माझ्या मना ,
मुळात चैतन्याचा आनंदमय कोष असलेल्या माझ्या मना, कां रे सतावतोस ?
कधी अवचित मी तुझ्या आनंदचैतन्यात समरसून मग्न होणारच तितक्यात एकदम आऊटअॉफरेंज कां रे होतोस??
जीवशास्त्र- अध्यात्म- मानसशास्त्र काहीही म्हणोत बापडे ! तू मात्र माझा असून नेहमीच मला अगम्य-अनाकलनीय-अज्ञातच राहतो, कितीही जाणून घेतले तरी.
व्याकरणाच्या भाषेत तू नपुसकलिंगी आहेस. मग इतकं रसिकत्व कोणी भरलं रे तुझ्यात?
सर्वव्यापी- सर्वग्राही- सर्वगामी-मना किती थकवतोस , फ़रफटवून गुंतवतोस , अडकवतोस ज्यात त्यात मला!! मुळातल्या आनंदावर कशाला असली आवरणं लादतोस ??
तू- मी- चैतन्यमय आत्मा खरेखुरे जिगरीजान दोस्त ना रे? एकमेकांशिवाय आपले अस्तित्वच अधुरे !अधुरे कशाचे ? अस्तित्वहीनच रे पार.
इतके एकजीव, गुरफ़टलोय एकमेकात. शरीर-आत्मा-मन म्हणजे "मी"! मी म्हणजे माझं मन. माझं मन म्हणजेच माझा आत्मा.कुठेय कोणाचे स्वतंत्र अस्तित्व ?? सांग ना? कोणाची सीमा कुठे संपते न् कोणाची सत्ता कुठे सुरु होते : हे कसं समजावं एखाद्याला? त्रिकुट तरी कसं म्हणू ? एकच ना रे आपण !
हॅंडसेट-सिमकार्ड-मेमरीकार्ड यांचा मिळून मोबाईल म्हणतात ना तसं बघ. सिमकार्ड म्हणजे आत्मा , हॅंडसेट म्हणजे शरीर व मेमरीकार्ड म्हणजे मन.हे सगळं मिळून "मी" झालोय ना!
मना
नको ना जुना बोर-रटाळ-चोथा झालेला नकोसा डाटा पुन्हा पुन्हा सावडून आणू. कर ना फॉर्मेट स्वत:ला. तुझ्या या संग्रहीवृत्तीमुळे मला कशाला उगाच नकारात्मक-निराशाजनक चिंतनात गुंगवतोस??राहूदे ना अविचल आनंदमग्न . माझ्यासाठी वेळ दे ना राजा !
बघ ना :किती सुंदर-दिव्य-अलौकिक आहे ना ही सृष्टी? त्यातलं आपलं अस्तित्व किती सहज-सुरेख-सुरेल ! आपल्या प्रत्येक श्वासात, गतीत , हालचालीत लय आहे ,ताल आहे,सूर आहे,संगीत आहे मुख्य म्हणजे समन्वय आहे ;सह-अनुभूती आहे.
या शरीरभर पसरलेल्या रक्तवाहिन्या लयीत असतात बघ. ह्रदय अखंड ताल धरतं बघ. श्वासात सूर आहे ना .अंगप्रत्यंगात व्यक्ताव्यक्त संगीत अविश्रांत सुरुच असते ना.
मना
थोडं दमाने घे. एकेक कणस्वरही अनुभवू दे मला.नादमय होऊ दे मला. रमू दे .समाधी समाधी काय ती अनुभवू दे .सारं सारं विसरू दे. अंतर्नादात अहोरात्र देहभान हरपू दे .
निराशेची बेसूर तान नको छेडू. बेचैनीचा बेताल नको वाजवू. बेसूर वाईट अनुभवाची उजळणी नको ना करू.
मना
तू अखंड -अभंग आनंद आहेस. स्थिर हो. शांत हो. नित्य हो.
निरंतर-निखळ-निरागस सुख-समाधानात न्हााऊन निघ कायमच. अवती-भवती हेच आनंदतुषार फ़ैलू दे.जेथ ेजाशील तेथे आनंदाचे वाण वाट .
मना रे ,
आनंदकंदा-आनंदघना-आनंदसारा असाच आहेस ना? असाच रहा !!!
डॉ. प्रज्ञा देशपांडे.
