#अक्षर-शब्द-अर्थ-उच्चार वगैरे.
भाषा म्हणजे बोलण्याचे साधन.याचा सरळ अर्थ ध्वनि हे भाषेचे प्राथमिक रूप आहे. उच्चारण म्हणजे ध्वनिप्रकटीकरणाचे साधन .
जगात अनेक भाषा आहेत म्हणजे जगात अनेक उच्चारण पण आहे.हे उच्चारण कसे असावे? हेच त्या त्या भाषेचे वैशिष्ट्य ठरते.
ध्वनीच्या चिन्हांना लिपी म्हणतात. कोणता ध्वनी कसा असावा ,याचे निकष ठरले आहेत.
कोणी ठरविले ? याचे उत्तर ,परंपरेने ,हेच येईल. लिपीद्वारे अक्षर दर्शविल्या जातात.
स्वर-व्यंजन असे अक्षरांचे मुख्य भेद आहेत.भाषेसाठी महत्त्वाचे ठरते ते उच्चारण. अक्षरांचे उच्चारण करण्याचेही संकेत त्या त्या भाषेचे असे निश्चित असतात. व्यंजनांचे उच्चारण अर्धमात्र ,स्वरांचे पूर्ण उच्चार असतात.
स्वरांचे तीन प्रकारचे उच्चार असतात .(१)-हस्व ,(२)दीर्घ,(३)प्लूत .याचे उदाहरण देतांना कोंबड्याच्या आरवण्याचे उदाहरण देतात.
जसे कु कू कू Sss ,यातील पहिला कु -हस्व ,दुसरा कू दीर्घ नि तिसरा कू SSS प्लूत असतो.
याही पेक्षा वेगळा भेदप्रकार आहे. तो म्हणजे उदात्त-अनुदात्त-स्वरित.
गाण्याच्या पेटीतून तारसप्तक-मंद्रसप्तक-मध्यसप्तक असतात ना तसे.साध्या भाषेत वरची-खालची-मधली पट्टी म्हणजे उच्चारण स्थान जरी तेच असले तरी प्रत्येकाची पट्टी वेगळी असते.
या शिवाय कोणी सानुनासिक(म्हणजे नाकातून) उच्चार करतो तर कोणी अननुनासिक (साधा) उच्चार करतो.
गवयांचे उदाहरण बघू त्याने लवकर स्पष्ट होईल. पंडित नरेंद्र चंचल यांचे "चलो बुलावा आया है माता ने बुलाया है....."गाणं आठवा. ते उदात्त उच्चाराचे उदाहरण म्हणता येईल . गझल मध्ये वा शास्त्रीय संगीतात खालची पट्टी येते. मुकेश वा हिमेश रेशमिया ,बेगम अख्तर ,सलमा आगा यांचे आवाज सानुनासिक आहेत.
अशाप्रकारे उच्चारणाचे हे भेद तसे ढोबळच म्हणावेत. या पलीकडे प्रत्येकाचे स्वत:चे थोडे थोडे भेद यामुळे उच्चारण वैशिष्ट्यपूर्ण ठरते.
खरं तर जिभेला वळण लागण्याच्या वयात हे बारकावे प्रयत्नपूर्वक ऐकवावेत .त्यामुळे नवी पिढी कान तयार होऊन नीट उच्चारण करतील.
शिक्षणाचे उद्दिष्ट पोटापाण्याची सोय व्हावी हे तर असावेच पण "सत्यं-शिवं-सुंदरम् सुद्धा असावे ना!
-हस्व-दीर्घ हे लिपीत दाखविण्यात येतात. याचे अौचित्य बरेचदा लक्षात येत नाही. वरवर बघता कशाला हवेत असे उच्चारभेद असे वाटणे स्वाभाविक आहे. कारण पाया पक्का नाही.
-
-उदाहरण बघा. "भीती" हा शब्द समजा -हस्व उच्चारला तर काय ?संदर्भाने कळतोच ना ! असे म्हणता येईल. पण उच्चारून पाहिले तर लघु उच्चार केल्यावर ती भावना पोहचत नाही. तसेच "भूत " याही शब्दाचे आहे. आता "स्वाभिमान"हा शब्द बघू. चार अक्षरी शब्द . पहिला उच्चार दीर्घ ,तिसराही दीर्घ आहे .आता दुसरापण दीर्घ उच्चार केला तर शब्दाचा डौल जातो. अनेक शब्द असे आहेत की -हस्वदीर्घामुळे मराठीत अर्थ बदलत नाही पण नाद-लय-ताल-डौल नक्की बदलतो. नीती ,नीतिमान याही शब्दात तीच गंमत आहे.
