#सहजोक्त
१०.५.२०१७
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे "इतिहासाची सहा सोनेरी पाने" लहानपणी वाचली होती. भारताचा महान गौरवशाली इतिहास कायम मान ताठ ठेवायला मदतच करतो.
इस्लामच्या उदयानंतर सारे जग इस्लाममय करण्यासाठी निघालेल्या अनुयायांना युरोप ते मध्यपूर्व आशिया जिंकायला फक्त १०० वर्षे लागलीत तर भारतात प्रवेश करून भारत जिंकायला ७०० वर्ष प्रयत्न करावे लागले तरीही संपूर्ण भारत इस्लाममय झाला नाही. उलट भारतीयांच्या सहिष्णुतेचा परिणामस्वरूप आक्रमक-कट्टर इस्लाम थोडा मवाळ झाला अशी ही भारतभूमी .
(जिज्ञासुंनी नरहर कुरुंदकरांची जागर, आकलन, मनुस्मृती, धार आणि काठ ही पुस्तके वाचावीत. तसेच धर्मपालजींची "अठराव्या शतकातील भारतीय शिक्षण _रमणीय वृक्ष" सुद्धा .)
हे सारं आठवायचे कारण आज वैशाख पोर्णिमा म्हणजे बुद्धपोर्णिमा. जगात अहिंसा-प्रेम-समानता-स्वातंत्र्य यांचे संस्कार करणा-या भगवान् बुध्दाच्या संबोधीचा दिवस.
भारतात जेव्हा सुवर्णकाल होता त्यावेळी अफ़गणीस्थानअहिगण स्थान होते,कंदाहर गंधारदेश होता,कुबला नदी काठी काबुल होते (असे वैदिक उल्लेख आहेत)
स्थैर्य-शांती सर्वत्र नांदत होती. मानवीसंस्कृतीची परमावधी साहित्य-संगीत-कलेतून चराचरात प्रगट होत होती. त्यावेळी गंधारदेशात शिल्पकला चरमोत्कर्षावर होती. अप्रतीम स्थापत्य-शिल्पे आदी जागोजागी होते.
इस्लामिक आक्रमणाच्या काळात गंधारदेशात बुद्धमूर्त्या बाहुल्याने होत्या. आजही अरबी-फारसी भाषेत "बुत" (बुद्ध शब्दाचा अपभ्रंश) शब्द मूर्तीला पर्यायवाची म्हणून योजतात.
तालिबानी माथेफिरूंनी जागतिक वारश्याच्या बुद्धलेण्या बॉम्ब टाकून उध्वस्त केल्या आजही तेथे ध्वस्त खंडहर त्याचे साक्षिदार आहेत.
अफगणीस्थानात मिळालेली सध्या पाकिस्तानी पुराणवस्तुसंग्रहालयात असलेली प्राचीन बुद्धमूर्तीचा फोटो पाहिला. .(मू्र्तिशास्त्राचे अभ्यासक ,माझे मित्र श्री प्रवीण योगी यांनी फोटो पाठवलाय)
. पुन्हा सा-या जगात मानवी सुसंस्कृतता चरमोत्कर्षाला येईल असा अढळ विश्वास बाळगत ,
बुध्दपोर्णिमेच्या दिवशी, बुद्धाने प्रत्येक व्यक्तीला जे "अत्त दीपो भव" सांगितले; त्याचे निरालस अाचरण करून अभिवादन करू या.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे
नागपुर.
१०.५.२०१७
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे "इतिहासाची सहा सोनेरी पाने" लहानपणी वाचली होती. भारताचा महान गौरवशाली इतिहास कायम मान ताठ ठेवायला मदतच करतो.
इस्लामच्या उदयानंतर सारे जग इस्लाममय करण्यासाठी निघालेल्या अनुयायांना युरोप ते मध्यपूर्व आशिया जिंकायला फक्त १०० वर्षे लागलीत तर भारतात प्रवेश करून भारत जिंकायला ७०० वर्ष प्रयत्न करावे लागले तरीही संपूर्ण भारत इस्लाममय झाला नाही. उलट भारतीयांच्या सहिष्णुतेचा परिणामस्वरूप आक्रमक-कट्टर इस्लाम थोडा मवाळ झाला अशी ही भारतभूमी .
(जिज्ञासुंनी नरहर कुरुंदकरांची जागर, आकलन, मनुस्मृती, धार आणि काठ ही पुस्तके वाचावीत. तसेच धर्मपालजींची "अठराव्या शतकातील भारतीय शिक्षण _रमणीय वृक्ष" सुद्धा .)
हे सारं आठवायचे कारण आज वैशाख पोर्णिमा म्हणजे बुद्धपोर्णिमा. जगात अहिंसा-प्रेम-समानता-स्वातंत्र्य यांचे संस्कार करणा-या भगवान् बुध्दाच्या संबोधीचा दिवस.
भारतात जेव्हा सुवर्णकाल होता त्यावेळी अफ़गणीस्थानअहिगण स्थान होते,कंदाहर गंधारदेश होता,कुबला नदी काठी काबुल होते (असे वैदिक उल्लेख आहेत)
स्थैर्य-शांती सर्वत्र नांदत होती. मानवीसंस्कृतीची परमावधी साहित्य-संगीत-कलेतून चराचरात प्रगट होत होती. त्यावेळी गंधारदेशात शिल्पकला चरमोत्कर्षावर होती. अप्रतीम स्थापत्य-शिल्पे आदी जागोजागी होते.
इस्लामिक आक्रमणाच्या काळात गंधारदेशात बुद्धमूर्त्या बाहुल्याने होत्या. आजही अरबी-फारसी भाषेत "बुत" (बुद्ध शब्दाचा अपभ्रंश) शब्द मूर्तीला पर्यायवाची म्हणून योजतात.
तालिबानी माथेफिरूंनी जागतिक वारश्याच्या बुद्धलेण्या बॉम्ब टाकून उध्वस्त केल्या आजही तेथे ध्वस्त खंडहर त्याचे साक्षिदार आहेत.
अफगणीस्थानात मिळालेली सध्या पाकिस्तानी पुराणवस्तुसंग्रहालयात असलेली प्राचीन बुद्धमूर्तीचा फोटो पाहिला. .(मू्र्तिशास्त्राचे अभ्यासक ,माझे मित्र श्री प्रवीण योगी यांनी फोटो पाठवलाय)
. पुन्हा सा-या जगात मानवी सुसंस्कृतता चरमोत्कर्षाला येईल असा अढळ विश्वास बाळगत ,
बुध्दपोर्णिमेच्या दिवशी, बुद्धाने प्रत्येक व्यक्तीला जे "अत्त दीपो भव" सांगितले; त्याचे निरालस अाचरण करून अभिवादन करू या.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे
नागपुर.
सहजोक्त हे शीर्षक खूपच आवडले त्याप्रमाणे आपले लेखन सहज सुंदर माहितीपूर्ण .
ReplyDeleteधन्यवाद
ReplyDeleteछान
ReplyDelete