२३.१.२०१७
पिक्चर-एक पाहाणे.
आज शेवटचा पेपर...संपेल परीक्षा..आनंद..
त्याहून अधिक आनंद ,,,उद्या बाबा आम्हा भावंडांना पिक्चर दाखवणार आहेत याचा व्हयचा.
कारण दरवर्षी प्रमाणे वर्षाला फक्त एकच सिनेमा बाबा दाखवायचे .वर्षभर चातकासारखी वाट पहायची.टिव्ही नव्हते ,बाकीची "माहितीतंत्रज्ञान साधने"गावी नव्हतीच.
पिक्चर नव्हे पिच्चर,सिनेमा नाही सिनिमा,टॉकिज नाही टाकिज,थिएटर नाही थेटर ...पण आनंद मात्र किंचितही कमी नव्हता.
तिकिट मिळेल ना?? की एडव्हांसबुकिंग करायचे? हा मोठ्या भावाला पडणारा प्रश्न.
आम्ही बेफिकिर."सिनेमा पाहायचा" इतकच स्पष्ट ध्येय !
कुठे? किती वाजताचा?कोण्या दिवशीचा??बाल्कनी की थर्डक्लास??असले फ़ालतु स्टेटसवाले प्रश्न कधीच डोक्यात येत नसत.
घरी येणारे पाहूणे परतताना लहानभावाच्या हाती एक रुपाया ठेवायचे. पोळ्याला दोन्ही भावंडं फ़िर फ़िर फिरायचे बैल घेऊन,,,बोजारा जमायचा पाSSच रूपये.कधी चुकून अतिश्रीमंत नि उदार पाहूणे आले तर दहा रूपये हाती पडायचे. असे सगळे पैसे साठवून ठेवायचे.
चिल्लर मोह म्हणजे नंबरवाली कुल्फी,आईसगोला,पानिपुरी,भेळ,जेम्स वगैरे टाळायचे वर्षभर ...कारण उन्हाळी सुट्ट्यात खूप (म्हणजे २ किंवा तीन) सिनिमे पहायचे अाहेत.
एरवी वर्षभर भावंडांची "टॉम &जेरी" आपापसात कायम असायचे.सारखे तूतूमैमै असणारच. पण "पिच्चर" हा वादातीत विकपॉईंट.साठवलेले पैसे जरा जास्त खुळखुळले तर आई मागायची तिला अडचण असेल तेव्हा.परतीच्या कबूलीने द्यायचो.कधी परत मिळायचे .कधी "चांगले नाही वागले ",शिक्षा म्हणून पैसे जप्त..ना बालहक्क ना बालहट्ट . जास्त आक्रस्ताळेपणा करताय कां रे??म्हणून अधिक शिक्षा( प्रसंगानुरूप) मिळण्याची शक्यता जास्त.
आम्ही तीन भावंड ,,, शेजारी समवयस्क दोघे जण. असे साधारण पाच जण मिळून उन्हाळ्यात सिनेमा बघायला जायचो.
तेव्हा पाहिलेले प्रत्येक सिनिमे आठवतात. म्हणजे कथानक जास्त नाही आठवत पण सिनेमा पाहाण्यासाठी केलेली मेहनत कायम स्मरणात आहे.
शान नावाचा त्याकाळी बिगबजेट(लाखरूपये खर्च करून तयार झालेला)गाजलेला पिक्चर पहायला आम्ही गेलो,,तीन भावंड नि शेजारचा मुलगा. सकाळी ९चा शो ,"भारी भीड मे चल रहा है"माहित असल्यामुळे सकाली सातलाच घरातून पायी पायी निघालो. लाईनीत उभे झाले भाऊ. मला लेडिजच्या लाईनीत उभे केले. लहान भाऊ लक्ष ठेऊन होता ,कोणाचा नंबर पहिले लागेल त्याला धाव्वत जाऊन पैसे द्यायचे. जसं खिडकीशी आली तसं तिकिटं संपलेली. ९चा शो पार फुल्ल.मग काय १२च्या शोच्या लाईनीत लागलो. तोही नाही मिळाला.भूक लागलेली,,१रूपया प्लेट समोसे ,,दोन प्लेट घेऊन चौघांनी खाल्ले. पैसे कमी पडत होते. मग थोड्या अंतरावर मामा आजोबांची बँक होती. त्यांना मागायला गेलो.पिच्चर तर पाहायचाच होता. तेव्हा सुदैवाने मोबाईल तर नव्हतेच शिवाय घरोघरी फोन पण नव्हते. घरच्यांना कळवावे इतकी अक्कलही त्या धुंदीत नव्हती. शिवाय मोठा भाऊ(दीड वर्ष मोठा) सोबत म्हणजे फार सुरक्षितच की.शेवटी ३ ते ६ च्या शोची तिकिटं मिळाली.