खरे उच्चार करणे म्हणजे अक्षरोच्चार नसून त्या अक्षरांतील अवकाश जपणे हे होय. प्रत्येक वर्णामध्ये जो अवकाश असतो तोच त्या वर्णाला सार्थ करतो. संगीताच्या अभ्यासातून हे अगदी स्पष्ट होते. भाषेला नाद-लय-ताल असतोच . आपण अनुश्रवणातून स्वीकारतो. जर चूकच कानावर पडले तर चूक उच्चारण होते.
ज्या ज्या व्यक्तींना तोंड-जीभ-टाळू-मूर्धा-अोठ-नाक आहे ,तो हे उच्चार नीट करूच शकतो. त्याच्या ध्वनीचा पोत नि पट्टी वेगळी असली तरी साधारणत: उच्चार समान असू शकतो. पण अगदी वेगवेगळाच उच्चार होतो ,असा उच्चार जमत नाही असे म्हणणे अपूर्ण शिक्षणाचे द्योतक आहे.
संस्कारक्षमवयात उच्चारणशास्त्रचा श्रवणाभ्यास करायला पाहिजे. ते न झाल्याने पलायनवाद वाढतो. याच पलायनवादामुळे आपण ऋ,ऋॄ ,लृ ,ज्ञ,,ङ,ञ इत्यादींचे उच्चार विसरलोय ,गहाळ केलेय. (काय फरक पडतो? याच्या उत्तरासाठी वेगळा लेख लिहावा लागेल.)
कठीण-सोपे असे काहीच नसते.
जर शिकायची संधी मिळाली तर परिपूर्ण- नीट शिकायलाच पाहिजे. "तेजस्विनावधितमस्तु ,मा विद्विषावहै" ही वृत्ती कायम जपलीच पाहिजे.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
भाषा म्हणजे बोलण्याचे साधन.याचा सरळ अर्थ ध्वनि हे भाषेचे प्राथमिक रूप आहे. उच्चारण म्हणजे ध्वनिप्रकटीकरणाचे साधन .
जगात अनेक भाषा आहेत म्हणजे जगात अनेक उच्चारण पण आहे.हे उच्चारण कसे असावे? हेच त्या त्या भाषेचे वैशिष्ट्य ठरते.
ध्वनीच्या चिन्हांना लिपी म्हणतात. कोणता ध्वनी कसा असावा ,याचे निकष ठरले आहेत.
कोणी ठरविले ? याचे उत्तर ,परंपरेने ,हेच येईल. लिपीद्वारे अक्षर दर्शविल्या जातात.
स्वर-व्यंजन असे अक्षरांचे मुख्य भेद आहेत.भाषेसाठी महत्त्वाचे ठरते ते उच्चारण. अक्षरांचे उच्चारण करण्याचेही संकेत त्या त्या भाषेचे असे निश्चित असतात. व्यंजनांचे उच्चारण अर्धमात्र ,स्वरांचे पूर्ण उच्चार असतात.
स्वरांचे तीन प्रकारचे उच्चार असतात .(१)-हस्व ,(२)दीर्घ,(३)प्लूत .याचे उदाहरण देतांना कोंबड्याच्या आरवण्याचे उदाहरण देतात.
जसे कु कू कू Sss ,यातील पहिला कु -हस्व ,दुसरा कू दीर्घ नि तिसरा कू SSS प्लूत असतो.
याही पेक्षा वेगळा भेदप्रकार आहे. तो म्हणजे उदात्त-अनुदात्त-स्वरित.
गाण्याच्या पेटीतून तारसप्तक-मंद्रसप्तक-मध्यसप्तक असतात ना तसे.साध्या भाषेत वरची-खालची-मधली पट्टी म्हणजे उच्चारण स्थान जरी तेच असले तरी प्रत्येकाची पट्टी वेगळी असते.
या शिवाय कोणी सानुनासिक(म्हणजे नाकातून) उच्चार करतो तर कोणी अननुनासिक (साधा) उच्चार करतो.
गवयांचे उदाहरण बघू त्याने लवकर स्पष्ट होईल. पंडित नरेंद्र चंचल यांचे "चलो बुलावा आया है माता ने बुलाया है....."गाणं आठवा. ते उदात्त उच्चाराचे उदाहरण म्हणता येईल . गझल मध्ये वा शास्त्रीय संगीतात खालची पट्टी येते. मुकेश वा हिमेश रेशमिया ,बेगम अख्तर ,सलमा आगा यांचे आवाज सानुनासिक आहेत.
