लेखांक ३
देवीची आरती
आरत्यांचे सुद्धा वंदेमातरम ,जनगणमन सारखे असते पहा . एकट्याने म्हण म्हटले तर येत नाही , ही अोळ पुन्हा म्हण , सावकाश म्हण , लयीत बदल कर अशा सूचना केल्या कि पार सगळे विरून जायला होते. कधी कधी या आरतीचे कडवे त्या आरतीत रिमिक्स होते तर कधी कधी तेच तेच पुन्हा पुन्हा म्हटले जाते . उच्चारण हा यर विवाद्य विषय . असो .
साधारणपणे 'दुर्गे दुर्घट भारी ' ही आरती 'सुखकर्ता दुखहर्ता' या आरतीची जणु जोड-आरती समजून म्हटली जाते . पण ही स्वतंत्र आरती असून नरहरी नावाच्या कवीने रचली आहे . संस्कृत काय किंवा मराठी काय प्राचीन काळात स्वत: बद्दल फारसं सांगत नसत कविलोकं .
या लेखात देवीची ही आरती बघू .
दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसरी =
या अोळीचा अर्थ असा की , "हे दुर्गे , तुझ्याशिवाय हे भारी दुर्घट संसरवणे कठिणच आहे" . इथे दोन शब्द विशेष लक्षात घेण्यासारखे आहेत . त्यातील पहिला म्हणजे दुर्घट = दुर् +घट हा शब्द .
'घटना' हा सामान्य परिचित शब्द याच घट पासून तयार झाला आहे.
घट , घाट , घटनावळ , घडविला , घडी , घटिका असे अनेक शब्द व्युत्पन्न होतात . दुर्घट म्हणजे घडण्यास कठिण , होण्यास कठिण . दुर् हा उपसर्ग थोडा नकारात्मकच असतो .
जसे - दुर्दैव , दुर्भाग्य , दुर्लभ , दुष्कर्म इत्यादी.
आता दुसरा शब्द संसरी , संसारी नाही.
संसर =सर् म्हणजे योग्य गतीने सरकत रहाणे .
जो योग्य गतीने सरकत असतो संसार.
तो पुढे पुढेच जातो , परत येत नाही . 'संसार' हे नाम आहे तर संसर हे क्रियापद आहे.
" हे दुर्गे तुझ्याशिवाय हे भारी दुर्घट पुढे सरकणे कठिणच आहे " असा एकूण अर्थ .
"अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी"=
हे अनाथांची नाथ असलेली आई . अंब ह्या संस्कृत शब्दाचा आई असा अर्थ आहे.
या शब्दापासून विविध भाषेत अम्मा , अम्मी , अम्मा , अंबा , आऊ , आई असे शब्द दिसतात. नरहरी कवी म्हणतात , "आई अंबे , तू तुझी करूणा विस्तार , विस्तृत कर , वाढव. माझ्यावर कृपाकर . जन्म-मरण यांचा फेरा हाच संसर. यापासून वारण कर , वाचव . इथे "वारी" हा शब्द आहे . निवारण करणे , अनिवार असे शब्द आपण सामान्य भाषेत नेहमीच योजतो , त्यातील मूळ शब्द वृ (वर्)अडवणे या अर्थी आहे . इथे आरतीत "वारी" हे क्रियापद आहे . तू अडव , तू निवारण कर हाच अर्थ आहे.
आता पंढरपुरची वारी म्हणजे काय ? तेथे हा शब्द क्रियापद म्हणून नाही नक्की . तेथे परिक्रमा, यात्रा या अर्थाने आपण तो शब्द योजतो . " मूळात संसारापासून विरक्त , मुक्त करते ती यात्रा म्हणजे वारी " असा अर्थ असेल ना ?
तेथे वारी हे नाव आहे . असो.
"जयदेवी जयदेवी जय महिषासुरमथिनी सुरवर ईश्वरवर दे तारक संजीवनी"=
त्या दुर्गेचा जयघोष केला आहे. महिषासुराची मथिनी म्हणजे जिने मथन केले आहे म्हणजे अगदी घुसळून टाकले , आजच्या भाषेत "पार लोळवलेच". सुरवर म्हणजे श्रेष्ठ देवता , ईश्वर म्हणजे शंकर या सर्वांना वर देणारी ,
जी तारणारी , संजीवन देणारी आहे . अशी ही अफाट कर्तृत्ववान महिला शक्ती.
