#सहजोक्त ~ भाग ८ .
पातालभूतलव्योमचारिणश्छद्मचारिणः ।
न दृष्टुमति शक्तास्ते रक्षितं रामनामभिः ॥8॥
रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन् ।
नरो न लिप्यते पापैर्भुक्तिं मुक्तिं च विन्दति ॥9॥
कवचाची सविस्तर फलश्रुती या दोन श्लोकात सांगितली आहे.
पाताळ , भूतळ , आकाश या तीनही ठिकाणी विचरण करणारे , छद्मवेषात वावरणारे , म्हणजे खरे स्वरूप लपवून या तीनही ठिकाणी हिंडणारे जीव-जंतू , जे आपल्या डोळ्यांनी दिसतही नाहीत. अशा सर्वांपासून रक्षण होते.
रोगराई पसरवणारे जंतुंपासून रक्षण होईल.
श्रद्धा फारच महत्त्वाची आहे.
राम , रामचंद्र , रामभद्र वगैरे कोणत्याही नावाचे स्मरण करा , ज्यामुळे व्यक्ती पापात गुंतत नाही. तसेच विहित उपभोग घेत मुक्ती लाभते.
रामाचे नामस्मरण सतत करीत रहीले तर मनात वाईट विचार येणारच नाहीत. हे खरे आहे.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
No comments:
Post a Comment