१७.३.२०१७
१७.३.२०१७
#सहजोक्त..૪
भगवान् गौतम बुद्ध ,बौद्ध धर्माची स्थापना करून प्रचार-प्रसार करीत आयुष्यभर फिरत होते.
तत्कालिन बोलीभाषा(मागधी) हीच त्यांची धर्मप्रसाराची भाषा होती.
त्यांनी आपल्या नंतर उत्तराधिकार भीक्खुसंघाला दिले होते. दुर्दैवाने त्यांच्या हयातीतच त्यांच्या धर्माचे अनेक पंथ झाले होते. त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर वेगवेगळ्या भिख्खुंच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या.प्रौढवयात प्रवज्जित झालेल्या एका भिक्खुने तर म्हटले की," बरे झाले गेले ते ,फार कडक नियमांनी जाच करायचे ते".
हे वाक्य भगवान् बुद्धांच्या निस्सीम अनुयायाने ऐकले त्याच्या मनात पुढचे भीषण भविष्य दिसू लागले. त्याने त्यावेळी सगळ्या अर्हतांना एकत्र बोलावले.आणि भगवान बुद्धाचे जे जे म्हणून उपदेश होते ते सर्वानुमते बहुमताने लिखित स्वरूपात साठवण्याचे काम सुरु केले. यालाच *प्रथमधर्मसंगति* असे म्हणतात.आणि यातून जे साहित्य लिहिल्य गेले ते *त्रिपिटक* होय.
इकडे धम्मसंगायन सुरु होते नि तिकडे एक अर्हत मुक्त फिरत होता. त्याला कोणीतरी सांगितले की ,"तू जा .तिकडे ते काम करत आहेत." त्यावर तो म्हणाला "त्यांना काय करायचे ते त्यांनी करावे .मी मात्र मला जे बुद्ध समजले तसाच आचरण करीन.ते बरोबर असतील पण मी माझ्याच पद्धतीने वागीन."
इतका मोकळे पणा ,खरे खुरे व्यक्तिस्वातंत्र्य त्या काळी समाजात रुजले होते.
आताही हे शक्य नाही कां?
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
१७.३.२०१७
#सहजोक्त..૪
भगवान् गौतम बुद्ध ,बौद्ध धर्माची स्थापना करून प्रचार-प्रसार करीत आयुष्यभर फिरत होते.
तत्कालिन बोलीभाषा(मागधी) हीच त्यांची धर्मप्रसाराची भाषा होती.
त्यांनी आपल्या नंतर उत्तराधिकार भीक्खुसंघाला दिले होते. दुर्दैवाने त्यांच्या हयातीतच त्यांच्या धर्माचे अनेक पंथ झाले होते. त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर वेगवेगळ्या भिख्खुंच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या.प्रौढवयात प्रवज्जित झालेल्या एका भिक्खुने तर म्हटले की," बरे झाले गेले ते ,फार कडक नियमांनी जाच करायचे ते".
हे वाक्य भगवान् बुद्धांच्या निस्सीम अनुयायाने ऐकले त्याच्या मनात पुढचे भीषण भविष्य दिसू लागले. त्याने त्यावेळी सगळ्या अर्हतांना एकत्र बोलावले.आणि भगवान बुद्धाचे जे जे म्हणून उपदेश होते ते सर्वानुमते बहुमताने लिखित स्वरूपात साठवण्याचे काम सुरु केले. यालाच *प्रथमधर्मसंगति* असे म्हणतात.आणि यातून जे साहित्य लिहिल्य गेले ते *त्रिपिटक* होय.
इकडे धम्मसंगायन सुरु होते नि तिकडे एक अर्हत मुक्त फिरत होता. त्याला कोणीतरी सांगितले की ,"तू जा .तिकडे ते काम करत आहेत." त्यावर तो म्हणाला "त्यांना काय करायचे ते त्यांनी करावे .मी मात्र मला जे बुद्ध समजले तसाच आचरण करीन.ते बरोबर असतील पण मी माझ्याच पद्धतीने वागीन."
इतका मोकळे पणा ,खरे खुरे व्यक्तिस्वातंत्र्य त्या काळी समाजात रुजले होते.
आताही हे शक्य नाही कां?
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
आजच्याही काळात हे अनुकरणीय आहे, हे नक्की !
ReplyDelete🙏
ReplyDelete