"त्रिभुवनी भुवनी पाहता तुज ऐसे नाही"=
त्रिभुवनी-भुवनी या शब्दरचना केवळ अनुप्रासाकरिता नसावेत. स्वर्ग-मृत्यू-पाताळ असे तीन भुवन आहेत आणि आज वर्तमानात जे घडत आहे ते भुवन . दुर्गा ही अनादी-अनंत अाहे . कवीला तिची अनुभूती आज या भुवनात ,वर्तमानात आली. असे बघा, "अनेक वर्ष आपण एखाद्या व्यक्तिमत्त्वाला पाहात असतो पण अवचित प्रसंगाने क्षणात वीज चमकावी तसे आपल्याला व्यक्तिमत्त्वाची थोरवी कळते " तसे काहीसे या वाक्यात आहे. "तुझ्यासारखे दुसरे कोणी या त्रिभुवनात नाही", अशी अनुभूती कवीला झाली आहे.
"चारी श्रमले परंतु न बोलवे काही
साही विवाद करिता पडलो प्रवाही "=
चार आश्रम, चार युग असे जे काही म्हणून चार असतील ते ते सर्व श्रमले, तुझ्यापुढे अपुरे पडत आहेत , तोकडे पडत आहे , थकले बिचारे.
सहा वेदांग ,सहा शास्त्रं , सहा दर्शने आहेत.
जे नेहमी एकमेकाचे खंडन-मंडन करीत असतात आणि त्यातून वाक्प्रवाहात पडतात .
"वेद" म्हणजे ज्ञान परिपूर्ण-संपूर्ण झाले की बोलवत नाही मात्र विवाद आला की प्रवाहात पडणे आलेच, चिरंतन सत्य !
"ते तू भक्ता लागी पावसी लवलाही "=
ते म्हणजे तशी तू भक्तांसाठी लवकर ,क्षणाचाही विलंब न करता पाव, पावतेसच , हा विश्वास.
"प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासा "
निज , तुझा वैयक्तिक दास , निजदासावर तू प्रसन्न हो . हे प्रसन्न वदना देवी , इथे "निजदासा" ही सप्तमी आहे. 'त ई आ' हे सप्तमीचे प्रत्यय . त्यातील "आ" हा प्रत्यय फार कमी ठिकाणी आढळतो . तोच इथे आहे.
"क्लेशापासुनी सोडवी तोडी भवपाशा"
क्लेशांपासून सोडव आणि भवपाशांना तोड .
पाश तोडावेच लागतात. भव म्हणजेच संसार. भवपाशा इथे ही "आ" प्रत्यय आहे , पण सप्तमी नाही.
"अंबे तुज वाचोनि कोण पुरविल आशा "=
आईला लडिवाळ आळवणी कि ,'अग आई , प्लीज तुझ्याशिवाय कोण ग करू शकेल ? तुझी नाही तर कोणाची खात्री देऊ सांग ना ?'
"नरहरी तल्लीन झाला पदपंकजलेशा" =
नरहरी कवी ,स्वत:त थोडाही न उरता तुझ्या पदरूपी कमळामध्ये तल्लीन (तत् +लीन) लीन म्हणजे एकरूप होणे . त्यात एकरूप, कशात ?
तर त्या तत्वात !
ही आरती म्हणजे उत्कट भक्तीची कविता आहे.कवीच्या अलौकिक प्रतिभेने जनमानसावर गारूड घातले आहे . भक्ती महत्वाची , तितकीच शब्दभक्ती नि अर्थभक्ती देखील !
देवीची अनेक नावे आहेत पण येथे "दुर्गा" म्हटले आहे . दुर् + ग = दुर्ग . दुर्ग म्हणजे जाण्यास कठीण. म्हणून तर पर्वताला दुर्ग म्हणतात.
सहज झपझप नाही जाता येत तेथे.
तशी ही देवी "दुर्गा"आहे. कोणीही कधीही पटवावी अशी ती 'आशुतोष' , 'सुलभा' नाही .
म्हणून तिला ही आळवणी.
