व्हॅलेंटाईन सप्ताह -आधुनिक काळातील नवी व्रत(?) !!
माणूस तसा उत्सवप्रिय असतोच . त्यातही भारतीय माणूस फारच जास्त उत्सवप्रिय व श्रद्धालू ! "एकदा मनात बसलं की मग ते करायचेच" अशा वृत्तीचे आम्ही भारतीय , मग ती गोष्ट बुद्धीला पटवायची ,शास्त्रात तिची पाळेमुळे शोधायची ,वादविवाद करायचे इत्यादी इत्यादी .
देवता ,देवांचे अवतार, त्याच्या कथा ,त्यांच्या संबंधी आचारधर्म हे सारं सारं काळाच्या अोघात सुरु झाले पण नेमकं कधी ? हे सांगता येत नाही.
वैदिक काळात नसलेली अनेक दैवते मध्यकाळात उदयाला आलीत व आता सुप्रतिष्ठित झालीत. नवदेवता उदयाची सुरुवात कधी कुठे झाली, हे सांगणं या लेखाचा उद्देश नाही. त्यासाठी स्वतंत्र लेख लिहावा लागेल.
लाखों वर्षांचा इतिहास असलेल्या भारतीय संस्कृतीत हजारो वर्षांच्या परचक्रांच्या आक्रमणानंतर काही व्रतं,सण ,पद्धती सहज मिसळल्या गेल्यात. आज शोधूनही त्यांचा परकेपणा लक्षात येत नाही, पडडापद्धत ,काळीपोत ही वानगी दाखल .
समाजात फॅशनप्रमाणे धार्मिकाचारही रूढ होतात ,असं म्हटलं तर वावगं ठरू नये.
पांढरे बुधवार ,संतोषीमाताव्रत ,वैभवलक्ष्मीव्रत , नवरात्रीत रंगपूजा इत्यादी लेटेस्ट व्रतवैकल्ये म्हटले तर अतिशयोक्ती नाही.
वरील सर्व व्रते श्रद्धेतून निर्माण झाले मात्र
आताच्या काळात एक नवे व्रत मार्केटिंगवाल्यानी मार्केटिंगफ़ंडा म्हणून रुजवले आहे. . ते व्रतही साधं-सोप्प नाही. जे करतात त्यांना तर तप करावेच लागते पण जे करत नाहीत त्यांनाही फारच जागृक रहावे लागते.
तंत्रज्ञानामुळे जग जवळ आले. दूर देशीच्या
रूढी-परंपरा सगळीकडे माहीत होऊ लागल्या. हे युग विज्ञान-तंत्रज्ञानाहूनही जाहिरातयुग म्हणून जास्त अोळखले जाते. सोशलमिडियामुळे
वैयक्तिक-जीवनाची देखिल जाहीर प्रसिद्धी महत्त्वाची ठरू लागली आहे. "मिडिया साक्षीने दिखावा" हा आजच्या युगाचा मूलमंत्र ठरतोय. "दाखवण्यासाठी वाट्टेल ते ". ..अोघाने आलेच. त्यात हे नवीन व्रत म्हणजे मार्केटिंगच्या जमान्यात हिट ठरले. या व्रतासाठीच्या साधनसामग्रीची विक्री पूर्वी व्रतोपासकांमध्ये सहज होत नव्हती पण जेव्हा विरोधक टोकाचा विरोध करू लागले अन् हे व्रत भारतातील खेड्यापाड्या पर्यंत थेट पसरले व मार्केटला बरे दिवस आले. हे म्हणजे अगदीे "दारुबंदीच्या जिल्ह्यात जास्त खपते " सारखं झाले .
कोणतं बरं हे नवं व्रत ? काय बरं त्याचे नियम ? कोण त्याची इष्ट देवता ? फळ काय त्या व्रताचे ? कोणी व केव्हा करायचे ते व्रत ? या सर्व प्रश्नांची मालिका डोक्यात निर्माण होणे स्वाभाविकच !
हे व्रत म्हणजे "व्हॅलेंटाईन सप्ताह "!!!
