लेखांक 2
आरती
धार्मिक वाङ्मय म्हटले ,की त्याला एक वेगळे वलय चिटकवण्याची घाई , भक्त आणि निंदक दोघेही करतात . येथेच या वाङ्मयावर प्रचंड अन्याय होतो . साधे "आरती" प्रकार बघू या .
कर्मकांडानुसार षोडशोपचार विधीने पूजा केल्या जाते त्या सोळाही उपचारांमध्ये "आरती" हे नावच नाही. संस्कृतमध्ये याला आरातिक्य असे नाव आहे पण त्याचाही उल्लेख सोळा उपचारविधीत नाही .
तरीही रूढीप्रिय समाजात "आरती" फारच प्रचलित आहे . देवाची , गुरुची , संतांची आरती , इतकेच नाही तर वृक्षाची , नदीची ,पोथीची पण आरती आढळते . खरे तर आरती म्हणजे पूर्णपणे
रत /रममाण होऊन केलेली शब्दस्तुती .
मूळात आरती ही पण एक कविताच असते ना !
ती ती देवता हा त्या कवितेचा वर्ण्यविषय असतो इतकेच . आपले मराठी वाङ्मय विशेषरित्या
धार्मिक-वाङ्मय अतिशय सखोल , गंभीर आणि चिंतनप्रवण आहे , यात शंकाच नाही .
ज्ञानेश्वरीत कोणे एके ठिकाणी पार्वती शंकराला प्रश्न विचारते की, गीतेचा महिमा काय ? त्यावर शंकर उत्तरतात , 'देवी ,जशी तू रोजच नित्यनुतन वाटते , कितीदा बघावे तरी दरवेळी नाविन्य जाणवते तसेच गीतेचे स्वरूप आहे ".
हाच दृष्टांत 'धार्मिक वाङ्मयाला तंतोतंत लागू होतो. जितके वेळा तुम्ही ते वाचाल, मनन कराल , चिंतन कराल ; तुम्हाला त्यातील खोल-खोल, वेगवेगळे अर्थ उलगडत जातील . जे जे तुम्ही अनुभवाल ते सारे इतरांना सांगावेच असे नाही .
"आपल्याला आलेली अनुभूती दुस-यात संक्रमित करायला 'बळकट गुरु' असावा लागतो" असो.
भाषा अभ्यासकांनी टोकाचे अतिरेक सोडून निव्वळ भाषा म्हणून आरतीकडे पहावे . कवीचे काव्य , गीतकाराचे गीत, तसे आरतीकाराची आरती .
इतके सोपे "ए फॉर अॅपल" सारखे असावे .
जसा जसा अभ्यासाचा स्तर, पोत वाढेल तसे तसे
"ए फॉर एनिथिंग" शिकवावे लागणार नाही ,
तर आपोआप समजेल !
आता पहिली आरती गणपतीची .
सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची
नुरवी , पुरवी प्रेम कृपा जयाची ॥
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची
कंठी झळके माळ मुक्ताफ़ऴांची॥१॥
जय देव जयदेव जय मंगलमूर्ती
दर्शनमात्रे ,मन कामना पुरती ॥धृ॥
रत्न खचित फरा तुज गौरीकुमरा
चंदनाची उटी कुमकुम केशरा
हिरेजडित मुकुट शोभतो बरा
रुणझुणती नुपुरे चरणी घागरीया॥२॥
लंबोदर पितांबर फणिवर बंधना
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना
दास रामाचा वाट पाहे सदना
संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना ॥३॥
अाता एकेक करून अर्थ बघू .
"सुखकर्ता दुखहर्ता "
सुख करणारा , दु:ख हरणारा ; इथे अर्थ द्विरुक्ती आहे कां ? सुख मिळणे म्हणजे दु:ख नष्ट होणेच ना ? पण तसे नाही . एसीत बसलोय , थंडीचे सुख घेतोय पण वाढत्या बिलामुळे दु:ख पण वाढते आहे ना ! म्हणून सुख करणारा गणेश आणि दु:ख दूर करणारा दु:खहारक गणेश असे दोन्ही रूपे हवेच .