दुर्गा-क्षमा-शिवा-धात्री-स्वहा-स्वधा नमोSस्तुते ।
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
देवीची आरती
आरत्यांचे सुद्धा वंदेमातरम ,जनगणमन सारखे असते पहा . एकट्याने म्हण म्हटले तर येत नाही , ही अोळ पुन्हा म्हण , सावकाश म्हण , लयीत बदल कर अशा सूचना केल्या कि पार सगळे विरून जायला होते. कधी कधी या आरतीचे कडवे त्या आरतीत रिमिक्स होते तर कधी कधी तेच तेच पुन्हा पुन्हा म्हटले जाते . उच्चारण हा यर विवाद्य विषय . असो .
साधारणपणे 'दुर्गे दुर्घट भारी ' ही आरती 'सुखकर्ता दुखहर्ता' या आरतीची जणु जोड-आरती समजून म्हटली जाते . पण ही स्वतंत्र आरती असून नरहरी नावाच्या कवीने रचली आहे . संस्कृत काय किंवा मराठी काय प्राचीन काळात स्वत: बद्दल फारसं सांगत नसत कविलोकं .
या लेखात देवीची ही आरती बघू .
दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसरी =
या अोळीचा अर्थ असा की , "हे दुर्गे , तुझ्याशिवाय हे भारी दुर्घट संसरवणे कठिणच आहे" . इथे दोन शब्द विशेष लक्षात घेण्यासारखे आहेत . त्यातील पहिला म्हणजे दुर्घट = दुर् +घट हा शब्द .
'घटना' हा सामान्य परिचित शब्द याच घट पासून तयार झाला आहे.
घट , घाट , घटनावळ , घडविला , घडी , घटिका असे अनेक शब्द व्युत्पन्न होतात . दुर्घट म्हणजे घडण्यास कठिण , होण्यास कठिण . दुर् हा उपसर्ग थोडा नकारात्मकच असतो .
जसे - दुर्दैव , दुर्भाग्य , दुर्लभ , दुष्कर्म इत्यादी.
आता दुसरा शब्द संसरी , संसारी नाही.
संसर =सर् म्हणजे योग्य गतीने सरकत रहाणे .
जो योग्य गतीने सरकत असतो संसार.
तो पुढे पुढेच जातो , परत येत नाही . 'संसार' हे नाम आहे तर संसर हे क्रियापद आहे.
" हे दुर्गे तुझ्याशिवाय हे भारी दुर्घट पुढे सरकणे कठिणच आहे " असा एकूण अर्थ .
"अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी"=
हे अनाथांची नाथ असलेली आई . अंब ह्या संस्कृत शब्दाचा आई असा अर्थ आहे.
या शब्दापासून विविध भाषेत अम्मा , अम्मी , अम्मा , अंबा , आऊ , आई असे शब्द दिसतात. नरहरी कवी म्हणतात , "आई अंबे , तू तुझी करूणा विस्तार , विस्तृत कर , वाढव. माझ्यावर कृपाकर . जन्म-मरण यांचा फेरा हाच संसर. यापासून वारण कर , वाचव . इथे "वारी" हा शब्द आहे . निवारण करणे , अनिवार असे शब्द आपण सामान्य भाषेत नेहमीच योजतो , त्यातील मूळ शब्द वृ (वर्)अडवणे या अर्थी आहे . इथे आरतीत "वारी" हे क्रियापद आहे . तू अडव , तू निवारण कर हाच अर्थ आहे.
आता पंढरपुरची वारी म्हणजे काय ? तेथे हा शब्द क्रियापद म्हणून नाही नक्की . तेथे परिक्रमा, यात्रा या अर्थाने आपण तो शब्द योजतो . " मूळात संसारापासून विरक्त , मुक्त करते ती यात्रा म्हणजे वारी " असा अर्थ असेल ना ?
तेथे वारी हे नाव आहे . असो.
"जयदेवी जयदेवी जय महिषासुरमथिनी सुरवर ईश्वरवर दे तारक संजीवनी"=
त्या दुर्गेचा जयघोष केला आहे. महिषासुराची मथिनी म्हणजे जिने मथन केले आहे म्हणजे अगदी घुसळून टाकले , आजच्या भाषेत "पार लोळवलेच". सुरवर म्हणजे श्रेष्ठ देवता , ईश्वर म्हणजे शंकर या सर्वांना वर देणारी ,
जी तारणारी , संजीवन देणारी आहे . अशी ही अफाट कर्तृत्ववान महिला शक्ती.
