#सहजोक्त.
झाडाख्यान..३.
आजी (पितामही) लहानपणी एक गोष्ट सांगायची.
फार फार पूर्वी एक राजा होता. तो सगळ्या प्रजेसाठी अतिशय आदराचे व जिव्हाळ्याचे स्थान होता. त्याचा एक शाही हज्जाम म्हणजे राज-नाभिक म्हणजे राजाचा न्हावी होता. दर आठ दिवसांनी तो न्हावी राजाकडे येई आणि अगदी एकांतात त्या राजाचे केशकर्तन-दाढी-मिशी आदी कार्य करीत असे.
पुढे तो न्हावी मरण पावला. वंशपरंपरे नुसार त्याचा मुलगा ,घनु वडिलांचे काम सांभाळायला आला. राजाने त्याला एकांतात बोलावले. राजाने जसा फेटा काढला तस्सा घनु भीतीने अोरडला कारण राजाला दोन शिंग होते.इतके दिवस हे गुपित राजा व घनुचे बाबा यांच्यातच होते. आता ते घनुला
कळले होते. राजाने त्याला धमकी दिली की ,'जर गुपित उघड झाले तर मृत्यूची शिक्षा देईल'.
घनु आधीच बोलघेवडा . सगळ्या गोष्टी भडभड सा-यांना सांगणारा. आता त्याला हे गुपित पोटात ठेवणे भाग पडले. पण या दबावामुळे तो झुरू लागला. हळुहळू तो सुकू लागला. त्याचे आप्तगण काळजीत पडले. पण घनू कोणाच काही सांगे ना . शेवटी उन्हाळेपावसाळे पाहिलेला एक ज्येष्ठ आप्त म्हणाला "गड्या ,तुझ्या मनात काहीतरी सल आहे,जो तू उघड करू शकत नाहीस. त्याचमुळे तुझी प्रकृती खालावली. असे कर ,एखाद्या जंगलात जा नि तुझी खंत एखाद्या झाडाला सांग.मग तू मोकळा होशील." घनुला ते पटले. तो गेला . एका झाडाला सांगितले. परतला. ताण उतरलेला घनु पूर्वीसारखा पुन्हा हसरा व बोलका झाला. सगळे आप्तेष्ट आनंदले.
इकडे ते झाड झुरु लागले. हळुहळू ते वाळून गेले. एकदा त्या जंगलातून बजय्ये (वाद्य निर्मिती करणारे) कलाकार जात होते. त्यांना जंगलात सरळसोट पण पार वाळलेेले झाड दिसले. त्यांनी ते नीट कापले. त्यातून त्यांनी ढोलकी-पेटी-सारंगी बनवली. मग त्यांनी वाजवून पाहिली .पेटी वर काहीही वाजवलं की सुरावट यायची ,राजा को दो सिंग फुटे।" सारंगी वाजवली की आवाज यायचा ,"किन्ने बताया ,किन्ने बताया"। ढोलकीवर थाप पडली की बोल उमटायचे,"घनुनाईने बताया, घनुनाईने बताया."। सगळे कलाकार आश्चर्यचकित झाले.त्यांना कळेच ना ,हे असे कां झाले? आजवर इतकेदा वाद्य बनवून विकले पण असे कधीच अनुभवले नव्हते त्यांनी. ही अजब वाजणारी वाद्य घेऊन ती गावोगाव ,शहरशहर फिरू लागले. लोकांना ती विचित्र वाद्य वाजवून दाखवू लागले. फिरत फिरत त्या राजाच्या राजधानीत आले. वाद्यांतून येणारा स्पष्ट आवाज एकून राजाचे बिंग फुटले. आता ही गोष्ट सा-यांच्या तोंडी झाली. शेवटी राजाने घनुला बोलावले. घनुने हकिकत सांगितली.
आता राजा काहीही करू शकत नव्हता कारण यात घनुचा दोषच नव्हता. .
झाडाला जीव असतो हे तर सिद्धच झालय विज्ञानाने . झाडाला भावना असतात कां?
झाडांना सुख-दुःख ,आपुलकी ,एकाकीपणा असतो कां?
मौखिकवाङ्मयात झाडांच्या मानवी भावनांविषयी कथा आहेत पण प्रमाणसाहित्यात असेच मानतात कां? झाडांना भावना असतात ही कल्पना आहे कां वास्तव ?
"तृण-कोटरात चिमण्यांची शाळा घेऊन निजला अौदुंबर" अशी उदाहरणे काव्यात चेतनगुणोक्ती अलंकाराची मानतात. म्हणजे मानवी भावना झाडांमध्ये नसतात कां?
सकाळी फिरताना एकमेकाला सावरून धरल्या सारखे झाड नजरेला पडले अन् विचार अाले तेच वर मांडले.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
झाडाख्यान..३.
