११.३.२०१७
#स्तोत्रचिन्तन : -२
न च प्राणसंज्ञो न वै पञ्चवायु:
न वा सप्तधातु: न वा पञ्चकोश:
न वाक्पाणिपादं न चोपस्थपायु:
चिदानन्दरूप: शिवोSहं शिवोSहम् ॥२॥
न मे द्वेषरागौ न मे लोभमोहौ
मदो नैव मे नैव मात्सर्यभाव:
न धर्मो न चार्थो न कामो न मोक्ष:
चिदानन्दरूप: शिवोSहं शिवोSहम्॥३॥
अर्थ-
अर्थाच्या दृष्टीने स्तोत्र सोपेच आहे. अनुभूती कठिण आहे ,प्रतीती सोपी आहे.
मी (फक्त) प्राणसंज्ञक नाही.पंचप्राण प्रसिद्ध आहेत.
श्रोत्र-नेत्र-वक्त्र-घ्राण-मन म्हणजेच प्राण .
पंच वायु म्हणजे मी नाही.
प्राण-अपान-समान-व्यान-उदान हेच ते पाच वायू जे शरीराला सक्रिय ठेवतात.
शरीराला धारण करणारे तत्त्व म्हणजे धातू. ते सात प्रकारचे आहेत.रस-रक्त-मांस-मेद-अस्थी-मज्जा-शुक्र , हे सात धातू म्हणजे मी नाही.
अन्नमय-मनोमय-प्राणमय-विज्ञानमय-आनंदमय- कोश हेच ते पाच कोश. (आधीच्या चिंतनात यावर सविस्तर लिहिलेय.) हे पाच कोश म्हणजे मी नाही.
वाणी-हात-पाय-जननेंद्रिय-गुदद्वार हे पाच कर्मेंद्रिय म्हणजे मी नाही.
श्लोक एक व दोन मध्ये शरीर-इंद्रियादि अवयव म्हणजे मी नव्हे . हे स्पष्ट केलेय.या सगळ्यांच्या पलीकडे जे चिदानंद रूपी परमतत्त्व शिव आहे ,तेच मी आहे.
आता तिस-या श्लोकात मला षड्रिपु नाहीत आणि चार पुरुषार्थ म्हणजे मी (जीवात्मा) नाही .
द्वेष-राग-लोभ-मोह-मद-मत्सर हे सहा शत्रू म्हणजे नकारात्मकभाव यांच्या पार मी आहे.
तसेच धर्म-अर्थ-काम-मोक्ष हे चार पुरुषार्थ म्हणजे मी नाही.
या श्लोकात शरीराच्या आतील मानवीभावना व मानवी कर्तव्य यांच्या पलीकडे "मी" आहे ,हे सांगितले आहे.
ज्यामुळे मानवी जीवन गुंतागुंतीचे ,तणावाचे होते; त्या नकारात्मकभावना म्हणजे मी नाही .हे समजणे व त्यानुसार वर्तन करणे हे महत्वाचे.
साक्षात् शंकराचार्यांचा हा श्लोक असल्यामुळे त्यांत त्यांच्या प्रत्यक्ष अनुभूतीचा भाग आहे. आपण मात्र "काशीस जावे नित्य वदावे" सारखे मनापासून अलिप्त-तटस्थ रहाण्याचा प्रयत्न करावा.
त्याच वेळी त्या परमतत्त्वाशी सतत अनुसंधान ठेवावे.
सारखे "चिदानन्दरूप: शिवोSहं शिवोSहम्" असे मनाला बजावत रहावे.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
#स्तोत्रचिन्तन : -२
न च प्राणसंज्ञो न वै पञ्चवायु:
न वा सप्तधातु: न वा पञ्चकोश:
न वाक्पाणिपादं न चोपस्थपायु:
चिदानन्दरूप: शिवोSहं शिवोSहम् ॥२॥
न मे द्वेषरागौ न मे लोभमोहौ
मदो नैव मे नैव मात्सर्यभाव:
न धर्मो न चार्थो न कामो न मोक्ष:
चिदानन्दरूप: शिवोSहं शिवोSहम्॥३॥
अर्थ-
अर्थाच्या दृष्टीने स्तोत्र सोपेच आहे. अनुभूती कठिण आहे ,प्रतीती सोपी आहे.
मी (फक्त) प्राणसंज्ञक नाही.पंचप्राण प्रसिद्ध आहेत.
श्रोत्र-नेत्र-वक्त्र-घ्राण-मन म्हणजेच प्राण .
पंच वायु म्हणजे मी नाही.
प्राण-अपान-समान-व्यान-उदान हेच ते पाच वायू जे शरीराला सक्रिय ठेवतात.
शरीराला धारण करणारे तत्त्व म्हणजे धातू. ते सात प्रकारचे आहेत.रस-रक्त-मांस-मेद-अस्थी-मज्जा-शुक्र , हे सात धातू म्हणजे मी नाही.
अन्नमय-मनोमय-प्राणमय-विज्ञानमय-आनंदमय- कोश हेच ते पाच कोश. (आधीच्या चिंतनात यावर सविस्तर लिहिलेय.) हे पाच कोश म्हणजे मी नाही.
वाणी-हात-पाय-जननेंद्रिय-गुदद्वार हे पाच कर्मेंद्रिय म्हणजे मी नाही.
श्लोक एक व दोन मध्ये शरीर-इंद्रियादि अवयव म्हणजे मी नव्हे . हे स्पष्ट केलेय.या सगळ्यांच्या पलीकडे जे चिदानंद रूपी परमतत्त्व शिव आहे ,तेच मी आहे.
आता तिस-या श्लोकात मला षड्रिपु नाहीत आणि चार पुरुषार्थ म्हणजे मी (जीवात्मा) नाही .
द्वेष-राग-लोभ-मोह-मद-मत्सर हे सहा शत्रू म्हणजे नकारात्मकभाव यांच्या पार मी आहे.
तसेच धर्म-अर्थ-काम-मोक्ष हे चार पुरुषार्थ म्हणजे मी नाही.
या श्लोकात शरीराच्या आतील मानवीभावना व मानवी कर्तव्य यांच्या पलीकडे "मी" आहे ,हे सांगितले आहे.
ज्यामुळे मानवी जीवन गुंतागुंतीचे ,तणावाचे होते; त्या नकारात्मकभावना म्हणजे मी नाही .हे समजणे व त्यानुसार वर्तन करणे हे महत्वाचे.
साक्षात् शंकराचार्यांचा हा श्लोक असल्यामुळे त्यांत त्यांच्या प्रत्यक्ष अनुभूतीचा भाग आहे. आपण मात्र "काशीस जावे नित्य वदावे" सारखे मनापासून अलिप्त-तटस्थ रहाण्याचा प्रयत्न करावा.
त्याच वेळी त्या परमतत्त्वाशी सतत अनुसंधान ठेवावे.
सारखे "चिदानन्दरूप: शिवोSहं शिवोSहम्" असे मनाला बजावत रहावे.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
This explanation,if explained in hindi as well can benefit lots of seekers.please provide hindi also option of all knowledge that you decide to share.jai ho uh uh
ReplyDelete