जसे इतर सप्ताह असतात , तसेच या संत व्हॅलेंटाईनच्या नावाने केल्या जातो. सत्यनारायण कथेसारखी याही व्रताची कहाणी आहे. या व्रताची माहिती "विकिपिडिया" नामक आधुनिक ज्ञानकोशात सविस्तर आहेच.
तरी माहिती असो म्हणून सांगते. हे सात दिवसांचे व्रत आहे. कोणी करावे तर प्रेम समजणा-या
सगळ्यांंनी ! लग्न न झालेल्या तरूण-तरुणींसाठी विशेष लाभदायी ठरते . (तारुण्याचा वयाशी संबंध नाही ,मानसिकता महत्वाची!! )
फेब्रुवारी नामक आंग्ल महिन्याच्या (पगार घेतांना महिन्याला आंग्ल असे म्हणू नये .) सात तारखेपासून या कठोर व्रताची सुरुवात होते.
( मुळात हा सण आंग्लभूमीतून इंपोर्त केला असल्यामुळे आणि सेमी इंग्रजी व इंग्रजी माध्यमातील शिक्षणामुळे यातील दिवसांची नावे इंग्रजीत म्हटली तरच प्रभावी ठरतात .)
या व्रताच्या पहिल्या दिवसाला "रोझ डे"म्हणतात.
या रोझ डेच्या दिवशी बाजारात एरवी रुपयाला मिळणारे गुलाबाचे फ़ूल प्रचंड महाग होते. ते फूल आपल्या व्हॅलेंटाईनला द्यावे . वर्षभर देवतेचा शोध घ्यावा. आपल्या जीवनात अनेक दैवतं असतील तर प्रत्येकाची इतमामानुसार खातीरदारी करावी. आणि महत्वाचे म्हणजे गुप्तदान जास्त हितकारक ठरते. या देवतेचे त्या देवतेला कळवू नये !!!
दुसरा दिवसला "प्रपोज डे" म्हणतात. म्हणजे काल फुल दिलेल्या वा न देऊ शकलेल्या "कोणाला तरी" प्रपोज करायचे म्हणजे
"मला तू आवडते/आवडतो ". असं सांगायचं . दरवर्षी एकाच कानाला सांगायचे की वेगवेगळ्या कानांना हे तुमच्या "प्रेमळपणावर" अवलंबून आहे. सांगणं महत्त्वाचे ; कोणाला ,किती वेळा या फालतू हिशोबात पडायचे नाही.
तिसरा दिवस असतो चॉकलेट डे. नशिब चांगले की कंपनीने बनविलेले चॉकलेट वर्षभर सारख्याच किमतीत मिळते. तर देवतेच्या किमतीनुसार मग आपली पत पाहून भारी चॉकलेट विकत घ्यावे . देवतेला अर्पण करावे ,तिने तुकडा दिला (चॉकलेटचा) तर अमृतानंदाने स्वीकारावा ,(मेली हावरट ,एकटीने खाल्ले ; असा कुविचार मनातही करू नये .)
चौथा दिवस "टेडीडे" म्हणून साजरा करतात. टेडी नामक एक अस्वलाची प्रजाती बाहुल्याच्या रूपात बाजारात विकत मिळते. या दिवशी आपलं प्रतीक म्हणून देवतेला अर्पण करावे. (आपलं माकड होण्या आधी आस्वल पाठवायचं !!फारच भारी आयडिया ) अन् मनात कल्पना करावी की आपण दिलेले ते (आस्वल नाही म्हणायचं ) टेडी अगदी देवतेने हृदयाजवळ बिलगून ठेवलेय ! नशीबाचे भोग !!!
मग पाचवा दिवस अवतरतो . "प्रॉमीस डे" नावाने.
इथे काय वाटेल ते प्रॉमीस बिंधास्त द्यावे. प्रॉमीस पूर्ण करायला देवता कायम जवळ राहायला हवी ,नाही तर ती पत्नीच्या रुपाने अवतरली तर प्रॉमीसरी नोटवर जरी लिहून दिले तरी अविश्वास कायमच असणार ! त्यामुळे "वचने का दरिद्रता ?" या न्यायाने काहीही प्रॉमीस करा. पूर्ण होणे न होणे त्या दुष्ट नियतीवर अवलंबून आहे. आपण बापडे काय करू शकतो ?
