पञ्चकन्या !
अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा ।
पञ्चकं ना स्मरेन्नित्यं महापातकनाशनम् ।।
हा श्लोक अतिशय प्रसिद्ध आहे.
या श्लोकाचे अनेक पाठभेद प्रचलित आहे. "पञ्चकन्याः स्मरेन्नित्यं महापातकनाशनम् ।" असाही श्लोकार्ध प्रसिद्ध आहे. या श्लोकात पाच स्त्रियांची नामे आहेत म्हणून पाचकन्या असा शब्द श्लोकात असावा असा समज होतो. पण संस्कृतमध्ये "कन्या" कोणाला म्हणावे यावर विचार केला आहे. जी दशवर्षिया कुवारी असते ती कन्या.
(कन् दीप्तौ + अघ्न्यादित्वात् यक् इत्युणादौ ४ । १११ । कन्यायाः कनीन् चेति निर्द्देशात् पाणिनिमतानुसारेण न ङीष् अतष्टाप् ।) कुमारी । इत्यमरः ॥ २ । ६ । ८ । सा तु दशमवर्षीया । इति स्मृतिः ॥ (यथा महाभारते वनपर्ब्बणि । “यस्मात् कामयते सर्व्वान् कमेर्धातोश्च भाविनि ! । तस्मात् कन्येह सुश्रोणि ! स्वतन्त्रा बरवर्णिनि !” ॥)
वरील श्लोकात उल्लेखलेल्या सर्व महिला विवाहिता असून त्या कन्या नक्कीच नाहीत.
श्लोकात "पंचकं" असा शब्द जास्त अर्थवाही आहे. पंचक म्हणजे पाचांचा समुदाय. श्लोकात ज्या पाचांचा उल्लेख आहेत , त्यात विविध कुलातील महिला आहेत.
जसे
अहल्या = ही मेनका-भद्राश्व राजा यांची कन्या व ऋषिपत्नी होती. द्रौपदी= याज्ञसेनी ही द्रुपदराजाला यज्ञातून लाभलेली तेजस्वी कन्या होती. सीता = ही जनकराजाने सांभाळलेली भूमिकन्या होती.
तारा = ही वानरकुलातील होती. मंदोदरी= ही ऋषी काश्यप यांचा पुत्र मयासुर व अप्सरा हेमा यांची कन्या होती.
या श्लोकात जो "ना" शब्द दिसत आहे तो नृ (मानव) या मूळ शब्दाचे प्रथमेचे एकवचन आहे. "पञ्चकं ना स्मरेत् नित्यम्" या वाक्याचा अर्थ असा की ,
" या पाचांच्या समूहाला मानवाने नेहमी स्मरावे".
मनात एखादी विकृती येणे वा समाजमान्य वागणुकीनुसार चुकीचे वर्तन घडणे , एखाद्या व्यक्तीकडून घडू शकते. ही मानवी प्रकृती आहे. मानवी मन , बुद्धी व वर्तन कधी कधी समीक्षेबाहेर असू शकते. अशा वेळी त्या व्यक्तीला (१) परत चुकीच्या मार्गावर न ढकलता ,
किंवा (२) चुकीचे समर्थन करायला भाग न पाडता,
किंवा (३) चुकीचे गौरवीकरण न करता ,
किंवा (૪) चुकीमुळे आयुष्यातून न उठवता ,
सामान्य व्यक्ती म्हणून जगण्यास बळ देणे ; ही खरी संस्कृती .
वरील सर्व स्त्रियांचे उदाहरणं आपल्याला हाच दाखला देतात. वरील महिला मोहाने , अज्ञानाने , अगतिकतेने , सूडभावनेने वा समाजबंधनाने पतित झाल्या. तरीही त्यांच्या स्पष्ट , दंभहीन व निखळ वागणुकीमुळे समाजाला त्या वंदनीय झाल्या.
हा श्लोक केवळ मानवी भावभावनांचे व्यवस्थापन कसे करावे ? यासाठी आहे कां ? नाही. हा श्लोक दुसराही महत्त्वाचा संदेश देतो.
