आज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची पुण्यतिथी.
उद्या कुसुमाग्रजांची जयंती.म्हणजे मराठीदिवस.
या तीन प्रसंगांवरून एक कविता सुचली.
आज ती एका काव्यमैफ़िलीत म्हणायची आहे.
ती कविता ........
२६.२.२०१७
©डॉ.प्रज्ञा देशपांडे.
बरे झाले स्वातंत्र्यवीर
आता तुम्ही नाही.
जेव्हा होतात तेव्हा
तुमची उपेक्षाच होती॥
तुम्हाला आपले सतीचे
वाण घ्यायची हौस
आम्हाला मात्र सेल्फ़ी ,
फोटोसेशनि मौज॥
तुम्ही देशभक्त तर होताच
क्रांतिकारक ही होतात
मराठीगौरवाचा जाज्वल्य
असा अभिमान होतात॥
तुमचे कवित्व,
तुमचीध्येयासक्ती,
तुमची विद्वत्ता,
तुमचे तेज ,
तुमची ज्ञान-संवेदना,
तुमची ती प्रखरता ।।
सारे सारे कल्पनातीतच
बुद्धीलाही
सामान्यांच्या
नि असामान्यांच्याही॥
जिवंतपणीच तुमची
दंतकथा केली
मृत्युनंतर तर
राष्ट्रिय मरगळच अाली.॥
आज भाषाच कळत
नाही अनेकांना खरी
त्यात तुमचे बोजड
संस्कृतप्रचूर मराठीभारी!॥
म्हणतातात संस्कृतजोखडातून
करा की मुक्त
इंग्रजी-फ़ारसी-अरेबी-
हिंदीने मराठीयुक्त॥
प्रयत्न आज तुमचे
ठरवतात आहे व्यर्थ.
जरी दिले अनेक करून
शब्द मराठी समृद्ध॥
इंग्रजी सोपे नि प्रभावी
वाटू लागले
मराठी व्याकरणाला
जे ते टोकू लागले॥
तुमचे ते बलिदान अन्
मराठीचा अभिमान
राहू द्या तसेच ,
असाल तुम्ही तेव्हा महान॥
आज आम्ही आहोत
मराठीचे समर्थक खंदे
मराठी कशाला म्हणायचे
ते ठरविणारे बंदे॥
आमची मराठी ,सोपी
इंग्रजी-फारसी युक्त
इतिहासही आमचा
आमच्या सोईने युक्त॥
कशाला हवीत ती
सहाच सोनेरी पाने
संमेलनात लुटतो
आम्ही खरे खरे सोने॥
विद्वत्ता-लायकी वगैरे
सोडा जुनी बात
समीक्षण करू आम्ही
आमच्या परि खास॥
सोशल-नेटिझन्स-ग्लोबल
-थिंकरांची मॉडर्न नशा
आम्ही ठरवू ती दिशा
आमच्या विना पहा की दशा॥
उगाच घेतले वाण तुम्ही
केली ससेहोलपाट
स्वत:ची ,कुटुंबाची ,
कुळाची करून वाताहात॥
सातशे अधिक दिडशेचा
प्रभाव करण्या नष्ट
घालविली तुम्ही अख्खी
हयात उपसून कष्ट॥
मिळालेले आयते घबाड
आम्हाला जपताही येत नाही
कणाहीन आमच्याने
भाषिकगुलामगिरी
सोडवत नाही॥
राहिले असते इंग्रज
अथवा राजवट तुर्की
जागतिक असती ना
भाषा आमची बेरकी ॥
आम्ही भक्त तुमचे
असे उच्चरवाने सांगतो
टिशर्ट,मोमेंटोमधून तुमचे
विचार वानवतो॥
तुमचे आचार-कर्तृत्व
अंगी बाणायचे म्हणतो फक्त
प्रसिद्धी-मोठेपणा-दिखावा
यातच आम्ही आसक्त॥
एक मात्र खात्री देतो ,
चिरंतन तुमचे विचार
रुजतील पहा नक्की
त्यासाठी खरच वाट पाहावी
लागेल जन्मोजन्माची पक्की॥
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
उद्या कुसुमाग्रजांची जयंती.म्हणजे मराठीदिवस.
या तीन प्रसंगांवरून एक कविता सुचली.
आज ती एका काव्यमैफ़िलीत म्हणायची आहे.
