#दोन श्रुतकथा .
(१) एकदा मराठीच्या अध्यापकांच्या समोर प्राचार्य राम शेवाळकर उद्बोधन करीत होते. एका अध्यापिका ने प्रश्न विचारला की ," मराठीमध्ये डिस्टिंक्शन कां मिळत नाही ?" त्यावर शेवाळकरांनी उत्तर दिले, " तुम्ही देत नाहीत म्हणून !"
(२) दुसरी घटना अशी आहे की नागपूर विद्यापीठात बरेच वर्ष मराठी MA ला बी प्लस ग्रेड ने उत्तीर्ण झालेल्या व्यक्तीला विशिष्ट पुरस्कार मिळायचा. अनेक वर्ष तो पुरस्कार मिळविणारी व्यक्ती विद्यापीठाला लाभत नव्हती.
नंतर काही वर्षांनी यूजीसीचे नियम बदलले . 55 टक्के च्यावर गुण असल्याशिवाय नेट सेट परीक्षेला पात्र ठरणार नाही . ही अट आली आणि कशी काय जादू झाली , माहिती नाही . पण 55 च्या खाली गुण मिळविणारे आताशा कमी झालेले आहेत. किंबहुना ७५% च्या वर अधिक आढळतात.
या दोन घटना ! यावर भाष्य काय करायचे ?
एकंदरीतच फक्त बोर्डाचे रिझल्ट , इतकच नाही तर केजी टु पीजी अशा सर्वच परीक्षांचे रिझल्ट याकडे फार वेगळ्या पद्धतीने बघाणे गरजेचे होत आहे. किमान शिक्षकांनी तरी गुणवत्ता ही फक्त मार्क ओरिएंटेड राहणार नाही , याची दक्षता घ्यावी की काळाचा महिमा म्हणून सोडून द्यावे ? ज्याचे त्याच्या परी . नव्या धोरणाकडे आशेने बघावे. आशा बलियसी !
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
No comments:
Post a Comment