"त्रिभुवनी भुवनी पाहता तुज ऐसे नाही"=
त्रिभुवनी-भुवनी या शब्दरचना केवळ अनुप्रासाकरिता नसावेत. स्वर्ग-मृत्यू-पाताळ असे तीन भुवन आहेत आणि आज वर्तमानात जे घडत आहे ते भुवन . दुर्गा ही अनादी-अनंत अाहे . कवीला तिची अनुभूती आज या भुवनात ,वर्तमानात आली. असे बघा, "अनेक वर्ष आपण एखाद्या व्यक्तिमत्त्वाला पाहात असतो पण अवचित प्रसंगाने क्षणात वीज चमकावी तसे आपल्याला व्यक्तिमत्त्वाची थोरवी कळते " तसे काहीसे या वाक्यात आहे. "तुझ्यासारखे दुसरे कोणी या त्रिभुवनात नाही", अशी अनुभूती कवीला झाली आहे.
"चारी श्रमले परंतु न बोलवे काही
साही विवाद करिता पडलो प्रवाही "=
चार आश्रम, चार युग असे जे काही म्हणून चार असतील ते ते सर्व श्रमले, तुझ्यापुढे अपुरे पडत आहेत , तोकडे पडत आहे , थकले बिचारे.
सहा वेदांग ,सहा शास्त्रं , सहा दर्शने आहेत.
जे नेहमी एकमेकाचे खंडन-मंडन करीत असतात आणि त्यातून वाक्प्रवाहात पडतात .
"वेद" म्हणजे ज्ञान परिपूर्ण-संपूर्ण झाले की बोलवत नाही मात्र विवाद आला की प्रवाहात पडणे आलेच, चिरंतन सत्य !
"ते तू भक्ता लागी पावसी लवलाही "=
ते म्हणजे तशी तू भक्तांसाठी लवकर ,क्षणाचाही विलंब न करता पाव, पावतेसच , हा विश्वास.
"प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासा "
निज , तुझा वैयक्तिक दास , निजदासावर तू प्रसन्न हो . हे प्रसन्न वदना देवी , इथे "निजदासा" ही सप्तमी आहे. 'त ई आ' हे सप्तमीचे प्रत्यय . त्यातील "आ" हा प्रत्यय फार कमी ठिकाणी आढळतो . तोच इथे आहे.
"क्लेशापासुनी सोडवी तोडी भवपाशा"
क्लेशांपासून सोडव आणि भवपाशांना तोड .
पाश तोडावेच लागतात. भव म्हणजेच संसार. भवपाशा इथे ही "आ" प्रत्यय आहे , पण सप्तमी नाही.
"अंबे तुज वाचोनि कोण पुरविल आशा "=
आईला लडिवाळ आळवणी कि ,'अग आई , प्लीज तुझ्याशिवाय कोण ग करू शकेल ? तुझी नाही तर कोणाची खात्री देऊ सांग ना ?'
"नरहरी तल्लीन झाला पदपंकजलेशा" =
नरहरी कवी ,स्वत:त थोडाही न उरता तुझ्या पदरूपी कमळामध्ये तल्लीन (तत् +लीन) लीन म्हणजे एकरूप होणे . त्यात एकरूप, कशात ?
तर त्या तत्वात !
ही आरती म्हणजे उत्कट भक्तीची कविता आहे.कवीच्या अलौकिक प्रतिभेने जनमानसावर गारूड घातले आहे . भक्ती महत्वाची , तितकीच शब्दभक्ती नि अर्थभक्ती देखील !
देवीची अनेक नावे आहेत पण येथे "दुर्गा" म्हटले आहे . दुर् + ग = दुर्ग . दुर्ग म्हणजे जाण्यास कठीण. म्हणून तर पर्वताला दुर्ग म्हणतात.
सहज झपझप नाही जाता येत तेथे.
तशी ही देवी "दुर्गा"आहे. कोणीही कधीही पटवावी अशी ती 'आशुतोष' , 'सुलभा' नाही .
म्हणून तिला ही आळवणी.
दुर्गा-क्षमा-शिवा-धात्री-स्वहा-स्वधा नमोSस्तुते ।
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
No comments:
Post a Comment