१५.०३.२०१७
#स्तोत्रचिंतन-३
न पुण्यं न पापं न सौख्यं न दु:खम्
न मन्त्रो न तीर्थं न वेदा न यज्ञा:
अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता
चिदानंदरूप: शिवोSहं शिवोSहं ॥૪॥
न मृत्युर्न शङ्का न मे जातिभेद:
पिता नैव मे नैव माता न जन्म:
न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्यं
चिदानंदरूप: शिवोSहं शिवोSहं॥५॥
या दोन श्लोकांचा अर्थ पाहू.
पाप-पुण्य ,सुख-दु:ख
ही द्वंद्वे नेहमीच असतात.
व्यासांनी म्हटलेच आहे ,"परोपकाराय पुण्याय ,पापाय परपीडनम्" परोपकाराने पुण्य तर परपीडनाने पाप होते.
व्याधी म्हणजे दु:ख असे आयुर्वेद म्हणतो.
श्रीमत् शंकराचार्यांच्या मते "मी" या सा-या द्वंद्वाच्या पलीकडे आहे.
पाप-पुण्य,सुख-दु:ख यांचा हिशेब आला की त्याचे फळ म्हणजे स्वर्ग-नर्क आलेच.
ज्ञानेश्वर माऊली म्हणतात ,"हरि मुखे म्हणा ,हरि मुखे म्हणा; पुण्याची गणना कोण करी?"
मंत्र (मनन करण्याचे साधन) ,तीर्थ(पवित्र स्थान),वेद (सनातन ज्ञान),यज्ञ (ऐहिक-पारलौकिकाच्या प्राप्तीचे साधन) या सगळ्यांच्या पलीकडे "मी" आहे.
भोजन (खाण्याची प्रक्रिया) ,भोज्य (खाण्यास/उपभोगण्यास योग्य),भोक्ता (खाणारा/उपभोगणारा) हे तीनही अन्योन्यसंबंधित शब्द आहे.
[ज्ञान-ज्ञेय-ज्ञाता ,प्रमाण-प्रमेय-प्रमाता ,दान-देय-दाता, त्यजन-त्याज्य-त्यक्ता इ . इ. प्रमाणे. ]
"जीव: जीवस्य जीवनम्"। या न्यायाने सृष्टीमध्ये प्रत्येक जीव दुस-याचे जीवन-साधन असतो. पण आदि शंकराचार्यांच्या अनुभूतीनुसार "मी"या सगळ्यांच्या पार गेलोय.
सृष्टिनियमानुसार "जातस्य हि धृवो मृत्युः " हे चिरंतन सत्य आहे.
शंकराचार्य म्हणतात ,"पुनरपि जननं पुनरपि मरणं ;पुनरपि जननीजठरे शयनम्"।......
पण एकदा कां ,"मी शिवतत्त्व आहे" ही अनुभूती आली की , जन्म-मृत्यु-जाति(८૪लक्ष योनि) तसेच माता-पिता (जन्म देण्याचे निमित्त कारण) गुरु-शिष्य (विद्या देणे -घेणे करणारे) ,हे सगळे बंध मला गैरलागु ठरतात.
पुढील भागात शेवटचा श्लोक घेऊन लेखमाला समाप्त होईल.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
#स्तोत्रचिंतन-३
न पुण्यं न पापं न सौख्यं न दु:खम्
न मन्त्रो न तीर्थं न वेदा न यज्ञा:
अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता
चिदानंदरूप: शिवोSहं शिवोSहं ॥૪॥
न मृत्युर्न शङ्का न मे जातिभेद:
पिता नैव मे नैव माता न जन्म:
न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्यं
चिदानंदरूप: शिवोSहं शिवोSहं॥५॥
या दोन श्लोकांचा अर्थ पाहू.
पाप-पुण्य ,सुख-दु:ख
ही द्वंद्वे नेहमीच असतात.
व्यासांनी म्हटलेच आहे ,"परोपकाराय पुण्याय ,पापाय परपीडनम्" परोपकाराने पुण्य तर परपीडनाने पाप होते.
व्याधी म्हणजे दु:ख असे आयुर्वेद म्हणतो.
श्रीमत् शंकराचार्यांच्या मते "मी" या सा-या द्वंद्वाच्या पलीकडे आहे.
पाप-पुण्य,सुख-दु:ख यांचा हिशेब आला की त्याचे फळ म्हणजे स्वर्ग-नर्क आलेच.
ज्ञानेश्वर माऊली म्हणतात ,"हरि मुखे म्हणा ,हरि मुखे म्हणा; पुण्याची गणना कोण करी?"
मंत्र (मनन करण्याचे साधन) ,तीर्थ(पवित्र स्थान),वेद (सनातन ज्ञान),यज्ञ (ऐहिक-पारलौकिकाच्या प्राप्तीचे साधन) या सगळ्यांच्या पलीकडे "मी" आहे.
भोजन (खाण्याची प्रक्रिया) ,भोज्य (खाण्यास/उपभोगण्यास योग्य),भोक्ता (खाणारा/उपभोगणारा) हे तीनही अन्योन्यसंबंधित शब्द आहे.
[ज्ञान-ज्ञेय-ज्ञाता ,प्रमाण-प्रमेय-प्रमाता ,दान-देय-दाता, त्यजन-त्याज्य-त्यक्ता इ . इ. प्रमाणे. ]
"जीव: जीवस्य जीवनम्"। या न्यायाने सृष्टीमध्ये प्रत्येक जीव दुस-याचे जीवन-साधन असतो. पण आदि शंकराचार्यांच्या अनुभूतीनुसार "मी"या सगळ्यांच्या पार गेलोय.
सृष्टिनियमानुसार "जातस्य हि धृवो मृत्युः " हे चिरंतन सत्य आहे.
शंकराचार्य म्हणतात ,"पुनरपि जननं पुनरपि मरणं ;पुनरपि जननीजठरे शयनम्"।......
पण एकदा कां ,"मी शिवतत्त्व आहे" ही अनुभूती आली की , जन्म-मृत्यु-जाति(८૪लक्ष योनि) तसेच माता-पिता (जन्म देण्याचे निमित्त कारण) गुरु-शिष्य (विद्या देणे -घेणे करणारे) ,हे सगळे बंध मला गैरलागु ठरतात.
पुढील भागात शेवटचा श्लोक घेऊन लेखमाला समाप्त होईल.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
No comments:
Post a Comment