Sunday, April 18, 2021

#सहजोक्त ~ भाग ८

 #सहजोक्त ~ भाग ८ .


पातालभूतलव्योमचारिणश्छद्मचारिणः ।

न दृष्टुमति शक्तास्ते रक्षितं रामनामभिः ॥8॥

रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन्‌ ।

नरो न लिप्यते पापैर्भुक्तिं मुक्तिं च विन्दति ॥9॥ 

 कवचाची सविस्तर फलश्रुती या दोन श्लोकात सांगितली आहे. 

 पाताळ , भूतळ , आकाश या तीनही ठिकाणी विचरण करणारे  , छद्मवेषात वावरणारे , म्हणजे खरे स्वरूप लपवून  या तीनही ठिकाणी हिंडणारे जीव-जंतू , जे आपल्या डोळ्यांनी दिसतही नाहीत. अशा सर्वांपासून  रक्षण होते. 

  रोगराई पसरवणारे जंतुंपासून रक्षण होईल. 

  श्रद्धा फारच महत्त्वाची आहे. 

 राम , रामचंद्र , रामभद्र  वगैरे कोणत्याही नावाचे स्मरण करा , ज्यामुळे व्यक्ती पापात गुंतत नाही. तसेच विहित उपभोग घेत मुक्ती लाभते. 

 रामाचे नामस्मरण सतत करीत र‍हीले तर मनात वाईट विचार येणारच नाहीत. हे खरे आहे. 

 ©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

No comments:

Post a Comment