रजनीगंधा फुल तुम्हारे....
जुनं गाणं,अवचित कानी आलं ,मन स्मृतीत रेंगाळले.
निशिगंधाचे फुलं ,अंगणात ताटव्यात डोलाने बागडतात ,हवेच्या झुळूकीसरशी गंधेंद्रियांच्या माध्यमातून मनाला गंधाळतात .मन सुगंधित ,प्रसन्न ,हळुवार,रसिक होते .
झुळूक अलवार-अचानक येते. सतत एकसाारखी नाही. तरी मनात तो स्मृतिगंध रेंगाळत राहतो ,मनाला ताजं-तवानं करत राहतो.
आठवणीतीलही रजनीगंध धुंद करतो-चित्तवृत्ती प्रफुल्लित करतो.अगदी अशीच सजणाच्या प्रेमाची जाणिव तिच्या अनुरक्त मनाला शांतवते.
शब्दबद्ध होत गाणं फुलतं..................
"रजनीगंधा फुल तुम्हारे ,महके यू ही आंगन मे..यू ही महके प्रीत पियाकी मेरे अनुरागी मनमे ..."
तिचे मन अनुरक्त आहे .ती त्याच्या प्रेमात आहे.तिच्या मनात त्याच्याविषयी मधुर भावना आहेत.म्हणून तिच्या मनात त्याची प्रीत महकते आहे ,
तिला सुगंधित करते आहे.
"तस्यतदेव हि मधुरं
यस्य मनो यत्र संलग्नम्" ,
त्याची तिच्या विषयी भावना काय?
हे कळायला मार्ग नाही .कारण हे तिने म्हटलेले गीत आहे. तसेही...... कोणाला काय वाटते?....... पेक्षा आपल्याला जे वाटते तेच सगळीकडे अनुभूतीला येते.
आजच्या इन्संट जमान्यात कोणाच्या आठवानेही चित्तवृत्ती प्रसन्न व्हाव्यात ,हे आश्चर्यच!
मनाने ,भावनेने एखाद्यात खोल गुंतल्या शिवाय
असे "महकणे" समजायला अवघडच !
पुढचे कडवे तर आजकालच्या व्यवहारात समजण्याच्या पलीकडचेच आहे.
"अधिकार ये जबसे साजन का
हर धडकन पर माना मैने
मै जब से उनके साथ बंधी
भेद तभी जाना मैने
कितना सुख है बंधन मे"!
आज जिकडे तिकडे मुक्तीचे वारे वाहात आहेत. स्त्रीमुक्ती ,सांस्कृतिक मुक्ती ,आर्थिक मुक्ती वगैरे वगैरे.. अशा वेळी "बंधनात सुख"!!!
विडंबनच वाटावे ,होय ना?
ती म्हणते जेव्हापासून मी माझ्या श्वासावर त्यांचा अधिकार आहे हे मानलं तेव्हा पासून मी बंधनात पडली नि बंधनात काय सुख आहे ते मला उमगले"!!
अरेरे काय पुराणमतवादी विचार बरे या स्त्रीचे !! लग्न झाल्यावर नव-याचेही बंधन न मानणा-या
मुक्त स्वातंत्रवादी बायका कुठे नि ही लग्न न होता केवळ मनाने वरलेल्या प्रियकराचे बंधन श्वासावर आहे. हे चक्क कबुल करते वर बंधन सुखदायक वाटते तिला !!! अगदीच निराशाजनक हो !!
"आशा नाम मनुष्यानां काचिद्भूत श्रुंखला।
यया बद्धा प्रधावन्ति ,मुक्ता तिष्ठन्ति पङ्गुवत् ॥
काळ कोणताही असो *आशा* बलवत्तर असते. आशेने जे बांधले गेले ते धावतात .मात्र मोकळे असलेले निराश लोकं पंगु प्रमाणे थांबून जातात.
"प्रियकर माझा आहे . तो कायम मला जपेल. सुखात ठेवेल.प्रेमबंध नीट जपेल. जगाच्या आक्रिताला सामोरा जाईल तो. मला सगळ्या संकटातून काढेल तो".असे आशेचे मनोरे तिच्या मनात उभारले जात असतील.आणि याच आशेच्या बंधनामुळे ती सुख अनुभवत असेल.
ज्यांना ही आशा नाही ,प्रिय अशी सुखस्वप्ने नाहीत ते *बंधन* म्हणजे जोखडच समजणार ना!
आज प्रथमिक वर्गांमध्ये फस्टक्रश होतं ,माध्यमिक वर्गांमध्ये डिपलव्ह , कॉलेजात जाईपर्यंत रिलेशनशीप न् खरे लग्नाच्या वेळेपर्यंत सर्वबंधमुक्त...............
असे वातावरण असतांना हे गाणे म्हणजे दिवास्वप्नच ना!
पण खरच !
ज्यांनी ख-या प्रेमाचे मोरपीस ह्रदयावर हळुवार फिरलेले अनुभवलेय ,
ज्यांनी स्वत:ला अातून उमललेले बघितले आहे
नि ज्यांनी हे बंधन कोणत्याही परिस्थितीत आनंदाने सांभाळले.
भाळणे ते सांभाळणे या प्रवासात ज्यांनी प्रत्येक क्षण उत्सव रूपाने साजरा केलाय.........
त्या सर्व भाग्यवंत युगलांना शतश: प्रणाम !
©डॉ. प्रज्ञा देशपांडे..
