#अक्षय-तृतीया
आज अनेक महिन्यांनी नव्हे वर्षांनी माझा हात बागकामाला लागला.
बागेचं काम शरद करतात . तर मी फुलं तोडणे न् फोटो काढणे , इतकंच काम करते.
काही महिन्यांपूर्वी कुठेतरी मिळालेलं , गुलाबाचं रोपटं बगिच्याच्या कॅरीत त्याच्या प्लास्टिकबॅग सह ठेवलं होतं . ते रोपटं वाढत होतं , त्याला फुलं येत होती . पण ते जमिनीत रुजवायचं मुहूर्तच मिळत नव्हतं. रविवारी हे काम करायचेच असं ठरवलं होतं. न् त्यानुसार मी कॅरीत जरा मोकळ्या जागेत बरासा खड्डा खणला. गुलाबाच्या रोपाचा पुडका फाडला . ते रोप उचलायला गेली तर लक्षात आलं की त्याचं एक मूळ बरेच खोलवर रुजलंय. ते रोप हालवणं अवघड आहे. मग शेवटी त्याच जागी जरासं खणलं न् उथळ खड्ड्यात ते झाड स्थापलं .
आजकाल वादळवा-यात उभीच्या उभी झाडं धडालं कोसळतात . कारण वृक्षारोपण करताना ३*३ चा खड्डा , पुरेसे खत ,पाणी , भरपूर निगा राखल्यामुळे ही झाडं डेरेदार वाढतात . यांच्या मुळांना खोल खोल जमिनीत रुजायची गरजच उरत नाही . जे खाद्य हवं ते सहज तीनचार फुटात उपलब्ध असते. यामुळे ते झाड वरून खूपच सुदृढ दिसतं. झाडांच्या मुळांचे मुख्य काम जमिनीत कष्टपूर्वक खोल रूजून झाडाला हवे असलेले पाणी , पोषणद्रव्य मिळवणे तसेच भक्कम आधार देणे हे आहे. आयत्या मिळणा-या पोषणामुळे सखोल रुजून घट्ट आधार देणं नेमकं विसरली ही झाडं आजकाल ! मानवांच्या संगतीत त्यालाही वाण नाही पण ऐदीपणाचा गुण लागला. मूळांना खोलवर न रुजवता झाडंही वरवर तगायला न जगायला लागली !!
नेमकं माझ्या बागेतलं रोप या सगळ्यात वेगळं वाटलं . त्याने नुसतं स्वतःला रुजवलं ; इतकंच नाही तर "जगा न् जगवा " ह्याचे मूर्तिमंत उदाहण सादर केले . त्याच्याच प्लास्टीक-पिशवीत आपोआप उगवलेलं कर्दळीचं टुमदार रोप छान बाळसं धरत होतं.
असं हे गुलाबाचं झाड , *कोणत्याही परिस्थितीत अक्षय-जगण्याचा मंत्र* अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर देऊन गेलं.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
आज अनेक महिन्यांनी नव्हे वर्षांनी माझा हात बागकामाला लागला.
बागेचं काम शरद करतात . तर मी फुलं तोडणे न् फोटो काढणे , इतकंच काम करते.
काही महिन्यांपूर्वी कुठेतरी मिळालेलं , गुलाबाचं रोपटं बगिच्याच्या कॅरीत त्याच्या प्लास्टिकबॅग सह ठेवलं होतं . ते रोपटं वाढत होतं , त्याला फुलं येत होती . पण ते जमिनीत रुजवायचं मुहूर्तच मिळत नव्हतं. रविवारी हे काम करायचेच असं ठरवलं होतं. न् त्यानुसार मी कॅरीत जरा मोकळ्या जागेत बरासा खड्डा खणला. गुलाबाच्या रोपाचा पुडका फाडला . ते रोप उचलायला गेली तर लक्षात आलं की त्याचं एक मूळ बरेच खोलवर रुजलंय. ते रोप हालवणं अवघड आहे. मग शेवटी त्याच जागी जरासं खणलं न् उथळ खड्ड्यात ते झाड स्थापलं .
आजकाल वादळवा-यात उभीच्या उभी झाडं धडालं कोसळतात . कारण वृक्षारोपण करताना ३*३ चा खड्डा , पुरेसे खत ,पाणी , भरपूर निगा राखल्यामुळे ही झाडं डेरेदार वाढतात . यांच्या मुळांना खोल खोल जमिनीत रुजायची गरजच उरत नाही . जे खाद्य हवं ते सहज तीनचार फुटात उपलब्ध असते. यामुळे ते झाड वरून खूपच सुदृढ दिसतं. झाडांच्या मुळांचे मुख्य काम जमिनीत कष्टपूर्वक खोल रूजून झाडाला हवे असलेले पाणी , पोषणद्रव्य मिळवणे तसेच भक्कम आधार देणे हे आहे. आयत्या मिळणा-या पोषणामुळे सखोल रुजून घट्ट आधार देणं नेमकं विसरली ही झाडं आजकाल ! मानवांच्या संगतीत त्यालाही वाण नाही पण ऐदीपणाचा गुण लागला. मूळांना खोलवर न रुजवता झाडंही वरवर तगायला न जगायला लागली !!
नेमकं माझ्या बागेतलं रोप या सगळ्यात वेगळं वाटलं . त्याने नुसतं स्वतःला रुजवलं ; इतकंच नाही तर "जगा न् जगवा " ह्याचे मूर्तिमंत उदाहण सादर केले . त्याच्याच प्लास्टीक-पिशवीत आपोआप उगवलेलं कर्दळीचं टुमदार रोप छान बाळसं धरत होतं.
असं हे गुलाबाचं झाड , *कोणत्याही परिस्थितीत अक्षय-जगण्याचा मंत्र* अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर देऊन गेलं.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
No comments:
Post a Comment