कर्तृ>कर्ता ;
हर्तृ>हर्ता ;
भोक्तृ>भोक्ता ;
वक्तृ >वक्ता
या पद्धतीने हे रूप सिद्ध होते .
"वार्ता विघ्नाची नुरवी " =
विघ्नाची , वि+घ्न म्हणजे विशेष रितीने नाश करणारे जे काही असेल ते ; त्या सर्वांची वार्ता म्हणजे प्रत्यक्ष संकटे , अडचणी , विघ्न येण्यापूर्वी जी सूचना वा संकेत मिळतात त्यांची वार्ता नुरविणारा .
नुरविणे हा सुंदर सुंदर मराठी शब्द .
न उरविणे , खरे तर अ+उ बरोबर अो , होतो.
जसे गणेश+उत्सव =गणेशोत्सव,
प्रश्न+उत्तर=प्रश्नोत्तर .
पण नुरवणे शब्दात या संधिनियमाला अपवाद आढळतो . न+उरविणे=नुरविणे,पररूप संधी म्हणता येईल.
पुरवी प्रेम कृपा जयाची =
ज्याची कृपा प्रेम पुरविते . मुळात आपले अस्तित्व एक 'चैतन्यमय आनंद" असतो . तोच प्रत्येकाचा 'स्वभाव' असतो . द्वेष , राग , मोह , मत्सर , अहंकार इत्यादी स्वत:वर लादलेल्या विकृती आहेत म्हणून गणेशाची कृपा झाली , खरे गणेशतत्त्व कळले की फक्त आणि फक्त 'प्रेमभाव' शिल्लक राहतो .
गणेश मूर्तीचे वर्णन करतांना रामदास स्वामी
जिवंत मूर्ती डोळ्यासमोर उभी करतात .
सर्वांगाला शेंदुराची उटी लावली अाहे .
गळ्यात मोत्यांची माळ घातली आहे.
ती माळ चमकते आहे झळकते आहे म्हणजे
दुस-यांच्या डोळ्यात तिचे तेजस्वी अस्तित्व जाणवतेय.
आता प्रत्यक्ष गणपती, जो पार्वतीचा मुलगा ,
केशर-कुमकुम युक्त चंदन उटी लावतो .
आपण नाही का सन्स्क्रिन ,डिओ लावतो ?
त्यावेळेचे ते इकोफ्रेंडली श्रुंगारसाधने.
हिरेजडित मुकुट, रत्नखचित फ़रा अशा अॅसेसरीज् , अॉर्नामेंट हे असणारच ना !
यातही पहा ; रामदासस्वामी गणपतीला शंकराचा पुत्र म्हणत नाही . कारण शंकर म्हणजे दिगंबर , चिताभस्म लावणारा चंद्रमौली पण पार्वती ही हिमालयाकन्या , दिव्यांबरा , छान राजस रहाणी असलेली ; तिचा हा वारस , मग तोही छानच रहाणार.
लंबोदर पितांबर-फ़णिवरबंधना =
गणेश कसा आहे तर लंब उदर ,पीत अंबर घातलेला आणि 'फ़णिवर' म्हणजे बेल्ट घातलेला आजकाल पँटच्या पॅटर्न नुसार बेल्टची व्हेरायटी असते मग विचार करा ना ! पिवळ्या रेशमी धोतरावर श्रेष्ठ नागाचे बंधन ! So cool ,No !
सरळ सोंड -वक्रतुंडत्री नयना =
गणेशाची सोंड सरळ पण सोंडीच्या भारामुळे तोंड थोडं वाकडे होणारच ना ! बाबांचा शंकराचा वारसा त्रिनेत्र रूपाने मिळवला आहे.
रामदासाचा वाट पाहे सदना
संकटी पावावे ,निर्वाणी रक्षावे
सुरवर वंदना =
रामाचा दास या गणेशाची सदनात , घरात म्हणजे
या शरीररूपी मंदिरात आर्ततेने वाट पाहतो आहे. गणेशा, संकटसमयी मला पाव रे . वाण म्हणजे वासना , इच्छा . सगळ्या संपल्यात , निर्वाण झाले आहे ,आता रक्षण करा .
सुर वर म्हणजे ज्येष्ठ-श्रेष्ठ देवांकडून वंदल्या जाणारा गणेश .