आजी (पितामही) लहानपणी एक गोष्ट सांगायची.
फार फार पूर्वी एक राजा होता. तो सगळ्या प्रजेसाठी अतिशय आदराचे व जिव्हाळ्याचे स्थान होता. त्याचा एक शाही हज्जाम म्हणजे राज-नाभिक म्हणजे राजाचा न्हावी होता. दर आठ दिवसांनी तो न्हावी राजाकडे येई आणि अगदी एकांतात त्या राजाचे केशकर्तन-दाढी-मिशी आदी कार्य करीत असे.
पुढे तो न्हावी मरण पावला. वंशपरंपरे नुसार त्याचा मुलगा ,घनु वडिलांचे काम सांभाळायला आला. राजाने त्याला एकांतात बोलावले. राजाने जसा फेटा काढला तस्सा घनु भीतीने अोरडला कारण राजाला दोन शिंग होते.इतके दिवस हे गुपित राजा व घनुचे बाबा यांच्यातच होते. आता ते घनुला
कळले होते. राजाने त्याला धमकी दिली की ,'जर गुपित उघड झाले तर मृत्यूची शिक्षा देईल'.
घनु आधीच बोलघेवडा . सगळ्या गोष्टी भडभड सा-यांना सांगणारा. आता त्याला हे गुपित पोटात ठेवणे भाग पडले. पण या दबावामुळे तो झुरू लागला. हळुहळू तो सुकू लागला. त्याचे आप्तगण काळजीत पडले. पण घनू कोणाच काही सांगे ना . शेवटी उन्हाळेपावसाळे पाहिलेला एक ज्येष्ठ आप्त म्हणाला "गड्या ,तुझ्या मनात काहीतरी सल आहे,जो तू उघड करू शकत नाहीस. त्याचमुळे तुझी प्रकृती खालावली. असे कर ,एखाद्या जंगलात जा नि तुझी खंत एखाद्या झाडाला सांग.मग तू मोकळा होशील." घनुला ते पटले. तो गेला . एका झाडाला सांगितले. परतला. ताण उतरलेला घनु पूर्वीसारखा पुन्हा हसरा व बोलका झाला. सगळे आप्तेष्ट आनंदले.
इकडे ते झाड झुरु लागले. हळुहळू ते वाळून गेले. एकदा त्या जंगलातून बजय्ये (वाद्य निर्मिती करणारे) कलाकार जात होते. त्यांना जंगलात सरळसोट पण पार वाळलेेले झाड दिसले. त्यांनी ते नीट कापले. त्यातून त्यांनी ढोलकी-पेटी-सारंगी बनवली. मग त्यांनी वाजवून पाहिली .पेटी वर काहीही वाजवलं की सुरावट यायची ,राजा को दो सिंग फुटे।" सारंगी वाजवली की आवाज यायचा ,"किन्ने बताया ,किन्ने बताया"। ढोलकीवर थाप पडली की बोल उमटायचे,"घनुनाईने बताया, घनुनाईने बताया."। सगळे कलाकार आश्चर्यचकित झाले.त्यांना कळेच ना ,हे असे कां झाले? आजवर इतकेदा वाद्य बनवून विकले पण असे कधीच अनुभवले नव्हते त्यांनी. ही अजब वाजणारी वाद्य घेऊन ती गावोगाव ,शहरशहर फिरू लागले. लोकांना ती विचित्र वाद्य वाजवून दाखवू लागले. फिरत फिरत त्या राजाच्या राजधानीत आले. वाद्यांतून येणारा स्पष्ट आवाज एकून राजाचे बिंग फुटले. आता ही गोष्ट सा-यांच्या तोंडी झाली. शेवटी राजाने घनुला बोलावले. घनुने हकिकत सांगितली.
आता राजा काहीही करू शकत नव्हता कारण यात घनुचा दोषच नव्हता. .
झाडाला जीव असतो हे तर सिद्धच झालय विज्ञानाने . झाडाला भावना असतात कां?
झाडांना सुख-दुःख ,आपुलकी ,एकाकीपणा असतो कां?
मौखिकवाङ्मयात झाडांच्या मानवी भावनांविषयी कथा आहेत पण प्रमाणसाहित्यात असेच मानतात कां? झाडांना भावना असतात ही कल्पना आहे कां वास्तव ?
"तृण-कोटरात चिमण्यांची शाळा घेऊन निजला अौदुंबर" अशी उदाहरणे काव्यात चेतनगुणोक्ती अलंकाराची मानतात. म्हणजे मानवी भावना झाडांमध्ये नसतात कां?
सकाळी फिरताना एकमेकाला सावरून धरल्या सारखे झाड नजरेला पडले अन् विचार अाले तेच वर मांडले.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
No comments:
Post a Comment