सहावा दिवस "हगडे" !! टिव्हीवर हगीजची अॅड पाहून नाव जरी मराठी कानांना खराब वाटले तरी या दिवशी "प्रथम भेटी आलिंगन " करणे अपेक्षित आहे. तर जसं जमेल तसं गळाभेट घेऊन पहा . नाही तर गळा दाटून येऊनही फारसा फरक पडणार नाही.
सातवा दिवस फार म्हणजे फारच मोठ्ठा ठरू शकतो. तो दिवस आहे "किसडे"! किस झाड की पत्ती किंवा बटाट्याचा ,गाजराचा किस असलं काही यात नाही. अधिकृत नात्यापेक्षा चोरट्या नात्यांत असलं किस पाडणं जास्तच घडतं ! किसी को किसी की खबर न लागू देता हा डे पार पाडणं फारच रोमांचकारी ठरू शकतो. "अधरामृतरसपान" कसा भारदस्त शब्द वाटतो ना किसफिसपेक्षा ? जाऊ दे ,नाव काहीही द्या ,"क्रियावान् स पण्डित: ।" हेच खरे.
आठव्या दिवशी व्रत समाप्तीचा मोठा उत्सवच असतो. तो म्हणजे "व्हॅलेंटाईन डे"! सात दिवस सातत्याने (शक्यतो एकाच ) देवतेचे आराधन
तन-मन-धनाने (शब्दश: बरे) केल्यावर जर देवता प्रसन्न झाली "तर मग काय उणे या लाभा ?!" अशी अवस्था होते. सात दिवसात इतके प्रेमाचे रंग उधळल्यावर जर खिशात अन् "जिगर मा" दम असेल तर उरले-सुरले उधळून मोकळे व्हावे. परिणामाची जाणीव शेजारी ,समाज ,काळ करून देईलच.
एकूणच बाजारीकरणाच्या आजच्या काळात सगळीकडे सवंग उथळपणा वाढला आहे. त्यामुळे "प्रेमदिन" म्हटले की "भीगे होठ तेरे ,प्यासा दिल है मेरा . . . करू प्यार " इतकेच डोक्यात भिनलेले जोडपे "कामातुराणां भयं न लज्जा" वागताना दिसतात. समाजात प्रेमाविषयी अजब धारणा आहे . ती म्हणजे "आपलं ते प्रेम ,दुस-याचं ते लफडं!" पण हे दोन्ही अतिरेक सोडले तर योग्य वयात योग्य व्यक्तीसह समाजमान्य पद्धतीने हे व्रत(?) पाळले तर बिघडलं कुठे ?
अशा प्रकारे सोशलमिडियाने व मार्केटिंगवाल्यांनी नव्या व्रताला येन केन प्रकारेण समाजमान्य करण्याचा घटच घातला जणू . "अग आग म्हशी मला कुठे नेशी" म्हणत अनेक जण हा दिवस ,हा सप्ताह साजरा करू लागले. एकुलत्या एक मुलाने हट्टाने स्वत:च्या मर्जीची मुलगी लग्नाला निवडावी व मुलाला जपण्याच्या नादात नावडती असूनही नांदायला घरात घ्यावी लागल्यावर जी अोढाताण सासु-सुनेची होते तसं काहीसं या व्रताबद्दल विरोधक व समर्थकांचे होत आहे.
व्रताला जर बाजारू मार्केटिंगचा डूब न देता मर्यादा-संयम-जबाबदारी यांची साथ दिली तर हे ही सहिष्णुतेने स्वीकारल्याच जाईल ना ! भारतीय संस्कृती कधीच प्रेमाच्या विरुद्ध नव्हतीच . उलट पुरणकथा ,धार्मिक वाङ्मय ,साहित्यशास्त्र वाचले तर नवरसात स्थान असलेले श्रुंगाररस देवादिकांनाही निषिद्ध नव्हता.