जुनं गाणं,अवचित कानी आलं ,मन स्मृतीत रेंगाळले.
निशिगंधाचे फुलं ,अंगणात ताटव्यात डोलाने बागडतात ,हवेच्या झुळूकीसरशी गंधेंद्रियांच्या माध्यमातून मनाला गंधाळतात .मन सुगंधित ,प्रसन्न ,हळुवार,रसिक होते .
झुळूक अलवार-अचानक येते. सतत एकसाारखी नाही. तरी मनात तो स्मृतिगंध रेंगाळत राहतो ,मनाला ताजं-तवानं करत राहतो.
आठवणीतीलही रजनीगंध धुंद करतो-चित्तवृत्ती प्रफुल्लित करतो.अगदी अशीच सजणाच्या प्रेमाची जाणिव तिच्या अनुरक्त मनाला शांतवते.
शब्दबद्ध होत गाणं फुलतं..................
"रजनीगंधा फुल तुम्हारे ,महके यू ही आंगन मे..यू ही महके प्रीत पियाकी मेरे अनुरागी मनमे ..."
तिचे मन अनुरक्त आहे .ती त्याच्या प्रेमात आहे.तिच्या मनात त्याच्याविषयी मधुर भावना आहेत.म्हणून तिच्या मनात त्याची प्रीत महकते आहे ,
तिला सुगंधित करते आहे.
"तस्यतदेव हि मधुरं
यस्य मनो यत्र संलग्नम्" ,
त्याची तिच्या विषयी भावना काय?
हे कळायला मार्ग नाही .कारण हे तिने म्हटलेले गीत आहे. तसेही...... कोणाला काय वाटते?....... पेक्षा आपल्याला जे वाटते तेच सगळीकडे अनुभूतीला येते.
आजच्या इन्संट जमान्यात कोणाच्या आठवानेही चित्तवृत्ती प्रसन्न व्हाव्यात ,हे आश्चर्यच!
मनाने ,भावनेने एखाद्यात खोल गुंतल्या शिवाय
असे "महकणे" समजायला अवघडच !
पुढचे कडवे तर आजकालच्या व्यवहारात समजण्याच्या पलीकडचेच आहे.
"अधिकार ये जबसे साजन का
हर धडकन पर माना मैने
मै जब से उनके साथ बंधी
भेद तभी जाना मैने
कितना सुख है बंधन मे"!
आज जिकडे तिकडे मुक्तीचे वारे वाहात आहेत. स्त्रीमुक्ती ,सांस्कृतिक मुक्ती ,आर्थिक मुक्ती वगैरे वगैरे.. अशा वेळी "बंधनात सुख"!!!
विडंबनच वाटावे ,होय ना?
ती म्हणते जेव्हापासून मी माझ्या श्वासावर त्यांचा अधिकार आहे हे मानलं तेव्हा पासून मी बंधनात पडली नि बंधनात काय सुख आहे ते मला उमगले"!!
अरेरे काय पुराणमतवादी विचार बरे या स्त्रीचे !! लग्न झाल्यावर नव-याचेही बंधन न मानणा-या
मुक्त स्वातंत्रवादी बायका कुठे नि ही लग्न न होता केवळ मनाने वरलेल्या प्रियकराचे बंधन श्वासावर आहे. हे चक्क कबुल करते वर बंधन सुखदायक वाटते तिला !!! अगदीच निराशाजनक हो !!
"आशा नाम मनुष्यानां काचिद्भूत श्रुंखला।
यया बद्धा प्रधावन्ति ,मुक्ता तिष्ठन्ति पङ्गुवत् ॥
काळ कोणताही असो *आशा* बलवत्तर असते. आशेने जे बांधले गेले ते धावतात .मात्र मोकळे असलेले निराश लोकं पंगु प्रमाणे थांबून जातात.
"प्रियकर माझा आहे . तो कायम मला जपेल. सुखात ठेवेल.प्रेमबंध नीट जपेल. जगाच्या आक्रिताला सामोरा जाईल तो. मला सगळ्या संकटातून काढेल तो".असे आशेचे मनोरे तिच्या मनात उभारले जात असतील.आणि याच आशेच्या बंधनामुळे ती सुख अनुभवत असेल.
ज्यांना ही आशा नाही ,प्रिय अशी सुखस्वप्ने नाहीत ते *बंधन* म्हणजे जोखडच समजणार ना!
आज प्रथमिक वर्गांमध्ये फस्टक्रश होतं ,माध्यमिक वर्गांमध्ये डिपलव्ह , कॉलेजात जाईपर्यंत रिलेशनशीप न् खरे लग्नाच्या वेळेपर्यंत सर्वबंधमुक्त...............
असे वातावरण असतांना हे गाणे म्हणजे दिवास्वप्नच ना!
पण खरच !
ज्यांनी ख-या प्रेमाचे मोरपीस ह्रदयावर हळुवार फिरलेले अनुभवलेय ,
ज्यांनी स्वत:ला अातून उमललेले बघितले आहे
नि ज्यांनी हे बंधन कोणत्याही परिस्थितीत आनंदाने सांभाळले.
भाळणे ते सांभाळणे या प्रवासात ज्यांनी प्रत्येक क्षण उत्सव रूपाने साजरा केलाय.........
त्या सर्व भाग्यवंत युगलांना शतश: प्रणाम !
©डॉ. प्रज्ञा देशपांडे..
काय मधुमय प्रेम रस उत्पन्न केलाय। खुपच अप्रतिम।
ReplyDelete