मस्तच पिच्चर होता."जिते है शान से....मरते है शान से" गाणं... तो शाकाल... ती फायटिंग... वॉव मस्तच .... तहान भूक सगळे विसरून पिच्चर एंजॉय केला चौघांनी.
परतलो घरी ,सकाळी सात ते सायंकाळी सात "बेबीज् डे आऊट" सारखे.दारात पाऊल ठेवल्या बरोबर आजीने थोबकाडात दे दणाण केले.कॉलनीतील शेजारी पाजारी गोळा झालेले होते.मुले हारवली की काय? अशी काळजी होती त्यांना. आम्ही "शानसे" आलो नि आमची पार "शानच" घालवली घरच्यांनी.
शालेय जीवनात मोजून ५ /६ सिनिमे पाहिले असतील,भावंडांनी मिळून.
प्रत्येक पाहाणे अविस्मरणीयच आहे.
आज साधनसंपन्नता प्रचंड आहे. लग्झुरिअस टॉकिज आहेत. नेटबुकिंगची सोय आहे. पण लहानपणचे ते थ्रिल नाहीच.
मध्यमवर्गातिल ते श्रीमंत क्षण आज लखपती/ करोडपती असलेले भावंड अजूनही विकत घेऊ शकलो नाही.........,
श्रीमंतीतील गरीबीची किव येते.
गेले ते दिवस... राहिल्या त्या आठवणी.
©डॉ.प्रज्ञा देशपांडे.
पिक्चर-एक पाहाणे.
आज शेवटचा पेपर...संपेल परीक्षा..आनंद..
त्याहून अधिक आनंद ,,,उद्या बाबा आम्हा भावंडांना पिक्चर दाखवणार आहेत याचा व्हयचा.
कारण दरवर्षी प्रमाणे वर्षाला फक्त एकच सिनेमा बाबा दाखवायचे .वर्षभर चातकासारखी वाट पहायची.टिव्ही नव्हते ,बाकीची "माहितीतंत्रज्ञान साधने"गावी नव्हतीच.
पिक्चर नव्हे पिच्चर,सिनेमा नाही सिनिमा,टॉकिज नाही टाकिज,थिएटर नाही थेटर ...पण आनंद मात्र किंचितही कमी नव्हता.
तिकिट मिळेल ना?? की एडव्हांसबुकिंग करायचे? हा मोठ्या भावाला पडणारा प्रश्न.
आम्ही बेफिकिर."सिनेमा पाहायचा" इतकच स्पष्ट ध्येय !
कुठे? किती वाजताचा?कोण्या दिवशीचा??बाल्कनी की थर्डक्लास??असले फ़ालतु स्टेटसवाले प्रश्न कधीच डोक्यात येत नसत.
घरी येणारे पाहूणे परतताना लहानभावाच्या हाती एक रुपाया ठेवायचे. पोळ्याला दोन्ही भावंडं फ़िर फ़िर फिरायचे बैल घेऊन,,,बोजारा जमायचा पाSSच रूपये.कधी चुकून अतिश्रीमंत नि उदार पाहूणे आले तर दहा रूपये हाती पडायचे. असे सगळे पैसे साठवून ठेवायचे.
चिल्लर मोह म्हणजे नंबरवाली कुल्फी,आईसगोला,पानिपुरी,भेळ,जेम्स वगैरे टाळायचे वर्षभर ...कारण उन्हाळी सुट्ट्यात खूप (म्हणजे २ किंवा तीन) सिनिमे पहायचे अाहेत.
एरवी वर्षभर भावंडांची "टॉम &जेरी" आपापसात कायम असायचे.सारखे तूतूमैमै असणारच. पण "पिच्चर" हा वादातीत विकपॉईंट.साठवलेले पैसे जरा जास्त खुळखुळले तर आई मागायची तिला अडचण असेल तेव्हा.परतीच्या कबूलीने द्यायचो.कधी परत मिळायचे .कधी "चांगले नाही वागले ",शिक्षा म्हणून पैसे जप्त..ना बालहक्क ना बालहट्ट . जास्त आक्रस्ताळेपणा करताय कां रे??म्हणून अधिक शिक्षा( प्रसंगानुरूप) मिळण्याची शक्यता जास्त.
आम्ही तीन भावंड ,,, शेजारी समवयस्क दोघे जण. असे साधारण पाच जण मिळून उन्हाळ्यात सिनेमा बघायला जायचो.
तेव्हा पाहिलेले प्रत्येक सिनिमे आठवतात. म्हणजे कथानक जास्त नाही आठवत पण सिनेमा पाहाण्यासाठी केलेली मेहनत कायम स्मरणात आहे.
