आईन्स्टाईनची आई.
जगद्विख्यात शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन , सर्वज्ञात आहेतच . त्यांचा सापेक्षता सिद्धांत विज्ञानापासून , सामान्यव्यवहार तसेच आध्यात्म वगैरेतही लागू पडतो. आधुनिक विज्ञानातील त्यांचे योगदान अद्वितीय आहे.
भारतात वैज्ञानिक व मूलसंशोधक , चिकित्सक अभ्यासक कां तयार होत नाहीत ? याची अनेक करणं अतिशय परखड तार्किकतेने अनेक जण मांडतांना दिसतात.
रूढीवाद , गतानुगतिकता , अतिश्रद्धा , देवलासीपण वगैरे वगैरेंवर (विशेष करून हिंदुंच्या अस्मितेवर ) ठपका ठेवला जातो. यात अजिबातच तथ्यांशच नाही , असे नाही. पण याच कारणांनी वैज्ञानिक मानसिकता घडत नाही , हे मात्र धादांत खोटे आहे. गेल्या ७६ वर्षांत आपण वैज्ञानिक मानसिकता निर्माण करू शकलो नाही आणि त्याचे खापर हजारो वर्षांच्या बऱ्या-वाईट सवयींवर फोडणे , योग्य नाहीच.
'महान् विभूती जन्माला यावेत पण ते शेजाऱ्याच्या घरी' कारण त्यासंबंधीची तोशीष , कष्ट , हाल-अपेष्टा किंवा अपमान सहण्याची ताकद गमावून बसलो असतो , आपण.
म्हणून वैज्ञानिक , मूलभूत चिंतक आपल्या देशात कमी प्रमाणात असतात. आहेत त्यांचाही सन्मान रखण्यात आपली दानत कमी पडते. असो.
मध्यंतरी कुठेतरी वाचलेली कथा थोडक्यात अशी -
ख्यातकीर्त व लब्धप्रसिद्ध झाल्यावर आईंन्स्टाईन आपल्या आईच्या घरी येतो. त्याची लाडकी आई स्वर्गवासी झालेली असते. आईचे कपाट आवरताना त्याला त्याची शाळा सोडल्याचा दाखला व हेडमास्तराचे पत्र दिसते. तो पत्र वाचतो व डोळ्यातून घळघळ पाणी यायला लागते. त्याला सारं बालपण लख्ख आठवतं. लहानपणी त्याची शाळा सुटते. आणि आई त्याला घरी शिकवते. 'आई , मी शाळेत कां नाही जायचं ?' हे विचारणाऱ्या बाल-आईन्स्टाईनला आई नेहमी समजावत असते की ,' बेटा , तुझ्या हेडमास्तरांनी सांगितले की तू विशेष बुद्धिमान आहेस आणि सामान्य मुलांसारखे सर्वसामान्य शिक्षण तुला नको द्यायला. म्हणून तुझी विशेष तयारी मीच करून घेते.' छोटा अल्बर्ट विश्वास ठेवतो व आईच्या मार्गदर्शनात प्रगती करतो. पुढे विख्यात विद्यापीठातून उच्चशिक्षण घेतो...... हातातील चिठ्ठी गळून पडलेली असते. चिठ्ठीत लिहिले असते की , ' इतक्या निर्बुद्ध मुलाला आम्ही शिकवू शकत नाही'.
जगाला महान् वैज्ञानिक लाभला , तो नक्कीच त्याच्या बुद्धी, चिकाटी , कष्ट व धैर्यामुळे ; यात शंका नाहीच . पण विचार करा , हेडमास्टरांच्या शेऱ्याने आई खचून गेली असती किंवा निराशेतून समोर शिकणं बंदच केलं असतं किंवा मुलावर वैतागून त्याला सरळ कामधंद्याला लावलं असतं तर ?
शिक्षण, विज्ञान, देवतावाद वगैरे वगैरेंच्या पलीकडे आहे मानवी संवेदना. संवेदनेतून समोरच्यामध्ये सर्जकता , अभियोग्यता निर्माण करणे म्हणजे खरी अध्यापन प्रक्रिया आहे. बाकी शाळा, ट्यूशन , पुस्तके, गॅजेट्स वगैरे साधनं आहेत.
आईन्स्टाईन घडवणारे शिक्षण देण्यापेक्षा घरोघरी , प्रत्येकाची 'आईन्स्टाईनची आई' ही मानसिकता घडवली तर ?
विचार करा व प्रतिक्रिया द्या.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
छान.
ReplyDeleteधन्यवाद
ReplyDeleteअगदी खरं...
ReplyDeleteधन्यवाद
Deleteधन्यवाद
Deleteआईने स्वतः तसे विचार करायला शिकलं पाहिजे .
ReplyDeleteधन्यवाद
Deleteधन्यवाद
Deleteखूप वेळा आईच तर अपत्याच भविष्य घडवित असते !
ReplyDeleteधन्यवाद
ReplyDelete