#चित्रकविता.
जेव्हा कधी कानी अंतरीची साद येते
हृदयातील शब्दसुम अोठातून उमलते ॥
रचणे नसते केवळ, ते तर स्फुरणे असते
हळूवारपणे चिरंतनाक्षरातून उरणे असते ॥
निमित्त टिकावू नसेल तर शब्दांना सूज येते
अद्वैतचिंतनाने मात्र शब्दमधुर बाळसे धरते ॥
काव्य-साहित्य सारं काही त्याचेच रूप असते
स्वतःहून स्वतः गवसल्याची ती खूण असते ॥
खुशाल म्हणोत बापडे कोणी साहित्यरचना त्याला
पण तो असतो प्रतिसाद दिलेला सादेला आतल्या ॥
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
जेव्हा कधी कानी अंतरीची साद येते
हृदयातील शब्दसुम अोठातून उमलते ॥
रचणे नसते केवळ, ते तर स्फुरणे असते
हळूवारपणे चिरंतनाक्षरातून उरणे असते ॥
निमित्त टिकावू नसेल तर शब्दांना सूज येते
अद्वैतचिंतनाने मात्र शब्दमधुर बाळसे धरते ॥
काव्य-साहित्य सारं काही त्याचेच रूप असते
स्वतःहून स्वतः गवसल्याची ती खूण असते ॥
खुशाल म्हणोत बापडे कोणी साहित्यरचना त्याला
पण तो असतो प्रतिसाद दिलेला सादेला आतल्या ॥
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
No comments:
Post a Comment