#सहजोक्त.
🙏गुरुपोर्णिमा🙏
सन्ति मे गुरवो राजन् बहवो बुद्धयुपाश्रिता:
यतो बुद्धिमुपादाय मुक्तोsटामीह ताञ्छृणु॥ ३२॥
पृथिवी वायुराकाशमापोsग्निश्चन्द्रमा: रवि:
कपोतोsजगर: सिन्धु: पतङ्गो मधुकृद् गज:॥३३॥
मधुहा हरिणो मीन: पिङ्गला कुररोsर्भक:
कुमारी शरकृत् सर्प ऊर्णनअभि: सुपेशकृत् ॥३४॥
एते मे गुरवो राजंश्चतुर्विंशतिराश्रिता:
शिक्षा वृत्तिभिरेषामन्वशिक्षमिहात्मन:॥३५॥
श्रीमद्भागवताच्या एकादश स्कंधाच्या सप्तमाध्यातील या ओळी आहेत. हा अध्याय "अवधूतोपाख्यान" नावाने प्रसिद्ध आहे. यदुराजाने ज्ञानसंपूर्ण,तरूण,तेजस्वी ,त्रिकादर्शी अवधूताला निर्भय व मुक्तपणे वावरताना पाहून ," आपण विद्वान असून निष्पाप बालकासमान शुद्ध-सात्विक बुद्धी कुठून प्राप्त केली "?असे विचारले , त्यावरचे उत्तर म्हणजे वर दिलेले श्लोक अाहेत.
याच अवधूताला पुढे दत्तोपासकांनी श्रीदत्तगुरू म्हटले. जगाचे गुरुतत्त्व म्हणजे श्रीगुरुदेवदत्त. त्यांना ज्ञानप्राप्तिसाठी चोवीस गुरुंची गरज पडली.सारी सत्ता,ऐश्वर्य ,तारूण्य,शक्ती असून जगात अलिप्त-विरक्त -निरागसपणे निर्भय जगण्याचे ज्ञान त्यांना या गुरुंनी शिकविले. गुरुंनी शिकवले म्हणण्यापेक्षा अवधूत स्वयंप्रज्ञेने शिकले हे जास्त सयुक्तिक ठरेल.
त्याकाळात (आपल्या आधुनिक नजरेने) जास्त विकास (भौतिक) नव्हता ,असे मानले तर ; आज सर्वच कक्षा रुंदावल्या आहेत हे स्वीकारणे गरजेचे आहे. "तंत्रविद्येचा सुकाळू" झालाय. वायफाय सगळीकडे हवेच स्टे कनेक्टेड साठी. मग ज्ञानप्राप्तिसाठी त्याचा मुक्त वापर करावा ना!
जर श्रीदत्तात्रेयांना २४ गुरू लागले तर आपल्या सारख्या सामान्यांना किती ? सोपे त्रैराशिक मांड़ावे ज्याचे त्याने. क्षणाक्षणाने ज्ञानकण वेचावेत नि ज्या स्रोतापासून ते ग्रहण केले त्या गुरुतत्वाला मनोमन कृतज्ञतेने नमावे. हीच खरी गुरुदक्षिणा,शिष्यभाव.
तेच खरे गुरुवंदन.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
नागपूर
९.०७.२०१७
रविवार.
🙏गुरुपोर्णिमा🙏
सन्ति मे गुरवो राजन् बहवो बुद्धयुपाश्रिता:
यतो बुद्धिमुपादाय मुक्तोsटामीह ताञ्छृणु॥ ३२॥
पृथिवी वायुराकाशमापोsग्निश्चन्द्रमा: रवि:
कपोतोsजगर: सिन्धु: पतङ्गो मधुकृद् गज:॥३३॥
मधुहा हरिणो मीन: पिङ्गला कुररोsर्भक:
कुमारी शरकृत् सर्प ऊर्णनअभि: सुपेशकृत् ॥३४॥
एते मे गुरवो राजंश्चतुर्विंशतिराश्रिता:
शिक्षा वृत्तिभिरेषामन्वशिक्षमिहात्मन:॥३५॥
श्रीमद्भागवताच्या एकादश स्कंधाच्या सप्तमाध्यातील या ओळी आहेत. हा अध्याय "अवधूतोपाख्यान" नावाने प्रसिद्ध आहे. यदुराजाने ज्ञानसंपूर्ण,तरूण,तेजस्वी ,त्रिकादर्शी अवधूताला निर्भय व मुक्तपणे वावरताना पाहून ," आपण विद्वान असून निष्पाप बालकासमान शुद्ध-सात्विक बुद्धी कुठून प्राप्त केली "?असे विचारले , त्यावरचे उत्तर म्हणजे वर दिलेले श्लोक अाहेत.
याच अवधूताला पुढे दत्तोपासकांनी श्रीदत्तगुरू म्हटले. जगाचे गुरुतत्त्व म्हणजे श्रीगुरुदेवदत्त. त्यांना ज्ञानप्राप्तिसाठी चोवीस गुरुंची गरज पडली.सारी सत्ता,ऐश्वर्य ,तारूण्य,शक्ती असून जगात अलिप्त-विरक्त -निरागसपणे निर्भय जगण्याचे ज्ञान त्यांना या गुरुंनी शिकविले. गुरुंनी शिकवले म्हणण्यापेक्षा अवधूत स्वयंप्रज्ञेने शिकले हे जास्त सयुक्तिक ठरेल.
त्याकाळात (आपल्या आधुनिक नजरेने) जास्त विकास (भौतिक) नव्हता ,असे मानले तर ; आज सर्वच कक्षा रुंदावल्या आहेत हे स्वीकारणे गरजेचे आहे. "तंत्रविद्येचा सुकाळू" झालाय. वायफाय सगळीकडे हवेच स्टे कनेक्टेड साठी. मग ज्ञानप्राप्तिसाठी त्याचा मुक्त वापर करावा ना!
जर श्रीदत्तात्रेयांना २४ गुरू लागले तर आपल्या सारख्या सामान्यांना किती ? सोपे त्रैराशिक मांड़ावे ज्याचे त्याने. क्षणाक्षणाने ज्ञानकण वेचावेत नि ज्या स्रोतापासून ते ग्रहण केले त्या गुरुतत्वाला मनोमन कृतज्ञतेने नमावे. हीच खरी गुरुदक्षिणा,शिष्यभाव.
तेच खरे गुरुवंदन.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
नागपूर
९.०७.२०१७
रविवार.
Nice information mam
ReplyDeleteधन्यवाद.
ReplyDelete