९.३.२०७
#स्तोत्र-चिंतन :भाग-१
आदि शंकराचार्यांनी अनेक स्तोत्र लिहिली आहेत. स्तोत्र शब्द स्तु (स्तव्)= स्तुती करणे या मूळ धातू पासून तयार झालाय. स्तोत्र म्हणजे स्तुती करण्याचे साधन.
स्तोत्र ,नेत्र ,गात्र,वक्त्र,जनित्र,यंत्र,मंत्र हे शब्द एका प्रक्रियेने तयार झालेय.यावर मी आधी शब्दचिंतन लिहिलेय. असो.
मला काही स्तोत्र ,अभंग ,कविता आतून प्रेरणा देतात ,निराशेतून बाहेर काढतात ,किंवा अत्यानंदात सावरतात ,माझ्यातल्या मला चिदानंदित करतात. त्यापैकी आदिशंकराचार्यांचे "निर्वाणषटकम् किंवा आत्मषटकम् " हे एक आहे.
श्री श्री रविशंकरांच्या उपासनापरंपरेत अतिशय आर्त नि हार्द गायलेय हे स्तोत्र.
त्यातील एकेका शब्दात इतका खोल अर्थ आहे किंवा सखोल समजून घेऊन ते स्तोत्र ऐकले तर खरोखर 'ब्रह्मानंदी टाळी' हमखास लागते.
मी जेव्हाही काही लिहिते ते माझ्या आनंदानुभूतीतूनच ."सद्यपरनिवृत्तिये" हाच एकमेव हेतू लेखनाचा. त्यातून इतरांना फायदा झाला तर सोन्याहून पिवळे. बाकी आनंदच आनंद.
या लेखमालेत "आत्मषटकम्" मला जसे समजले ,उमजले ,माझ्यात रुजले ते मांडणार आहे.
श्लोक (१)
मनो बुद्ध्यहंकार चित्तानि नाहं
न च श्रोत्रजिव्हे न च घ्राण नेत्रे
न व्योमन् न भूमिर्न तेजो न वायु:
चिदानंद रूप: शिवोsहं शिवोsहं ॥१॥
अर्थ =चार आन्तश्चतुष्टय म्हणजे मन ,बुद्धी, अहंकार, चित्त . हे चार इंद्रिय म्हणजे 'मी' नाही.
कान ,जीभ ,नाक, डोळे हे ज्ञानेंद्रिय म्हणजे 'मी' नाही. आकाश -पृथ्वी-तेज-वायु ही महाभूते म्हणजे 'मी 'नाही . तर 'मी' चित् आनंद रूप शिव आहे. मी शिव आहे.
स्पष्टीकरण..
आध्यात्मिक-आधिभौतिक व ज्ञानेंद्रिय म्हणजे मी नाही . मी तर एक वैश्विक-चिरंतर-चिन्मय परमात्मा आहे. मी परमतत्त्व शिव आहे.
बस ,या एका अोळीने आपल्यातल्या एकटेपणाची -असहायतेची-मरगळलेपणाची-अगतिकतेची भावना पूर्ण नष्ट होते.त्या वैश्विक शक्तीशी सरळ जोडले जातो. त्याच वेळी वरच्या पंक्तीतींचे मनन केले की उगाचचा वाढलेला अहं नष्ट होतो. "मी" करतो ,माझ्यामुळे हे झालं ,माझ्याशिवाय पान हलत नाही वगैरे वगैरेतील फोलपणा सहज लक्षात येतो. अकारण कर्तृत्वभाव सरतो.तटस्थभाव-साक्षीभाव वाढतो.
पुढचे श्लोक पुढील भागात घेणार.
©DR.PRADNYA DESHPANDE.
#स्तोत्र-चिंतन :भाग-१
आदि शंकराचार्यांनी अनेक स्तोत्र लिहिली आहेत. स्तोत्र शब्द स्तु (स्तव्)= स्तुती करणे या मूळ धातू पासून तयार झालाय. स्तोत्र म्हणजे स्तुती करण्याचे साधन.
स्तोत्र ,नेत्र ,गात्र,वक्त्र,जनित्र,यंत्र,मंत्र हे शब्द एका प्रक्रियेने तयार झालेय.यावर मी आधी शब्दचिंतन लिहिलेय. असो.
मला काही स्तोत्र ,अभंग ,कविता आतून प्रेरणा देतात ,निराशेतून बाहेर काढतात ,किंवा अत्यानंदात सावरतात ,माझ्यातल्या मला चिदानंदित करतात. त्यापैकी आदिशंकराचार्यांचे "निर्वाणषटकम् किंवा आत्मषटकम् " हे एक आहे.
श्री श्री रविशंकरांच्या उपासनापरंपरेत अतिशय आर्त नि हार्द गायलेय हे स्तोत्र.
त्यातील एकेका शब्दात इतका खोल अर्थ आहे किंवा सखोल समजून घेऊन ते स्तोत्र ऐकले तर खरोखर 'ब्रह्मानंदी टाळी' हमखास लागते.
मी जेव्हाही काही लिहिते ते माझ्या आनंदानुभूतीतूनच ."सद्यपरनिवृत्तिये" हाच एकमेव हेतू लेखनाचा. त्यातून इतरांना फायदा झाला तर सोन्याहून पिवळे. बाकी आनंदच आनंद.
या लेखमालेत "आत्मषटकम्" मला जसे समजले ,उमजले ,माझ्यात रुजले ते मांडणार आहे.
श्लोक (१)
मनो बुद्ध्यहंकार चित्तानि नाहं
न च श्रोत्रजिव्हे न च घ्राण नेत्रे
न व्योमन् न भूमिर्न तेजो न वायु:
चिदानंद रूप: शिवोsहं शिवोsहं ॥१॥
अर्थ =चार आन्तश्चतुष्टय म्हणजे मन ,बुद्धी, अहंकार, चित्त . हे चार इंद्रिय म्हणजे 'मी' नाही.
कान ,जीभ ,नाक, डोळे हे ज्ञानेंद्रिय म्हणजे 'मी' नाही. आकाश -पृथ्वी-तेज-वायु ही महाभूते म्हणजे 'मी 'नाही . तर 'मी' चित् आनंद रूप शिव आहे. मी शिव आहे.
स्पष्टीकरण..
आध्यात्मिक-आधिभौतिक व ज्ञानेंद्रिय म्हणजे मी नाही . मी तर एक वैश्विक-चिरंतर-चिन्मय परमात्मा आहे. मी परमतत्त्व शिव आहे.
बस ,या एका अोळीने आपल्यातल्या एकटेपणाची -असहायतेची-मरगळलेपणाची-अगतिकतेची भावना पूर्ण नष्ट होते.त्या वैश्विक शक्तीशी सरळ जोडले जातो. त्याच वेळी वरच्या पंक्तीतींचे मनन केले की उगाचचा वाढलेला अहं नष्ट होतो. "मी" करतो ,माझ्यामुळे हे झालं ,माझ्याशिवाय पान हलत नाही वगैरे वगैरेतील फोलपणा सहज लक्षात येतो. अकारण कर्तृत्वभाव सरतो.तटस्थभाव-साक्षीभाव वाढतो.
पुढचे श्लोक पुढील भागात घेणार.
©DR.PRADNYA DESHPANDE.
No comments:
Post a Comment