ती कविता ........
२६.२.२०१७
©डॉ.प्रज्ञा देशपांडे.
बरे झाले स्वातंत्र्यवीर
आता तुम्ही नाही.
जेव्हा होतात तेव्हा
तुमची उपेक्षाच होती॥
तुम्हाला आपले सतीचे
वाण घ्यायची हौस
आम्हाला मात्र सेल्फ़ी ,
फोटोसेशनि मौज॥
तुम्ही देशभक्त तर होताच
क्रांतिकारक ही होतात
मराठीगौरवाचा जाज्वल्य
असा अभिमान होतात॥
तुमचे कवित्व,
तुमचीध्येयासक्ती,
तुमची विद्वत्ता,
तुमचे तेज ,
तुमची ज्ञान-संवेदना,
तुमची ती प्रखरता ।।
सारे सारे कल्पनातीतच
बुद्धीलाही
सामान्यांच्या
नि असामान्यांच्याही॥
जिवंतपणीच तुमची
दंतकथा केली
मृत्युनंतर तर
राष्ट्रिय मरगळच अाली.॥
आज भाषाच कळत
नाही अनेकांना खरी
त्यात तुमचे बोजड
संस्कृतप्रचूर मराठीभारी!॥
म्हणतातात संस्कृतजोखडातून
करा की मुक्त
इंग्रजी-फ़ारसी-अरेबी-
हिंदीने मराठीयुक्त॥
प्रयत्न आज तुमचे
ठरवतात आहे व्यर्थ.
जरी दिले अनेक करून
शब्द मराठी समृद्ध॥
इंग्रजी सोपे नि प्रभावी
वाटू लागले
मराठी व्याकरणाला
जे ते टोकू लागले॥
तुमचे ते बलिदान अन्
मराठीचा अभिमान
राहू द्या तसेच ,
असाल तुम्ही तेव्हा महान॥
आज आम्ही आहोत
मराठीचे समर्थक खंदे
मराठी कशाला म्हणायचे
ते ठरविणारे बंदे॥
आमची मराठी ,सोपी
इंग्रजी-फारसी युक्त
इतिहासही आमचा
आमच्या सोईने युक्त॥
कशाला हवीत ती
सहाच सोनेरी पाने
संमेलनात लुटतो
आम्ही खरे खरे सोने॥
विद्वत्ता-लायकी वगैरे
सोडा जुनी बात
समीक्षण करू आम्ही
आमच्या परि खास॥
सोशल-नेटिझन्स-ग्लोबल
-थिंकरांची मॉडर्न नशा
आम्ही ठरवू ती दिशा
आमच्या विना पहा की दशा॥
उगाच घेतले वाण तुम्ही
केली ससेहोलपाट
स्वत:ची ,कुटुंबाची ,
कुळाची करून वाताहात॥
सातशे अधिक दिडशेचा
प्रभाव करण्या नष्ट
घालविली तुम्ही अख्खी
हयात उपसून कष्ट॥
मिळालेले आयते घबाड
आम्हाला जपताही येत नाही
कणाहीन आमच्याने
भाषिकगुलामगिरी
सोडवत नाही॥
राहिले असते इंग्रज
अथवा राजवट तुर्की
जागतिक असती ना
भाषा आमची बेरकी ॥
आम्ही भक्त तुमचे
असे उच्चरवाने सांगतो
टिशर्ट,मोमेंटोमधून तुमचे
विचार वानवतो॥
तुमचे आचार-कर्तृत्व
अंगी बाणायचे म्हणतो फक्त
प्रसिद्धी-मोठेपणा-दिखावा
यातच आम्ही आसक्त॥
एक मात्र खात्री देतो ,
चिरंतन तुमचे विचार
रुजतील पहा नक्की
त्यासाठी खरच वाट पाहावी
लागेल जन्मोजन्माची पक्की॥
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
हृदयस्पर्शी कविता , विनम्र अभिवादन ।
ReplyDeleteसुंदर
ReplyDeleteधन्यवाद
ReplyDeleteस्वतः सावरकर हयात असते तर अशी कविता केली नसती । कमालीच्या विपरीत परिस्थितीत सावरकर निश्चल होते । सावरकरां पासून प्रेरणा घेऊन निराशाजनक मात्र कविता करून काय साध्य होते ?क्षमस्व ।
ReplyDelete