दर्शन मात्रे मनकामना पुरती =
हा ही सुंदर वाक्य प्रकार . तसे शब्दसिद्धी नुसार मनोकामना व्हायला पाहिजे पण मन हे क्रियात्मक इंद्रिय आहे . त्यात कामना म्हणजे इच्छा असणारच. त्याची "पूर्ती" म्हणजे पूर्तता म्हटले नाही कारण मनाच्या इच्छा अनंत असतात , त्या पूर्ण होतच नसतात .
पण मंगलमूर्तीच्या दर्शनाने त्यांची "पुरती" होते . भर पासून भरती तसेच पुर पासून पुरती.
म्हणजे इच्छेत गणेश/ मंगलमूर्तीच रहाते मग बाकी पूर्तीची गरज नाहीच !
गणपतीची आरती अजून सखोल चिंतता येईल .
पण माझ्या तोकड्या ज्ञानाने मला सध्या इतकेच सुचले आहे . एकमात्र आवर्जून जाणवते कि , आपले अक्षर पासून वाङ्मयापर्यंत सगळे सगळेच कलासक्त , सौंदर्यासक्तच आहे.
भद्रं कर्णेभि: श्रुणुयाम देवा : . . . . . . ।
म्हणतात ते उगाच नाही .
"देवा , माझ्या नजरेला चांगलेच दिसू दे " याचा अर्थ "जगात चांगलेच असू दे अाणि चांगल्यातील चांगले बघण्याकडे माझी वृत्ती असू दे बाह्यंग-अंतरंग सुंदर असू दे ".
हाच बोध प्रत्येक वाङ्मयातून असावा असे वाटते.
एकूणच या गणपतीच्या आरतीतून रामदासस्वामींची तप:साधना आहेच.
या शिवाय इतक्या लीलया प्रासादिक रचना , अलंकारांचा वापर साधणार नाही .
वानगीदाखल सुखकर्ता-दुखहर्ता-वार्ता या रचनेत
'र्ता' या वर्णाची पुनरुक्ती करून वर्णानुप्रास साधलाय . तर विघ्नाची-जयाची येथे यमक आहे .
'फणिवरबंधन' येथे रूपक अलंकार आहे.
किती किती शोधावे ? एकेका शब्दातून भाषिकसौंदर्य सौष्ठव भरभरून दिसते आहे .
मुळात गणेश हा गोरा देव . त्याचे बाबा शंकर कर्पूरगौर आणि आई तर गौरीच !
गोरा गणेश कुमकुम-केशर-चंदनाची उटी लावतो ,
पिवळे झळझळीत रेशमी धोतर घालतो.
गळ्यात चमकदार मोती ,नव्हे नव्हे मुक्ताफ़ळ म्हणजे टपोरे मोती यांची माळ घालतो.
डोक्यावर हिरेजडित मुकुट , पायात रुणुझुणु नाद करणारे घांगरिया असलेले नुपूर म्हणजे पैंजण.
सौंदर्यासह पंचेंद्रियांनी ज्ञान ग्रहण करावे याचा वास्तुपाठच या आरतीतून मिळतो .
डोळ्यांना मंगलमूर्ती ,जी मूळात सुंदर आहे आणि वर जिने बाह्यरूप सुद्धा उटी-माळ-पैंजणादींच्या सहायाने सुंदर केले आहे .
आपल्या कानांना यातील नाद ऐकू यावेत. माळ झळकतेय, तिचा नाद , नुपूरांची रुणझूुण ,
जिवंत फणिवर म्हणजे फणा उगारलेला श्रेष्ठ नाग , त्याची सळसळ , पितांबराची सुळसुळ असे अनेक नाद-लय कानांनी ऐकावे .
चंदन , केशर इत्यादींनी आपले घ्राणेंद्रिय म्हणजे नाक तृप्त व्हावे .
मनात गणेश पुरून उरला कि बाकी मंगलमय होणारच.
असे सर्व जिवंत सौंदर्य आपल्या वाणीतून उच्चारावे. हीच खरी पंचज्ञानेंद्रियांनी केलेली वाक् सेवा आहे .
©डॉ. प्रज्ञा शरद देशपांडे
प्रोफ़ेसर्स कॉलोनी
हनुमान नगर
नागपूर.