"प्रेमभावना" चूक नाहीच फक्त विवेक व दायित्व भावना अपेक्षित आहे न् ती अपेक्षा सर्व काळात रास्तच आहे.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
माणूस तसा उत्सवप्रिय असतोच . त्यातही भारतीय माणूस फारच जास्त उत्सवप्रिय व श्रद्धालू ! "एकदा मनात बसलं की मग ते करायचेच" अशा वृत्तीचे आम्ही भारतीय , मग ती गोष्ट बुद्धीला पटवायची ,शास्त्रात तिची पाळेमुळे शोधायची ,वादविवाद करायचे इत्यादी इत्यादी .
देवता ,देवांचे अवतार, त्याच्या कथा ,त्यांच्या संबंधी आचारधर्म हे सारं सारं काळाच्या अोघात सुरु झाले पण नेमकं कधी ? हे सांगता येत नाही.
वैदिक काळात नसलेली अनेक दैवते मध्यकाळात उदयाला आलीत व आता सुप्रतिष्ठित झालीत. नवदेवता उदयाची सुरुवात कधी कुठे झाली, हे सांगणं या लेखाचा उद्देश नाही. त्यासाठी स्वतंत्र लेख लिहावा लागेल.
लाखों वर्षांचा इतिहास असलेल्या भारतीय संस्कृतीत हजारो वर्षांच्या परचक्रांच्या आक्रमणानंतर काही व्रतं,सण ,पद्धती सहज मिसळल्या गेल्यात. आज शोधूनही त्यांचा परकेपणा लक्षात येत नाही, पडडापद्धत ,काळीपोत ही वानगी दाखल .
समाजात फॅशनप्रमाणे धार्मिकाचारही रूढ होतात ,असं म्हटलं तर वावगं ठरू नये.
पांढरे बुधवार ,संतोषीमाताव्रत ,वैभवलक्ष्मीव्रत , नवरात्रीत रंगपूजा इत्यादी लेटेस्ट व्रतवैकल्ये म्हटले तर अतिशयोक्ती नाही.
वरील सर्व व्रते श्रद्धेतून निर्माण झाले मात्र
आताच्या काळात एक नवे व्रत मार्केटिंगवाल्यानी मार्केटिंगफ़ंडा म्हणून रुजवले आहे. . ते व्रतही साधं-सोप्प नाही. जे करतात त्यांना तर तप करावेच लागते पण जे करत नाहीत त्यांनाही फारच जागृक रहावे लागते.
तंत्रज्ञानामुळे जग जवळ आले. दूर देशीच्या
रूढी-परंपरा सगळीकडे माहीत होऊ लागल्या. हे युग विज्ञान-तंत्रज्ञानाहूनही जाहिरातयुग म्हणून जास्त अोळखले जाते. सोशलमिडियामुळे
वैयक्तिक-जीवनाची देखिल जाहीर प्रसिद्धी महत्त्वाची ठरू लागली आहे. "मिडिया साक्षीने दिखावा" हा आजच्या युगाचा मूलमंत्र ठरतोय. "दाखवण्यासाठी वाट्टेल ते ". ..अोघाने आलेच. त्यात हे नवीन व्रत म्हणजे मार्केटिंगच्या जमान्यात हिट ठरले. या व्रतासाठीच्या साधनसामग्रीची विक्री पूर्वी व्रतोपासकांमध्ये सहज होत नव्हती पण जेव्हा विरोधक टोकाचा विरोध करू लागले अन् हे व्रत भारतातील खेड्यापाड्या पर्यंत थेट पसरले व मार्केटला बरे दिवस आले. हे म्हणजे अगदीे "दारुबंदीच्या जिल्ह्यात जास्त खपते " सारखं झाले .
कोणतं बरं हे नवं व्रत ? काय बरं त्याचे नियम ? कोण त्याची इष्ट देवता ? फळ काय त्या व्रताचे ? कोणी व केव्हा करायचे ते व्रत ? या सर्व प्रश्नांची मालिका डोक्यात निर्माण होणे स्वाभाविकच !
हे व्रत म्हणजे "व्हॅलेंटाईन सप्ताह "!!!
