#सहजोक्त.
काही चाळता चाळता एक श्लोक वाचण्यात आला . कधी कधी अवचितपणे काही समर्पक गवसतं ते असं !
वक्तारः किं करिष्यन्ति श्रोता यत्र न विद्यते ।
नग्नक्षपणके देशे रजकः किं करिष्यति ॥
संस्कृत असूनही सरळ न् सोपं आहे समजायला. "श्रोतेच नसतील तर वक्त्याने काय बरं करावं ? नागासाधुंच्या प्रदेशात धोब्याने काय काम करावे बरे ?" .
जेथे ज्या गोष्टीची गरजच नाही तेथे ती गोष्ट असून नसल्या सारखीच असते. मग अश्या वेळी ती नसलेली अधिक चांगली.
श्लोकाच्या स्पष्टीकरणासाठी व्यवहारातील अनेक उदाहरणं देता येतील.आपल्या आयुष्यात अनेकदा , श्लोकातील वक्त्यासारखी वा धोब्यासारखी अवस्था झाली असेलही.
आता हेच पहा की श्रोते नाही , सर्व व्यवस्था नीट केलेली आहे , हॉल सज्ज आहे. आता वक्त्याने काय करावे ? एकतर सोडून निघून यावे अथवा ज्या भाषणाची तयारी केली ते भाषण परिपूर्ण तयारीने सादर करावे. एवीतेवी कोणी असो अथवा नसो , आपला सराव होतो , आपण आपला सराव कां सोडायचा ? तीच गोष्ट नागासाधूंच्या देशाची. ते कपडे घालणारच नाहीत असां विचार न करता , कष्टसाध्य कां असेना , रजकाचा (धोब्याचा) व्यवसाय चालेल , यासाठी अतोनात प्रयत्न करायला हवे.
श्लोकातील वक्ता अथवा धोब्यासारखी वेळी आली तर आपण नेमकं काय केलं ? यावर आपलं आजचं व्यक्तिमत्व न् यशापयश अवलंबून असते.
बरेचदा परिस्थिती अशीच असते . मग खापर फोडणे , निराश होणे , कोल्हाला द्राक्षे आंबट वाटणे , अर्ध्यातून पळून जाणे , परत त्या वाटी न जाणे , चुन्या सारखं सतत उबजणे इत्यादी इत्यादी न वागता ; संथं , सातत्याने कृतिशील सर्जनत्व अबाधित राखणे , हाच खरा पुरुषार्थ !
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
काही चाळता चाळता एक श्लोक वाचण्यात आला . कधी कधी अवचितपणे काही समर्पक गवसतं ते असं !
वक्तारः किं करिष्यन्ति श्रोता यत्र न विद्यते ।
नग्नक्षपणके देशे रजकः किं करिष्यति ॥
संस्कृत असूनही सरळ न् सोपं आहे समजायला. "श्रोतेच नसतील तर वक्त्याने काय बरं करावं ? नागासाधुंच्या प्रदेशात धोब्याने काय काम करावे बरे ?" .
जेथे ज्या गोष्टीची गरजच नाही तेथे ती गोष्ट असून नसल्या सारखीच असते. मग अश्या वेळी ती नसलेली अधिक चांगली.
श्लोकाच्या स्पष्टीकरणासाठी व्यवहारातील अनेक उदाहरणं देता येतील.आपल्या आयुष्यात अनेकदा , श्लोकातील वक्त्यासारखी वा धोब्यासारखी अवस्था झाली असेलही.
आता हेच पहा की श्रोते नाही , सर्व व्यवस्था नीट केलेली आहे , हॉल सज्ज आहे. आता वक्त्याने काय करावे ? एकतर सोडून निघून यावे अथवा ज्या भाषणाची तयारी केली ते भाषण परिपूर्ण तयारीने सादर करावे. एवीतेवी कोणी असो अथवा नसो , आपला सराव होतो , आपण आपला सराव कां सोडायचा ? तीच गोष्ट नागासाधूंच्या देशाची. ते कपडे घालणारच नाहीत असां विचार न करता , कष्टसाध्य कां असेना , रजकाचा (धोब्याचा) व्यवसाय चालेल , यासाठी अतोनात प्रयत्न करायला हवे.
श्लोकातील वक्ता अथवा धोब्यासारखी वेळी आली तर आपण नेमकं काय केलं ? यावर आपलं आजचं व्यक्तिमत्व न् यशापयश अवलंबून असते.
बरेचदा परिस्थिती अशीच असते . मग खापर फोडणे , निराश होणे , कोल्हाला द्राक्षे आंबट वाटणे , अर्ध्यातून पळून जाणे , परत त्या वाटी न जाणे , चुन्या सारखं सतत उबजणे इत्यादी इत्यादी न वागता ; संथं , सातत्याने कृतिशील सर्जनत्व अबाधित राखणे , हाच खरा पुरुषार्थ !
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
🙌🏻🙌🏻🙌🏻
ReplyDelete