#सहजोक्त
"कोई जब तुम्हारा हृदय तोड दे
तडपता हुआ जब कोई छोड दे
तब तुम मेरे पास आना प्रिये
मेरा घर खुला है खुलाही रहेगा तुम्हारे लिये "......
मुकेशचे निराश मनाचे गाणे कानावर पडले.
विचार आला की या गाण्यातून पुरुषी अहंकार सहज दिसतोय.
"मी तुझ्यावर निस्सीम प्रेम करतो , पण तुझी पहिली पसंती मी नाही ही बाब मला खटकते शिवाय मी तुझ्या प्राधान्यक्रमातही नाही हे पण असहनीय आहे. या उपर तू दुस-यात गुंतली आहे हे तर मला पार हताश निराश करणारे दुश्चिन्ह आहे. त्यावर मी काहीही इलाज करू शकत नाही ही माझी अगतिकता. शेवटी सदिच्छा देण्याच्या निमित्ताने मनातले विचार वर व्यक्त झाले. तू माझ्याशिवाय कायम सुखी असूच शकणार नाही अशी ठाम भावना तो व्यक्त करतोय. म्हणजे तिला जे प्रेम
दुस-यापासून मिळतय ,ती खुलतेय ,ती बहरतेय हे त्याला झेपत नाहीय. "
असूया आहेच. असूया हा काही स्त्रीचा कॉपीराईट नाही. अनेक पुरूष संशय-असूया-द्वेषाने दिवसरात्र जळत असतात.
निस्सीम प्रेम असलेला हा तिची अनंतकाळ वाट पाहायला तयार आहे. कोणत्याही परिस्थितीत तो तिला स्वीकारणार आहे.
म्हणूनच विचार येतो की 'इतका महान आहेस तर तिला ज्यात सुख वाटेल त्यास तुझा मनापासून पाठिंबा सदिच्छा कां नाहीत ?
माझ्याशिवाय ती इतरत्र सुखी राहूच शकणार नाही असा अहंभाव की सुप्त आसुरी इच्छा ??
वस्तुंसारखीच व्यक्तींवरही मालकी असावी कां??
आवडणे >प्रेम>ममत्व>स्वामित्व> हे स्वकेंद्रित मनोवृत्तीचे परिमाण असतात कां?
मला नेहमी प्रश्न पडतो .नातं कोणतंही असो, जर आपण मनापासून त्यावर प्रेम करत असू तर त्याला परिपूर्ण मोकळिक दिलीच पाहिजे. सहज-स्वाभाविक-स्वातंत्र्य जिथे जपल्या जाते तेच खरे नाते. बाकी सारे सोयीचे-गैरसोयीचे लादणे-सहणेच असते.
हेच जास्त दिसल्यामुळे कवी म्हणतो.
"सुख पाहता जवापाडे
दु:ख पर्वया एवढे "...
©डॉ. प्रज्ञा देशपांडे
नागपूर
७.५.२०१७
"कोई जब तुम्हारा हृदय तोड दे
तडपता हुआ जब कोई छोड दे
तब तुम मेरे पास आना प्रिये
मेरा घर खुला है खुलाही रहेगा तुम्हारे लिये "......
मुकेशचे निराश मनाचे गाणे कानावर पडले.
विचार आला की या गाण्यातून पुरुषी अहंकार सहज दिसतोय.
"मी तुझ्यावर निस्सीम प्रेम करतो , पण तुझी पहिली पसंती मी नाही ही बाब मला खटकते शिवाय मी तुझ्या प्राधान्यक्रमातही नाही हे पण असहनीय आहे. या उपर तू दुस-यात गुंतली आहे हे तर मला पार हताश निराश करणारे दुश्चिन्ह आहे. त्यावर मी काहीही इलाज करू शकत नाही ही माझी अगतिकता. शेवटी सदिच्छा देण्याच्या निमित्ताने मनातले विचार वर व्यक्त झाले. तू माझ्याशिवाय कायम सुखी असूच शकणार नाही अशी ठाम भावना तो व्यक्त करतोय. म्हणजे तिला जे प्रेम
दुस-यापासून मिळतय ,ती खुलतेय ,ती बहरतेय हे त्याला झेपत नाहीय. "
असूया आहेच. असूया हा काही स्त्रीचा कॉपीराईट नाही. अनेक पुरूष संशय-असूया-द्वेषाने दिवसरात्र जळत असतात.
निस्सीम प्रेम असलेला हा तिची अनंतकाळ वाट पाहायला तयार आहे. कोणत्याही परिस्थितीत तो तिला स्वीकारणार आहे.
म्हणूनच विचार येतो की 'इतका महान आहेस तर तिला ज्यात सुख वाटेल त्यास तुझा मनापासून पाठिंबा सदिच्छा कां नाहीत ?
माझ्याशिवाय ती इतरत्र सुखी राहूच शकणार नाही असा अहंभाव की सुप्त आसुरी इच्छा ??
वस्तुंसारखीच व्यक्तींवरही मालकी असावी कां??
आवडणे >प्रेम>ममत्व>स्वामित्व> हे स्वकेंद्रित मनोवृत्तीचे परिमाण असतात कां?
मला नेहमी प्रश्न पडतो .नातं कोणतंही असो, जर आपण मनापासून त्यावर प्रेम करत असू तर त्याला परिपूर्ण मोकळिक दिलीच पाहिजे. सहज-स्वाभाविक-स्वातंत्र्य जिथे जपल्या जाते तेच खरे नाते. बाकी सारे सोयीचे-गैरसोयीचे लादणे-सहणेच असते.
हेच जास्त दिसल्यामुळे कवी म्हणतो.
"सुख पाहता जवापाडे
दु:ख पर्वया एवढे "...
©डॉ. प्रज्ञा देशपांडे
नागपूर
७.५.२०१७
अतिशय मार्मिक व सुन्दर विवेचन मैडम ।
ReplyDeleteधन्यवाद
ReplyDelete