शान नावाचा त्याकाळी बिगबजेट(लाखरूपये खर्च करून तयार झालेला)गाजलेला पिक्चर पहायला आम्ही गेलो,,तीन भावंड नि शेजारचा मुलगा. सकाळी ९चा शो ,"भारी भीड मे चल रहा है"माहित असल्यामुळे सकाली सातलाच घरातून पायी पायी निघालो. लाईनीत उभे झाले भाऊ. मला लेडिजच्या लाईनीत उभे केले. लहान भाऊ लक्ष ठेऊन होता ,कोणाचा नंबर पहिले लागेल त्याला धाव्वत जाऊन पैसे द्यायचे. जसं खिडकीशी आली तसं तिकिटं संपलेली. ९चा शो पार फुल्ल.मग काय १२च्या शोच्या लाईनीत लागलो. तोही नाही मिळाला.भूक लागलेली,,१रूपया प्लेट समोसे ,,दोन प्लेट घेऊन चौघांनी खाल्ले. पैसे कमी पडत होते. मग थोड्या अंतरावर मामा आजोबांची बँक होती. त्यांना मागायला गेलो.पिच्चर तर पाहायचाच होता. तेव्हा सुदैवाने मोबाईल तर नव्हतेच शिवाय घरोघरी फोन पण नव्हते. घरच्यांना कळवावे इतकी अक्कलही त्या धुंदीत नव्हती. शिवाय मोठा भाऊ(दीड वर्ष मोठा) सोबत म्हणजे फार सुरक्षितच की.शेवटी ३ ते ६ च्या शोची तिकिटं मिळाली.
मस्तच पिच्चर होता."जिते है शान से....मरते है शान से" गाणं... तो शाकाल... ती फायटिंग... वॉव मस्तच .... तहान भूक सगळे विसरून पिच्चर एंजॉय केला चौघांनी.
परतलो घरी ,सकाळी सात ते सायंकाळी सात "बेबीज् डे आऊट" सारखे.दारात पाऊल ठेवल्या बरोबर आजीने थोबकाडात दे दणाण केले.कॉलनीतील शेजारी पाजारी गोळा झालेले होते.मुले हारवली की काय? अशी काळजी होती त्यांना. आम्ही "शानसे" आलो नि आमची पार "शानच" घालवली घरच्यांनी.
शालेय जीवनात मोजून ५ /६ सिनिमे पाहिले असतील,भावंडांनी मिळून.
प्रत्येक पाहाणे अविस्मरणीयच आहे.
आज साधनसंपन्नता प्रचंड आहे. लग्झुरिअस टॉकिज आहेत. नेटबुकिंगची सोय आहे. पण लहानपणचे ते थ्रिल नाहीच.
मध्यमवर्गातिल ते श्रीमंत क्षण आज लखपती/ करोडपती असलेले भावंड अजूनही विकत घेऊ शकलो नाही.........,
श्रीमंतीतील गरीबीची किव येते.
गेले ते दिवस... राहिल्या त्या आठवणी.
©डॉ.प्रज्ञा देशपांडे.
नाही, दिवस गेले कसे?...तुमच्या आठवणीत आहेत नांं!!.मलाही,आठवले,दर रवीवारी डोंंबीवलीतील टिळक टाॅॅकीजमधे १० चे शो असायचे,लाॅॅरेर्डी,चार्लि चॅॅपलिन..आणखी बरेच ..बाबा आम्हांंबहीण भावाला पाठवायचेच!
ReplyDeleteनाही, दिवस गेले कसे?...तुमच्या आठवणीत आहेत नांं!!.मलाही,आठवले,दर रवीवारी डोंंबीवलीतील टिळक टाॅॅकीजमधे १० चे शो असायचे,लाॅॅरेर्डी,चार्लि चॅॅपलिन..आणखी बरेच ..बाबा आम्हांंबहीण भावाला पाठवायचेच!
ReplyDeleteनाही,दिवस गेले कसे,तुमच्या आठवणीत आहेत नांं!..मलाही आठवले,दर रवीवारी डोंंबिवलीतील टिळक टाॅॅकीजला सिनेमे पाहीलेत,चार्ली चॅॅपलीन,लाॅॅरेल हारर्डी...
ReplyDeleteनाही,दिवस गेले कसे,तुमच्या आठवणीत आहेत नांं!..मलाही आठवले,दर रवीवारी डोंंबिवलीतील टिळक टाॅॅकीजला सिनेमे पाहीलेत,चार्ली चॅॅपलीन,लाॅॅरेल हारर्डी...
ReplyDelete