सहजोक्त.
फळे मधुर खावया , असती नित्य मेवे तसे ।
हिरे-जडित-सुंदरी कनक-पंजरीही वसे ॥
अहर्निश तथापि तो शुक मनात दुःखे झुरे।
स्वतंत्र-वन-वृत्तीच्या घडी घडी सुखाते स्मरे ॥
कृष्णशास्त्री चिपळूणकरांची पृथ्वी वृत्तातील ही अन्योक्ती. जुने लोकं , जुने तत्त्व न् जुने विचार !
आता काळ बदलला . समाजमान्यता बदलल्या.
आता या शुकान्योक्तीला बदलावेच लागेल ना ? "कष्टाची भाकरी" फक्त कथेतच छान.. चिपळूणकर शास्त्रींची क्षमा मागून नव-अन्योक्ती रचते आहे.
फळे मधुर खावया , असती नित्य मेवे तसे ।
हिरे-जडित-सुंदरी कनक-पंजरीही वसे ॥
अहर्निश सुखासनी शुक मजेत ऐदी फिरे ।
स्वतंत्र-वन-वृत्तीला कधीहि तो पुन्हा ना स्मरे ॥
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
No comments:
Post a Comment