#शब्दचिंतन -वर्णविचार १
वर्णविचार . .म्हटलं की व्याकरणातील एक भाग वाटतो. किंवा भाषाविज्ञानातील प्रकरण. एकूणच अभ्यासक्रमाशी संबंधित अध्येय घटक असंच मत होतं .ते स्वाभाविक आहे.
बोली ,भाषा कोणतीही असो ; तिचे मूळ उच्चारातच असते. उच्चाराचे वेगवेगळे ध्वनी असतात. त्या ध्वनींना दर्शवणारे चिह्न असतात. त्या चिह्नांनाच लिपी म्हणतात. प्रत्येक भाषा लिपीतूनच लिहिल्या जाते. लिपीचं मूळ एकक म्हणजे अक्षर . क्षर म्हणजे नाश ,लोप . अक्षर नष्ट होत नाहीत ,लुप्त होत नाहीत. उच्चारानंतर ध्वनी नष्ट होतात पण लिपीतील चिन्ह तेच तसेच राहतात.
प्रत्येक भाषेची लिपी वेगवेगळी असते.
ललितविस्तर नामक बौद्ध ग्रंथात ६૪ लिपींचा उल्लेख आहे. तर जैन साहित्यात १०० हून अधिक लिपींचा उल्लेख आहे.आज जगात लाखोंच्यावर बोली-भाषा आहेत. पण लिपींची संख्या शेकड्यांच्या अात आहे. भाषाविज्ञानात भाषेचे जसे परिवार आहेत तसे लिपीचेही आहेत.मूळ लिपी तीन प्रकारच्या आहेत.
१)चित्र लिपी = चिनी ,जपानी इत्यादी
२)ब्राह्मी लिपी =भारतीय लिपी व दक्षिण-आशियायी लिपी
३) फोनेशियन = युरोप ,मध्य आशिया व उत्तर आफ्रिकेतील लिपी.
कोणतीही भाषा कोणत्याही लिपीतून लिहिल्या जाऊ शकते. उदाहरणार्थ मराठीची लिपी देवनागरी आहे पण ती इंग्रजी (रोमन) लिपीतून लिहिता येते. याला 'लिप्यन्तर' असे म्हणतात.
ब्राह्मी लिपीतून देवनागरी लिपी उत्क्रांत झाली. आज संस्कृत,पालि ,मराठी ,हिंदी ,नेपाळी ,कोंकणी ,सिंधी ,कश्मिरी ,डोगरी ,तमांग,बोडो, अंगिका,संथाली ,मैथिली ,मगही ,भोजपुरी,
गढवाली या भाषांसह काही प्रमाणात पंजाबी ,गुजराथी, विष्णुपुरिया ,मणिपुरी ,रोमानी ,उर्दू याही भाषा देवनागरी लिपीत लिहिल्या जातात.
स्पष्टोच्चारिता हे देवनागरी लिपीचे वैशिष्ट्य आहे .
पाणिनींच्या अष्टाध्यायीत उच्चारणाचे बारकावे अतिशय काटेकोरपणे नोंदवले आहेत. प्रत्येक स्पष्ट उच्चारणाचे स्वतंत्र चिन्ह हे देवनागरीचे अजून एक वैशिष्ट्य होय.
आज जगामधे सर्वात जास्त लिहिल्या जाणारी लिपी ही देवनागरी आहे.
भाषा वाक्यांपासून तयार होते. वाक्य शब्दांचे तयार होते. शब्द अक्षरांपासून नि अक्षरे म्हणजेच विशिष्ट उच्चारांचे चिह्न .यांनाच वर्ण असेही म्हणतात .या वर्णांचे भेद असतात.
पुढल्या भागात वर्णां विषयी विचार करू.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे
वर्णविचार . .म्हटलं की व्याकरणातील एक भाग वाटतो. किंवा भाषाविज्ञानातील प्रकरण. एकूणच अभ्यासक्रमाशी संबंधित अध्येय घटक असंच मत होतं .ते स्वाभाविक आहे.
बोली ,भाषा कोणतीही असो ; तिचे मूळ उच्चारातच असते. उच्चाराचे वेगवेगळे ध्वनी असतात. त्या ध्वनींना दर्शवणारे चिह्न असतात. त्या चिह्नांनाच लिपी म्हणतात. प्रत्येक भाषा लिपीतूनच लिहिल्या जाते. लिपीचं मूळ एकक म्हणजे अक्षर . क्षर म्हणजे नाश ,लोप . अक्षर नष्ट होत नाहीत ,लुप्त होत नाहीत. उच्चारानंतर ध्वनी नष्ट होतात पण लिपीतील चिन्ह तेच तसेच राहतात.
प्रत्येक भाषेची लिपी वेगवेगळी असते.
ललितविस्तर नामक बौद्ध ग्रंथात ६૪ लिपींचा उल्लेख आहे. तर जैन साहित्यात १०० हून अधिक लिपींचा उल्लेख आहे.आज जगात लाखोंच्यावर बोली-भाषा आहेत. पण लिपींची संख्या शेकड्यांच्या अात आहे. भाषाविज्ञानात भाषेचे जसे परिवार आहेत तसे लिपीचेही आहेत.मूळ लिपी तीन प्रकारच्या आहेत.
१)चित्र लिपी = चिनी ,जपानी इत्यादी
२)ब्राह्मी लिपी =भारतीय लिपी व दक्षिण-आशियायी लिपी
३) फोनेशियन = युरोप ,मध्य आशिया व उत्तर आफ्रिकेतील लिपी.
कोणतीही भाषा कोणत्याही लिपीतून लिहिल्या जाऊ शकते. उदाहरणार्थ मराठीची लिपी देवनागरी आहे पण ती इंग्रजी (रोमन) लिपीतून लिहिता येते. याला 'लिप्यन्तर' असे म्हणतात.
ब्राह्मी लिपीतून देवनागरी लिपी उत्क्रांत झाली. आज संस्कृत,पालि ,मराठी ,हिंदी ,नेपाळी ,कोंकणी ,सिंधी ,कश्मिरी ,डोगरी ,तमांग,बोडो, अंगिका,संथाली ,मैथिली ,मगही ,भोजपुरी,
गढवाली या भाषांसह काही प्रमाणात पंजाबी ,गुजराथी, विष्णुपुरिया ,मणिपुरी ,रोमानी ,उर्दू याही भाषा देवनागरी लिपीत लिहिल्या जातात.
स्पष्टोच्चारिता हे देवनागरी लिपीचे वैशिष्ट्य आहे .
पाणिनींच्या अष्टाध्यायीत उच्चारणाचे बारकावे अतिशय काटेकोरपणे नोंदवले आहेत. प्रत्येक स्पष्ट उच्चारणाचे स्वतंत्र चिन्ह हे देवनागरीचे अजून एक वैशिष्ट्य होय.
आज जगामधे सर्वात जास्त लिहिल्या जाणारी लिपी ही देवनागरी आहे.
भाषा वाक्यांपासून तयार होते. वाक्य शब्दांचे तयार होते. शब्द अक्षरांपासून नि अक्षरे म्हणजेच विशिष्ट उच्चारांचे चिह्न .यांनाच वर्ण असेही म्हणतात .या वर्णांचे भेद असतात.
पुढल्या भागात वर्णां विषयी विचार करू.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे
No comments:
Post a Comment