नागपूर
मुळात चैतन्याचा आनंदमय कोष असलेल्या माझ्या मना, कां रे सतावतोस ?
कधी अवचित मी तुझ्या आनंदचैतन्यात समरसून मग्न होणारच तितक्यात एकदम आऊटअॉफरेंज कां रे होतोस??
जीवशास्त्र- अध्यात्म- मानसशास्त्र काहीही म्हणोत बापडे ! तू मात्र माझा असून नेहमीच मला अगम्य-अनाकलनीय-अज्ञातच राहतो, कितीही जाणून घेतले तरी.
व्याकरणाच्या भाषेत तू नपुसकलिंगी आहेस. मग इतकं रसिकत्व कोणी भरलं रे तुझ्यात?
सर्वव्यापी- सर्वग्राही- सर्वगामी-मना किती थकवतोस , फ़रफटवून गुंतवतोस , अडकवतोस ज्यात त्यात मला!! मुळातल्या आनंदावर कशाला असली आवरणं लादतोस ??
तू- मी- चैतन्यमय आत्मा खरेखुरे जिगरीजान दोस्त ना रे? एकमेकांशिवाय आपले अस्तित्वच अधुरे !अधुरे कशाचे ? अस्तित्वहीनच रे पार.
इतके एकजीव, गुरफ़टलोय एकमेकात. शरीर-आत्मा-मन म्हणजे "मी"! मी म्हणजे माझं मन. माझं मन म्हणजेच माझा आत्मा.कुठेय कोणाचे स्वतंत्र अस्तित्व ?? सांग ना? कोणाची सीमा कुठे संपते न् कोणाची सत्ता कुठे सुरु होते : हे कसं समजावं एखाद्याला? त्रिकुट तरी कसं म्हणू ? एकच ना रे आपण !
हॅंडसेट-सिमकार्ड-मेमरीकार्ड यांचा मिळून मोबाईल म्हणतात ना तसं बघ. सिमकार्ड म्हणजे आत्मा , हॅंडसेट म्हणजे शरीर व मेमरीकार्ड म्हणजे मन.हे सगळं मिळून "मी" झालोय ना!
मना
नको ना जुना बोर-रटाळ-चोथा झालेला नकोसा डाटा पुन्हा पुन्हा सावडून आणू. कर ना फॉर्मेट स्वत:ला. तुझ्या या संग्रहीवृत्तीमुळे मला कशाला उगाच नकारात्मक-निराशाजनक चिंतनात गुंगवतोस??राहूदे ना अविचल आनंदमग्न . माझ्यासाठी वेळ दे ना राजा !
बघ ना :किती सुंदर-दिव्य-अलौकिक आहे ना ही सृष्टी? त्यातलं आपलं अस्तित्व किती सहज-सुरेख-सुरेल ! आपल्या प्रत्येक श्वासात, गतीत , हालचालीत लय आहे ,ताल आहे,सूर आहे,संगीत आहे मुख्य म्हणजे समन्वय आहे ;सह-अनुभूती आहे.
या शरीरभर पसरलेल्या रक्तवाहिन्या लयीत असतात बघ. ह्रदय अखंड ताल धरतं बघ. श्वासात सूर आहे ना .अंगप्रत्यंगात व्यक्ताव्यक्त संगीत अविश्रांत सुरुच असते ना.
मना
थोडं दमाने घे. एकेक कणस्वरही अनुभवू दे मला.नादमय होऊ दे मला. रमू दे .समाधी समाधी काय ती अनुभवू दे .सारं सारं विसरू दे. अंतर्नादात अहोरात्र देहभान हरपू दे .
निराशेची बेसूर तान नको छेडू. बेचैनीचा बेताल नको वाजवू. बेसूर वाईट अनुभवाची उजळणी नको ना करू.
मना
तू अखंड -अभंग आनंद आहेस. स्थिर हो. शांत हो. नित्य हो.
निरंतर-निखळ-निरागस सुख-समाधानात न्हााऊन निघ कायमच. अवती-भवती हेच आनंदतुषार फ़ैलू दे.जेथ ेजाशील तेथे आनंदाचे वाण वाट .
मना रे ,
आनंदकंदा-आनंदघना-आनंदसारा असाच आहेस ना? असाच रहा !!!
डॉ. प्रज्ञा देशपांडे.
नागपूर
खुप सुंदर आणी अप्रतिम लेखन. मनाला भारवून टाकनारे
ReplyDelete