माती हा अत्यंत महत्त्वाचा पण नेहमीच दुर्लक्षित राहिलेला स्त्रोत आहे. या घटकाकडे जगभरातील लोकांचे लक्ष वेधणे तसेच मातीच्या संवर्धनाची असलेली गरज याबाबत जनजागृती करणेसाठी 5 डिसेंबर हा 'जागतिक मृदा दिन' म्हणून साजरा करण्यात येतो.
हा श्लोक जमिनीचे संवर्धन व व्यवस्थापन नि उत्पादकता कशी वाढवावी ? या विषयीचाही आहे.
अहल्या = म्हणजे ज्या जमिनीवर कधीच "हल" (नांगर) चालवला नाही. म्हणजे जंगलातील , न कसलेली जमीन.
द्रौपदी = दुबार पेरणी करण्याजोगी सुपिक जमीन.
सीता = पांढरी माती असलेली भूमी.
पांढरी माती काही जुन्या लोकांच्या मतानुसार ही पूर्णपणे नैसर्गिक माती आहे. यात कुठल्याही घटकाच मिश्रण नाही. किंवा कुठलेही घटक एकत्र करून ही माती बनवली गेलेली नाही. ही माती बहुधा राजस्थान, हरीयाणा, पंजाब या भागात आढळते. पूर्वी वाडे, गढी बांधण्यासाठी वापरली जायची .
तारा = म्हणजे पानथळ जमीन जिच्यात आकाशातील तारामंडळ प्रतिबिंबित होते.
भूगर्भातील पाण्याचे पुनर्भरण करण्याचे काम या पाणथळ जमीनी करतात. पाणथळ जागी वाढणाऱ्या वनस्पती या प्रदूषित पाणी आणि इतर हानीकारक घटकांना गाळण्याचे काम करून पाणी शुद्धा करतात. अलिकडच्या काळात असेही आढळून आले आहे की पाणथळ प्रदेशात वाढणाऱ्या काही वनस्पतींच्या मुळांपासून थेट वीजनिर्मितीही करता येते. भातखाचरे आणि मत्स्यबीज उत्पादनासाठी बनवलेली तळी हे देखील पाणथळ प्रदेशातच समाविष्ट होत असल्याने त्यातून जगभरातील लोकांना त्यांचे दररोजचे अन्न खायला मिळते.
मंदोदरी = नांगर न चालवताही , न कसताही भरपूर उत्पादन देणारी मऊ , भुसभुशीत व सुपिक जमीन .
आरोग्यदायक माती हा आरोग्यदायक अन्न निर्मितीचा पाया आहे. विविध पिके आणि शेती यांचा पाया माती आहे. अन्नधान्याच्या 90 टक्के गरजा मातीद्वारेपूर्ण होतात. जंगले वाढविण्यासाठी मातीचीच आवश्यकता असते. पृथ्वीचा एक चतुर्थांश भाग विविध जीवांनी व्यापला असून ही जैव विविधता टिकवून ठेवण्यात मातीचा मोलाचा वाटा आहे. मातीमध्ये पाणी अडविण्याची, साठविण्याची आणि शुद्ध करण्याची क्षमता आहे. माती अमूल्य आहे. अन्न, वस्त्र व निवारा या आपल्या मूलभूत गरजा मातीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. आधुनिक युगात मातीविना शेती यासारख्या संकल्पना उदयास आल्या असल्या तरी जगातील महाकाय लोकसंख्येचे पोट भरण्याचे सामर्थ्य यामध्ये नाही. या सर्व बाबींचा सूक्ष्म विचार करून सहज व्यवहारात त्याचा उपयोग करून घेण्याची हातोटी हीच आपल्या भारतीय संस्कृतीची महती आहे.
वरील श्लोक म्हणूनच प्रत्येकाने मनन व चिंतन करून आचरणात आणावा , हेच संस्कृतिरक्षण होय.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
खूपच छान अर्थ सांगितला आहेस. हा अर्थ माहित नव्हता.
ReplyDeleteधन्यवाद
Delete