एक लेख लिहिण्यासाठी काही जुन्या कविता गुगळत होती. "पृथ्वीचे प्रेमगीत" ही आवडती कविता दिसली. अजुनही बिचारी तेच गीत गात असेल कां ? विरहाने उपेक्षेने तुटून गेली नसेल कां ?? असा विचार आला न् शब्दात व्यक्त झाला.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
पृथ्वीची विराणी
पृथ्वीच मी न् तू सूर्य तारा
कर्तृत्वयुक्त तुझा दरारा ॥१॥
तू सूर्य तूला कधी हे कळेना
तू पोषवी या मर्त्य जीवाना॥२॥
कशी ,कां तुझ्या मी कक्षेत आली
माझेच मला मी मिटवून गेली॥३॥
विरही तुझ्या मी झाली रे दग्ध
भावनाही थिजल्या होवोनि स्तब्ध॥૪॥
प्रेमगीताची आता झालीय विराणी
कधी रे उगा कां छेडली तराणी॥५॥
©डॉ. प्रज्ञा देशपांडे
Sundar
ReplyDeleteधन्यवाद
Deleteसुंदर
ReplyDeleteधन्यवाद
Delete