जसे इतर सप्ताह असतात , तसेच या संत व्हॅलेंटाईनच्या नावाने केल्या जातो. सत्यनारायण कथेसारखी याही व्रताची कहाणी आहे. या व्रताची माहिती "विकिपिडिया" नामक आधुनिक ज्ञानकोशात सविस्तर आहेच.
तरी माहिती असो म्हणून सांगते. हे सात दिवसांचे व्रत आहे. कोणी करावे तर प्रेम समजणा-या
सगळ्यांंनी ! लग्न न झालेल्या तरूण-तरुणींसाठी विशेष लाभदायी ठरते . (तारुण्याचा वयाशी संबंध नाही ,मानसिकता महत्वाची!! )
फेब्रुवारी नामक आंग्ल महिन्याच्या (पगार घेतांना महिन्याला आंग्ल असे म्हणू नये .) सात तारखेपासून या कठोर व्रताची सुरुवात होते.
( मुळात हा सण आंग्लभूमीतून इंपोर्त केला असल्यामुळे आणि सेमी इंग्रजी व इंग्रजी माध्यमातील शिक्षणामुळे यातील दिवसांची नावे इंग्रजीत म्हटली तरच प्रभावी ठरतात .)
या व्रताच्या पहिल्या दिवसाला "रोझ डे"म्हणतात.
या रोझ डेच्या दिवशी बाजारात एरवी रुपयाला मिळणारे गुलाबाचे फ़ूल प्रचंड महाग होते. ते फूल आपल्या व्हॅलेंटाईनला द्यावे . वर्षभर देवतेचा शोध घ्यावा. आपल्या जीवनात अनेक दैवतं असतील तर प्रत्येकाची इतमामानुसार खातीरदारी करावी. आणि महत्वाचे म्हणजे गुप्तदान जास्त हितकारक ठरते. या देवतेचे त्या देवतेला कळवू नये !!!
दुसरा दिवसला "प्रपोज डे" म्हणतात. म्हणजे काल फुल दिलेल्या वा न देऊ शकलेल्या "कोणाला तरी" प्रपोज करायचे म्हणजे
"मला तू आवडते/आवडतो ". असं सांगायचं . दरवर्षी एकाच कानाला सांगायचे की वेगवेगळ्या कानांना हे तुमच्या "प्रेमळपणावर" अवलंबून आहे. सांगणं महत्त्वाचे ; कोणाला ,किती वेळा या फालतू हिशोबात पडायचे नाही.
तिसरा दिवस असतो चॉकलेट डे. नशिब चांगले की कंपनीने बनविलेले चॉकलेट वर्षभर सारख्याच किमतीत मिळते. तर देवतेच्या किमतीनुसार मग आपली पत पाहून भारी चॉकलेट विकत घ्यावे . देवतेला अर्पण करावे ,तिने तुकडा दिला (चॉकलेटचा) तर अमृतानंदाने स्वीकारावा ,(मेली हावरट ,एकटीने खाल्ले ; असा कुविचार मनातही करू नये .)
चौथा दिवस "टेडीडे" म्हणून साजरा करतात. टेडी नामक एक अस्वलाची प्रजाती बाहुल्याच्या रूपात बाजारात विकत मिळते. या दिवशी आपलं प्रतीक म्हणून देवतेला अर्पण करावे. (आपलं माकड होण्या आधी आस्वल पाठवायचं !!फारच भारी आयडिया ) अन् मनात कल्पना करावी की आपण दिलेले ते (आस्वल नाही म्हणायचं ) टेडी अगदी देवतेने हृदयाजवळ बिलगून ठेवलेय ! नशीबाचे भोग !!!
मग पाचवा दिवस अवतरतो . "प्रॉमीस डे" नावाने.
इथे काय वाटेल ते प्रॉमीस बिंधास्त द्यावे. प्रॉमीस पूर्ण करायला देवता कायम जवळ राहायला हवी ,नाही तर ती पत्नीच्या रुपाने अवतरली तर प्रॉमीसरी नोटवर जरी लिहून दिले तरी अविश्वास कायमच असणार ! त्यामुळे "वचने का दरिद्रता ?" या न्यायाने काहीही प्रॉमीस करा. पूर्ण होणे न होणे त्या दुष्ट नियतीवर अवलंबून आहे. आपण बापडे काय करू शकतो ?