आरती
धार्मिक वाङ्मय म्हटले ,की त्याला एक वेगळे वलय चिटकवण्याची घाई , भक्त आणि निंदक दोघेही करतात . येथेच या वाङ्मयावर प्रचंड अन्याय होतो . साधे "आरती" प्रकार बघू या .
कर्मकांडानुसार षोडशोपचार विधीने पूजा केल्या जाते त्या सोळाही उपचारांमध्ये "आरती" हे नावच नाही. संस्कृतमध्ये याला आरातिक्य असे नाव आहे पण त्याचाही उल्लेख सोळा उपचारविधीत नाही .
तरीही रूढीप्रिय समाजात "आरती" फारच प्रचलित आहे . देवाची , गुरुची , संतांची आरती , इतकेच नाही तर वृक्षाची , नदीची ,पोथीची पण आरती आढळते . खरे तर आरती म्हणजे पूर्णपणे
रत /रममाण होऊन केलेली शब्दस्तुती .
मूळात आरती ही पण एक कविताच असते ना !
ती ती देवता हा त्या कवितेचा वर्ण्यविषय असतो इतकेच . आपले मराठी वाङ्मय विशेषरित्या
धार्मिक-वाङ्मय अतिशय सखोल , गंभीर आणि चिंतनप्रवण आहे , यात शंकाच नाही .
ज्ञानेश्वरीत कोणे एके ठिकाणी पार्वती शंकराला प्रश्न विचारते की, गीतेचा महिमा काय ? त्यावर शंकर उत्तरतात , 'देवी ,जशी तू रोजच नित्यनुतन वाटते , कितीदा बघावे तरी दरवेळी नाविन्य जाणवते तसेच गीतेचे स्वरूप आहे ".
हाच दृष्टांत 'धार्मिक वाङ्मयाला तंतोतंत लागू होतो. जितके वेळा तुम्ही ते वाचाल, मनन कराल , चिंतन कराल ; तुम्हाला त्यातील खोल-खोल, वेगवेगळे अर्थ उलगडत जातील . जे जे तुम्ही अनुभवाल ते सारे इतरांना सांगावेच असे नाही .
"आपल्याला आलेली अनुभूती दुस-यात संक्रमित करायला 'बळकट गुरु' असावा लागतो" असो.
भाषा अभ्यासकांनी टोकाचे अतिरेक सोडून निव्वळ भाषा म्हणून आरतीकडे पहावे . कवीचे काव्य , गीतकाराचे गीत, तसे आरतीकाराची आरती .
इतके सोपे "ए फॉर अॅपल" सारखे असावे .
जसा जसा अभ्यासाचा स्तर, पोत वाढेल तसे तसे
"ए फॉर एनिथिंग" शिकवावे लागणार नाही ,
तर आपोआप समजेल !
आता पहिली आरती गणपतीची .
सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची
नुरवी , पुरवी प्रेम कृपा जयाची ॥
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची
कंठी झळके माळ मुक्ताफ़ऴांची॥१॥
जय देव जयदेव जय मंगलमूर्ती
दर्शनमात्रे ,मन कामना पुरती ॥धृ॥
रत्न खचित फरा तुज गौरीकुमरा
चंदनाची उटी कुमकुम केशरा
हिरेजडित मुकुट शोभतो बरा
रुणझुणती नुपुरे चरणी घागरीया॥२॥
लंबोदर पितांबर फणिवर बंधना
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना
दास रामाचा वाट पाहे सदना
संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना ॥३॥
अाता एकेक करून अर्थ बघू .
"सुखकर्ता दुखहर्ता "
सुख करणारा , दु:ख हरणारा ; इथे अर्थ द्विरुक्ती आहे कां ? सुख मिळणे म्हणजे दु:ख नष्ट होणेच ना ? पण तसे नाही . एसीत बसलोय , थंडीचे सुख घेतोय पण वाढत्या बिलामुळे दु:ख पण वाढते आहे ना ! म्हणून सुख करणारा गणेश आणि दु:ख दूर करणारा दु:खहारक गणेश असे दोन्ही रूपे हवेच .
कर्तृ>कर्ता ;
हर्तृ>हर्ता ;
भोक्तृ>भोक्ता ;
वक्तृ >वक्ता
या पद्धतीने हे रूप सिद्ध होते .
