कधी कधी चूक काय नि बरोबर काय ,कळेनासे होते. बरेचदा भाषा-व्याकरणाचे नियम वेगळे असतात नि व्यवहारात वेगळाच शब्द असतो. मग गोंधळ होतो.
"शास्त्रात् रूढिः बलीयसी" म्हणूनच म्हटले जाते.
काही प्रचलित शब्द बघा . .
प्राथमिक ,निरलस दुरवस्था , अनसूया ,पारंपरिक .
अजून शोधले तर अजून सापडतील.
वर लिहिलेले हे शब्द व्याकरण दृष्ट्या निर्दोष आहेत. पण समाजात यांचे उच्चारण व लेखन बहुतांश वेळा अयोग्य केल्या जाते.पुढे निर्दोष शब्द दिला आहे व त्याच्या समोर प्रचलित दोष काय ते सांगितले आहे.
जसे
प्राथमिक = प्रार्थमिक ,इथे अकारण एक जास्त रफार उच्चारला जातो.
निरलस = निरालस , निर् +अलस =निरलस हे जरी खरं असलं तरी म्हणताना 'निरालस' म्हणतात.
अनसूया =अन्+असूया . पण बरेच जण अनुसया असेच म्हणतात. याला तद्भव म्हणावे की विकृत ??
पारंपरिक = 'इक ' प्रत्ययान्त शब्द भाषेत अनेक आहेत . हा प्रत्यय लागताना मूळ शब्दात काही बदल होतात पण ते समानच असतात. जसं इथेच पाहू.
परंपरा + इक= पअरंपरिक.
स्वभाव + इक= स्वाभाविक
प्रथम + इक = प्राथमिक
मध्यम +इक = माध्यमिक
परिवार +इक = पारिवारिक
वरील उदाहरणात मूळ शब्दातील सुरवातीच्या अकाराचा आ-कार झाला.
भूगोल +इत = भौगोलिक
भूमिती +इक = भौमितिक
भूति +इक = भौतिक
वरील उदाहरणात उकाराचा ओ-कार झाला.
इतिहास +इक = ऐतिहासिक
नीती + इक = नैतिक
इह +इक = ऐहिक
वरील उदाहरणात इकाराचा ऐ-कार झाला.
मूळ शब्द काय ? त्याचे परिवर्तन कसे ? हे जाणून घेतले तर दोषपूर्ण उच्चारण व लेखन टाळाता येऊ शकेल.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
No comments:
Post a Comment