६.३.२०१७
#चिंतन
भाषा मग ती कोणतीही असो . तिचे स्तर असतात, बाळबोध पासून ते प्रगल्भ पर्यंत. सामान्य लोकं प्रगल्भ भाषेला कठिण-क्लिष्ट-व्याकरण प्रचुर समजतात.मुळात प्रत्येकाने भाषाशिक्षणाची सुरवात स्वत:च्या स्तरातून करावी नि विकसित होत होत प्रौढभाषा नक्की योजावी. याने मेंदूचा विकास होतो.
आज टूमच निघालीय की व्याकरण/-हस्वदीर्घ नकोच . संस्कृतप्रवण नको.इतर भाषा चालतील वगैरे. हा विचार अगदीच चूक आहे असे मला नाही वाटत ,कारण प्रत्येकाचा भाषिकस्तर. प्राथमिकस्तरावरील लोकांना दैनंदिन जीवन जगताना खरोखर प्रौढ भाषेची गरजच नाही.
त्यांच्यासाठी सोपी ,वाच्यार्थयुक्त ,कमीतकमी व्याकरणाची ,व्यवहाराला सोयीची भाषाच असणे गरजेचे आहे.शेकडा नव्वद टक्के लोकांना अशाच भाषेची आवश्यकता असते .
दहा टक्के लोकांना प्रौढ-प्रगल्भ भाषा येते ,समजते .ते तीच भाषा योजतात.
"त्यांनीपण आमच्यासारखे बाळबोध बोलावे ,लिहावे .प्रौढभाषा असूच नये.अमूक एका भाषेच्या प्रभावाने आलेले व्याकरण कठीण म्हणून सरसकट काढूनच टाकावेे " हे म्हणणे अतिरेकीपणा होय.
व्याकरण ,प्रौढशब्द योजना यामुळे बौद्धिकविकास होतो. लहान वयात उंची कमी असेल तर उंच काठीवर लटकण्याचा व्यायाम सांगतात. ज्याची उंची कमी असते त्याला अशा लटकण्याचा पहिले त्रासच होतो.पण ताणाशिवाय स्नायु ताणले जात नाही नि उंची वाढत नाही. तसेच भाषिकविकासासाठी साध-सोप-सरळ हे सुरवातीला ठिक आहे .बौद्धिकताण देणे भाषिक विकासासाठी अनिवार्य आहे. बौद्धिकताण व्याकरणातून ,भाषाशास्त्रातून येतो. तो गरजेचा आहेच. बरेचदा शिकणारा -शिकविणारा यांच्यातील अपूर्ण शिक्षणक्रियेमुळे "कठिणता" वाढते.त्याचा दोष सरळ त्या भाषेवर टाकणे समंजसपणाचे लक्षण नाही.
"व्यक्तीचा परिपूर्ण विकास" हेच शिक्षणाचे ध्येय असावे. पण प्रत्येकाच्या परिपूर्णतेला त्याची वैयक्तिक पात्रता असावी लागते हेही लक्षात घेतले पाहिजे.मला येत नाही मग ते कोणालाच नको ही समता नव्हे .विकासाचे दार प्रत्येकासाठी खुले ठेवावे .कोणी अधिक विकसित असेल तर त्याची प्रगती खटकण्या इतकी मनाची गरीबी नसावी.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
#चिंतन
भाषा मग ती कोणतीही असो . तिचे स्तर असतात, बाळबोध पासून ते प्रगल्भ पर्यंत. सामान्य लोकं प्रगल्भ भाषेला कठिण-क्लिष्ट-व्याकरण प्रचुर समजतात.मुळात प्रत्येकाने भाषाशिक्षणाची सुरवात स्वत:च्या स्तरातून करावी नि विकसित होत होत प्रौढभाषा नक्की योजावी. याने मेंदूचा विकास होतो.
आज टूमच निघालीय की व्याकरण/-हस्वदीर्घ नकोच . संस्कृतप्रवण नको.इतर भाषा चालतील वगैरे. हा विचार अगदीच चूक आहे असे मला नाही वाटत ,कारण प्रत्येकाचा भाषिकस्तर. प्राथमिकस्तरावरील लोकांना दैनंदिन जीवन जगताना खरोखर प्रौढ भाषेची गरजच नाही.
त्यांच्यासाठी सोपी ,वाच्यार्थयुक्त ,कमीतकमी व्याकरणाची ,व्यवहाराला सोयीची भाषाच असणे गरजेचे आहे.शेकडा नव्वद टक्के लोकांना अशाच भाषेची आवश्यकता असते .
दहा टक्के लोकांना प्रौढ-प्रगल्भ भाषा येते ,समजते .ते तीच भाषा योजतात.
"त्यांनीपण आमच्यासारखे बाळबोध बोलावे ,लिहावे .प्रौढभाषा असूच नये.अमूक एका भाषेच्या प्रभावाने आलेले व्याकरण कठीण म्हणून सरसकट काढूनच टाकावेे " हे म्हणणे अतिरेकीपणा होय.
व्याकरण ,प्रौढशब्द योजना यामुळे बौद्धिकविकास होतो. लहान वयात उंची कमी असेल तर उंच काठीवर लटकण्याचा व्यायाम सांगतात. ज्याची उंची कमी असते त्याला अशा लटकण्याचा पहिले त्रासच होतो.पण ताणाशिवाय स्नायु ताणले जात नाही नि उंची वाढत नाही. तसेच भाषिकविकासासाठी साध-सोप-सरळ हे सुरवातीला ठिक आहे .बौद्धिकताण देणे भाषिक विकासासाठी अनिवार्य आहे. बौद्धिकताण व्याकरणातून ,भाषाशास्त्रातून येतो. तो गरजेचा आहेच. बरेचदा शिकणारा -शिकविणारा यांच्यातील अपूर्ण शिक्षणक्रियेमुळे "कठिणता" वाढते.त्याचा दोष सरळ त्या भाषेवर टाकणे समंजसपणाचे लक्षण नाही.
"व्यक्तीचा परिपूर्ण विकास" हेच शिक्षणाचे ध्येय असावे. पण प्रत्येकाच्या परिपूर्णतेला त्याची वैयक्तिक पात्रता असावी लागते हेही लक्षात घेतले पाहिजे.मला येत नाही मग ते कोणालाच नको ही समता नव्हे .विकासाचे दार प्रत्येकासाठी खुले ठेवावे .कोणी अधिक विकसित असेल तर त्याची प्रगती खटकण्या इतकी मनाची गरीबी नसावी.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
मस्त मांडणी मॅडम ����
ReplyDelete🙏
ReplyDelete