अशाप्रकारे उच्चारणाचे हे भेद तसे ढोबळच म्हणावेत. या पलीकडे प्रत्येकाचे स्वत:चे थोडे थोडे भेद यामुळे उच्चारण वैशिष्ट्यपूर्ण ठरते.
खरं तर जिभेला वळण लागण्याच्या वयात हे बारकावे प्रयत्नपूर्वक ऐकवावेत .त्यामुळे नवी पिढी कान तयार होऊन नीट उच्चारण करतील.
शिक्षणाचे उद्दिष्ट पोटापाण्याची सोय व्हावी हे तर असावेच पण "सत्यं-शिवं-सुंदरम् सुद्धा असावे ना!
-हस्व-दीर्घ हे लिपीत दाखविण्यात येतात. याचे अौचित्य बरेचदा लक्षात येत नाही. वरवर बघता कशाला हवेत असे उच्चारभेद असे वाटणे स्वाभाविक आहे. कारण पाया पक्का नाही.
-
-उदाहरण बघा. "भीती" हा शब्द समजा -हस्व उच्चारला तर काय ?संदर्भाने कळतोच ना ! असे म्हणता येईल. पण उच्चारून पाहिले तर लघु उच्चार केल्यावर ती भावना पोहचत नाही. तसेच "भूत " याही शब्दाचे आहे. आता "स्वाभिमान"हा शब्द बघू. चार अक्षरी शब्द . पहिला उच्चार दीर्घ ,तिसराही दीर्घ आहे .आता दुसरापण दीर्घ उच्चार केला तर शब्दाचा डौल जातो. अनेक शब्द असे आहेत की -हस्वदीर्घामुळे मराठीत अर्थ बदलत नाही पण नाद-लय-ताल-डौल नक्की बदलतो. नीती ,नीतिमान याही शब्दात तीच गंमत आहे.
खरे उच्चार करणे म्हणजे अक्षरोच्चार नसून त्या अक्षरांतील अवकाश जपणे हे होय. प्रत्येक वर्णामध्ये जो अवकाश असतो तोच त्या वर्णाला सार्थ करतो. संगीताच्या अभ्यासातून हे अगदी स्पष्ट होते. भाषेला नाद-लय-ताल असतोच . आपण अनुश्रवणातून स्वीकारतो. जर चूकच कानावर पडले तर चूक उच्चारण होते.
ज्या ज्या व्यक्तींना तोंड-जीभ-टाळू-मूर्धा-अोठ-नाक आहे ,तो हे उच्चार नीट करूच शकतो. त्याच्या ध्वनीचा पोत नि पट्टी वेगळी असली तरी साधारणत: उच्चार समान असू शकतो. पण अगदी वेगवेगळाच उच्चार होतो ,असा उच्चार जमत नाही असे म्हणणे अपूर्ण शिक्षणाचे द्योतक आहे.
संस्कारक्षमवयात उच्चारणशास्त्रचा श्रवणाभ्यास करायला पाहिजे. ते न झाल्याने पलायनवाद वाढतो. याच पलायनवादामुळे आपण ऋ,ऋॄ ,लृ ,ज्ञ,,ङ,ञ इत्यादींचे उच्चार विसरलोय ,गहाळ केलेय. (काय फरक पडतो? याच्या उत्तरासाठी वेगळा लेख लिहावा लागेल.)
कठीण-सोपे असे काहीच नसते.
जर शिकायची संधी मिळाली तर परिपूर्ण- नीट शिकायलाच पाहिजे. "तेजस्विनावधितमस्तु ,मा विद्विषावहै" ही वृत्ती कायम जपलीच पाहिजे.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
खूप सुंदर....तांत्रिक विषय अगदी अलगद हाताळलायस गं!
ReplyDeleteधन्यवाद ,मुधा
ReplyDeleteउत्तम लेख प्रज्ञाताई। आपण मुंबईत राहता का?
ReplyDeleteनागपुर.धन्यवाद
ReplyDeleteनागपुर
ReplyDeleteखूप छान, समर्पक आणि प्रभावी
ReplyDeleteसुंदर विचार
ReplyDeleteआणखी वरील प्रकारचे लेख असतील तर कृपया पाठवावेत
सुंदर विचार
ReplyDeleteआणखी वरील प्रकारचे लेख असतील तर कृपया पाठवावेत