सहावा दिवस "हगडे" !! टिव्हीवर हगीजची अॅड पाहून नाव जरी मराठी कानांना खराब वाटले तरी या दिवशी "प्रथम भेटी आलिंगन " करणे अपेक्षित आहे. तर जसं जमेल तसं गळाभेट घेऊन पहा . नाही तर गळा दाटून येऊनही फारसा फरक पडणार नाही.
सातवा दिवस फार म्हणजे फारच मोठ्ठा ठरू शकतो. तो दिवस आहे "किसडे"! किस झाड की पत्ती किंवा बटाट्याचा ,गाजराचा किस असलं काही यात नाही. अधिकृत नात्यापेक्षा चोरट्या नात्यांत असलं किस पाडणं जास्तच घडतं ! किसी को किसी की खबर न लागू देता हा डे पार पाडणं फारच रोमांचकारी ठरू शकतो. "अधरामृतरसपान" कसा भारदस्त शब्द वाटतो ना किसफिसपेक्षा ? जाऊ दे ,नाव काहीही द्या ,"क्रियावान् स पण्डित: ।" हेच खरे.
आठव्या दिवशी व्रत समाप्तीचा मोठा उत्सवच असतो. तो म्हणजे "व्हॅलेंटाईन डे"! सात दिवस सातत्याने (शक्यतो एकाच ) देवतेचे आराधन
तन-मन-धनाने (शब्दश: बरे) केल्यावर जर देवता प्रसन्न झाली "तर मग काय उणे या लाभा ?!" अशी अवस्था होते. सात दिवसात इतके प्रेमाचे रंग उधळल्यावर जर खिशात अन् "जिगर मा" दम असेल तर उरले-सुरले उधळून मोकळे व्हावे. परिणामाची जाणीव शेजारी ,समाज ,काळ करून देईलच.
एकूणच बाजारीकरणाच्या आजच्या काळात सगळीकडे सवंग उथळपणा वाढला आहे. त्यामुळे "प्रेमदिन" म्हटले की "भीगे होठ तेरे ,प्यासा दिल है मेरा . . . करू प्यार " इतकेच डोक्यात भिनलेले जोडपे "कामातुराणां भयं न लज्जा" वागताना दिसतात. समाजात प्रेमाविषयी अजब धारणा आहे . ती म्हणजे "आपलं ते प्रेम ,दुस-याचं ते लफडं!" पण हे दोन्ही अतिरेक सोडले तर योग्य वयात योग्य व्यक्तीसह समाजमान्य पद्धतीने हे व्रत(?) पाळले तर बिघडलं कुठे ?
अशा प्रकारे सोशलमिडियाने व मार्केटिंगवाल्यांनी नव्या व्रताला येन केन प्रकारेण समाजमान्य करण्याचा घटच घातला जणू . "अग आग म्हशी मला कुठे नेशी" म्हणत अनेक जण हा दिवस ,हा सप्ताह साजरा करू लागले. एकुलत्या एक मुलाने हट्टाने स्वत:च्या मर्जीची मुलगी लग्नाला निवडावी व मुलाला जपण्याच्या नादात नावडती असूनही नांदायला घरात घ्यावी लागल्यावर जी अोढाताण सासु-सुनेची होते तसं काहीसं या व्रताबद्दल विरोधक व समर्थकांचे होत आहे.
व्रताला जर बाजारू मार्केटिंगचा डूब न देता मर्यादा-संयम-जबाबदारी यांची साथ दिली तर हे ही सहिष्णुतेने स्वीकारल्याच जाईल ना ! भारतीय संस्कृती कधीच प्रेमाच्या विरुद्ध नव्हतीच . उलट पुरणकथा ,धार्मिक वाङ्मय ,साहित्यशास्त्र वाचले तर नवरसात स्थान असलेले श्रुंगाररस देवादिकांनाही निषिद्ध नव्हता.
"प्रेमभावना" चूक नाहीच फक्त विवेक व दायित्व भावना अपेक्षित आहे न् ती अपेक्षा सर्व काळात रास्तच आहे.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
No comments:
Post a Comment