Monday, January 1, 2018

#सहजोक्त


 रे रे रासभ, वस्रभारवहनात् कुग्रासमश्नासि किम् ?
 ‎राजाश्वावसथं प्रयाहि चणकाभ्यूषान् सुखं भक्षय ।
 ‎सर्वान् पुच्छवतो हया:इति वदन्त्यत्राधिकारे स्थिता:
 ‎राजा तेरुपदिष्टमेव मनुते सत्यं,तटस्था: परे ॥
 ‎ दोनतीन दिवसांपासून हा श्लोक डोक्यात घोळतो आहे. अर्थ असा की," हे धोब्याच्या गाढवा ,कपड्यांचे अोझे वाहून (देखील) वाईट अन्न कां बरे खातोस ? राजाच्या अश्वशाळेत जा आणि तेथे भाजलेले हरभरे खुशाल खा. ह्या ठिकाणी असलेले अधिकारी ,शेपटीधरी प्राण्यांना घोडा समजतात नि राजाही त्यांच्यावर विश्वास ठेवतो, इतर लोक तटस्थ असतात."
 ‎अन्योक्ती प्रकारातील अतिशय मार्मिक असा हा श्लोक. आजही सार्थ आहे. संस्कृतातील सुभाषिते आजही समर्थ कां ? कारण आजही त्यांची उपयुक्तता ताजी आहे.
 ‎तत्कालिन परिस्थितीवर भाष्य करणारा हा श्लोक आजही यथार्थ नव्हे कां?
 ‎क्षेत्र कोणतेही घ्या ,काळ कोणताही असू द्या परिस्थिती बदललेली नाही. हेच खरे.
 ©डॉ. प्रज्ञा  देशपांडे.
 ‎

2 comments: