अगाधजलसञ्चारी गर्वं नायाति रोहितः।
अंगुष्ठोदकमात्रेण शफरी *फर्फरायते*।।
राजा विक्रमादित्य एकदा *सर्वस्वदक्षिणयज्ञ* करू इच्छितो.सर्व तयारी करवतो.सगळ्यांना निमंत्रण देतो.समुद्राला निमंत्रण देण्यास एका दूताला पाठवतो. तोही जातो ,रितीने निमंत्रण देतो. समुद्र त्याला चार रत्न देतो व म्हणतो ,"माझ्यावतीने राजाला दे ".
दूत परततो.तोवर यज्ञ समाप्त होऊन सगळी संपत्ती दान केलेली असते राजाने.दूत राजाला ते चार रत्न देतो नि प्रत्येकाचे वैशिष्ट्य सांगतो
,(१) जे म्हणाल ते सुग्रास जेवण देते
.(२) चतुरंग सेना देते.
(३)पैसा देते .
(૪) दागदागिने देते.
दूताला राजा म्हणतो,
" तू नव्हतास ,यज्ञदक्षिणाकाळ संपला .या रत्नांपैकी जे घ्यायचे ते तू घे ".
दूत म्हणतो ,
"घरी जाऊन घरच्यांना विचारून सांगतो."
राजा होकार देतो.दूत घरी जातो . पत्नी-मुलगा-सून सगळ्यांना हकिकत सांगतो. प्रत्येकजण वेगवेगळे रत्न इच्छितो. एकवाक्यता उरत नाही. दूत दुसरे दिवशी राजाला इत्थंभूत सांगतो.
राजा त्याला चारही रत्न देऊन टाकतो.
महानता कशात असते ?
खरे अौदार्य कोणाते?
निस्पृहता कोणती?
सहज श्रेष्ठत्व कोणाते असते ?
सर्वस्व देऊनही *देण्याची* क्षमता असलेला राजा विक्रमादित्य .आपल्याला आलेली चारही रत्ने सहज ,मनात किल्मिष न आणता देऊन टाकतो.
कारण
"क्रियासिद्धि: सत्वे भवति महतां नोपकरणे"!
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
No comments:
Post a Comment