल्पसंख्यांकरंजन केले होते रामानी.
तोच वसा चालविला नंतर येणा-या शासकांनी.
दुष्टांचे काय गेले ?आरोपास्त्र उगारत सुटले .
वर्षानुवर्षे तेच सल , तेच पीळ, जनतेनी अनुभवले.
सीतेचा वसा जपत भूमी दान करून टाका.
निर्लज्ज आरोपकर्त्यांनी असा सूर लावला .
न्यायालयातील अग्निपरीक्षा शेकडो वर्षे चालली.
आरोपकांची हवस तरीही संपता संपली नाही.
तेव्हा एकच परिट होता , आता हजारो झाले.
त्रेतायुगातून कलियुगात प्रगत पुरोगामी झाले .
न्याय झाला , मुक्त झाली जन्मभूमी प्रिय रामाची.
आरोपकांना बक्षिसी द्या हो सीताजन्मस्थानाची .
धरणीमाते उदार होऊन घे की त्यांना पोटात.
शंकासुरांचा नाश करूनि यावे रामराज्य विश्वात .
मर्यादापुरुषोत्तमच्या मंदिराची अयोध्येत स्थापना व्हावी.
कोदंडधारी रामाने आक्रमकांना कायमची अद्दल घडवावी.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे
५.८.२०२०
नागपूर
No comments:
Post a Comment