"वार्ता विघ्नाची नुरवी " =
विघ्नाची , वि+घ्न म्हणजे विशेष रितीने नाश करणारे जे काही असेल ते ; त्या सर्वांची वार्ता म्हणजे प्रत्यक्ष संकटे , अडचणी , विघ्न येण्यापूर्वी जी सूचना वा संकेत मिळतात त्यांची वार्ता नुरविणारा .
नुरविणे हा सुंदर सुंदर मराठी शब्द .
न उरविणे , खरे तर अ+उ बरोबर अो , होतो.
जसे गणेश+उत्सव =गणेशोत्सव,
प्रश्न+उत्तर=प्रश्नोत्तर .
पण नुरवणे शब्दात या संधिनियमाला अपवाद आढळतो . न+उरविणे=नुरविणे,पररूप संधी म्हणता येईल.
पुरवी प्रेम कृपा जयाची =
ज्याची कृपा प्रेम पुरविते . मुळात आपले अस्तित्व एक 'चैतन्यमय आनंद" असतो . तोच प्रत्येकाचा 'स्वभाव' असतो . द्वेष , राग , मोह , मत्सर , अहंकार इत्यादी स्वत:वर लादलेल्या विकृती आहेत म्हणून गणेशाची कृपा झाली , खरे गणेशतत्त्व कळले की फक्त आणि फक्त 'प्रेमभाव' शिल्लक राहतो .
गणेश मूर्तीचे वर्णन करतांना रामदास स्वामी
जिवंत मूर्ती डोळ्यासमोर उभी करतात .
सर्वांगाला शेंदुराची उटी लावली अाहे .
गळ्यात मोत्यांची माळ घातली आहे.
ती माळ चमकते आहे झळकते आहे म्हणजे
दुस-यांच्या डोळ्यात तिचे तेजस्वी अस्तित्व जाणवतेय.
आता प्रत्यक्ष गणपती, जो पार्वतीचा मुलगा ,
केशर-कुमकुम युक्त चंदन उटी लावतो .
आपण नाही का सन्स्क्रिन ,डिओ लावतो ?
त्यावेळेचे ते इकोफ्रेंडली श्रुंगारसाधने.
हिरेजडित मुकुट, रत्नखचित फ़रा अशा अॅसेसरीज् , अॉर्नामेंट हे असणारच ना !
यातही पहा ; रामदासस्वामी गणपतीला शंकराचा पुत्र म्हणत नाही . कारण शंकर म्हणजे दिगंबर , चिताभस्म लावणारा चंद्रमौली पण पार्वती ही हिमालयाकन्या , दिव्यांबरा , छान राजस रहाणी असलेली ; तिचा हा वारस , मग तोही छानच रहाणार.
लंबोदर पितांबर-फ़णिवरबंधना =
गणेश कसा आहे तर लंब उदर ,पीत अंबर घातलेला आणि 'फ़णिवर' म्हणजे बेल्ट घातलेला आजकाल पँटच्या पॅटर्न नुसार बेल्टची व्हेरायटी असते मग विचार करा ना ! पिवळ्या रेशमी धोतरावर श्रेष्ठ नागाचे बंधन ! So cool ,No !
सरळ सोंड -वक्रतुंडत्री नयना =
गणेशाची सोंड सरळ पण सोंडीच्या भारामुळे तोंड थोडं वाकडे होणारच ना ! बाबांचा शंकराचा वारसा त्रिनेत्र रूपाने मिळवला आहे.
रामदासाचा वाट पाहे सदना
संकटी पावावे ,निर्वाणी रक्षावे
सुरवर वंदना =
रामाचा दास या गणेशाची सदनात , घरात म्हणजे
या शरीररूपी मंदिरात आर्ततेने वाट पाहतो आहे. गणेशा, संकटसमयी मला पाव रे . वाण म्हणजे वासना , इच्छा . सगळ्या संपल्यात , निर्वाण झाले आहे ,आता रक्षण करा .
सुर वर म्हणजे ज्येष्ठ-श्रेष्ठ देवांकडून वंदल्या जाणारा गणेश .
