रे रे रासभ, वस्रभारवहनात् कुग्रासमश्नासि किम् ?
राजाश्वावसथं प्रयाहि चणकाभ्यूषान् सुखं भक्षय ।
सर्वान् पुच्छवतो हया:इति वदन्त्यत्राधिकारे स्थिता:
राजा तेरुपदिष्टमेव मनुते सत्यं,तटस्था: परे ॥
दोनतीन दिवसांपासून हा श्लोक डोक्यात घोळतो आहे. अर्थ असा की," हे धोब्याच्या गाढवा ,कपड्यांचे अोझे वाहून (देखील) वाईट अन्न कां बरे खातोस ? राजाच्या अश्वशाळेत जा आणि तेथे भाजलेले हरभरे खुशाल खा. ह्या ठिकाणी असलेले अधिकारी ,शेपटीधरी प्राण्यांना घोडा समजतात नि राजाही त्यांच्यावर विश्वास ठेवतो, इतर लोक तटस्थ असतात."
अन्योक्ती प्रकारातील अतिशय मार्मिक असा हा श्लोक. आजही सार्थ आहे. संस्कृतातील सुभाषिते आजही समर्थ कां ? कारण आजही त्यांची उपयुक्तता ताजी आहे.
तत्कालिन परिस्थितीवर भाष्य करणारा हा श्लोक आजही यथार्थ नव्हे कां?
क्षेत्र कोणतेही घ्या ,काळ कोणताही असू द्या परिस्थिती बदललेली नाही. हेच खरे.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
छान लेख।
ReplyDelete🙏
Delete