दर्शन मात्रे मनकामना पुरती =
हा ही सुंदर वाक्य प्रकार . तसे शब्दसिद्धी नुसार मनोकामना व्हायला पाहिजे पण मन हे क्रियात्मक इंद्रिय आहे . त्यात कामना म्हणजे इच्छा असणारच. त्याची "पूर्ती" म्हणजे पूर्तता म्हटले नाही कारण मनाच्या इच्छा अनंत असतात , त्या पूर्ण होतच नसतात .
पण मंगलमूर्तीच्या दर्शनाने त्यांची "पुरती" होते . भर पासून भरती तसेच पुर पासून पुरती.
म्हणजे इच्छेत गणेश/ मंगलमूर्तीच रहाते मग बाकी पूर्तीची गरज नाहीच !
गणपतीची आरती अजून सखोल चिंतता येईल .
पण माझ्या तोकड्या ज्ञानाने मला सध्या इतकेच सुचले आहे . एकमात्र आवर्जून जाणवते कि , आपले अक्षर पासून वाङ्मयापर्यंत सगळे सगळेच कलासक्त , सौंदर्यासक्तच आहे.
भद्रं कर्णेभि: श्रुणुयाम देवा : . . . . . . ।
म्हणतात ते उगाच नाही .
"देवा , माझ्या नजरेला चांगलेच दिसू दे " याचा अर्थ "जगात चांगलेच असू दे अाणि चांगल्यातील चांगले बघण्याकडे माझी वृत्ती असू दे बाह्यंग-अंतरंग सुंदर असू दे ".
हाच बोध प्रत्येक वाङ्मयातून असावा असे वाटते.
एकूणच या गणपतीच्या आरतीतून रामदासस्वामींची तप:साधना आहेच.
या शिवाय इतक्या लीलया प्रासादिक रचना , अलंकारांचा वापर साधणार नाही .
वानगीदाखल सुखकर्ता-दुखहर्ता-वार्ता या रचनेत
'र्ता' या वर्णाची पुनरुक्ती करून वर्णानुप्रास साधलाय . तर विघ्नाची-जयाची येथे यमक आहे .
'फणिवरबंधन' येथे रूपक अलंकार आहे.
किती किती शोधावे ? एकेका शब्दातून भाषिकसौंदर्य सौष्ठव भरभरून दिसते आहे .
मुळात गणेश हा गोरा देव . त्याचे बाबा शंकर कर्पूरगौर आणि आई तर गौरीच !
गोरा गणेश कुमकुम-केशर-चंदनाची उटी लावतो ,
पिवळे झळझळीत रेशमी धोतर घालतो.
गळ्यात चमकदार मोती ,नव्हे नव्हे मुक्ताफ़ळ म्हणजे टपोरे मोती यांची माळ घालतो.
डोक्यावर हिरेजडित मुकुट , पायात रुणुझुणु नाद करणारे घांगरिया असलेले नुपूर म्हणजे पैंजण.
सौंदर्यासह पंचेंद्रियांनी ज्ञान ग्रहण करावे याचा वास्तुपाठच या आरतीतून मिळतो .
डोळ्यांना मंगलमूर्ती ,जी मूळात सुंदर आहे आणि वर जिने बाह्यरूप सुद्धा उटी-माळ-पैंजणादींच्या सहायाने सुंदर केले आहे .
आपल्या कानांना यातील नाद ऐकू यावेत. माळ झळकतेय, तिचा नाद , नुपूरांची रुणझूुण ,
जिवंत फणिवर म्हणजे फणा उगारलेला श्रेष्ठ नाग , त्याची सळसळ , पितांबराची सुळसुळ असे अनेक नाद-लय कानांनी ऐकावे .
चंदन , केशर इत्यादींनी आपले घ्राणेंद्रिय म्हणजे नाक तृप्त व्हावे .
मनात गणेश पुरून उरला कि बाकी मंगलमय होणारच.
असे सर्व जिवंत सौंदर्य आपल्या वाणीतून उच्चारावे. हीच खरी पंचज्ञानेंद्रियांनी केलेली वाक् सेवा आहे .
©डॉ. प्रज्ञा शरद देशपांडे
प्रोफ़ेसर्स कॉलोनी
हनुमान नगर
नागपूर.
No comments:
Post a Comment