चकवा
आमच्या लहानपणी खेड्यातल्या स्त्रिया , उन्हाळ्यात शेतावरची कामे कमी झाल्यामुळे, जंगलातील रानमेवा गोळा करायला जायच्या . उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यामुळे आम्ही देखील खेड्यात असायचो.
एखाद वेळेस त्यातील एखादी बाई घरी यायची आईशी गप्पा मारायला किंवा काही विचारपूस करायला.
नव्वद टक्के आदिवासी गाव ते. भुताखेत , करणी , जादुटोणा , आग्यावेताळ अशा गोष्टी खुप सांगायच्या तेव्हाच्या खेड्यातल्या म्हाता-या आजीबाई.
जंगलात जाणा-या या मध्यमवयीन बाया देखील 'जंगलात चकवा आहे' , असं सांगायच्या. त्या गोष्टी ऐकताना मजा वाटायची पण भयंकर भीतीही वाटायची. आईला सांगत असलेले किस्से आम्ही पूर्ण कान देऊन ऐकायचो. एखादा शब्द कळाला नाही की मध्येच विचारायचो. आई खूपदा रागवायची की मोठ्यांमध्ये बसू नये. पण परत आईच्या पदराशी बसून ऐकत रहायचे , हीपण करमणूकच होती.
एका बाईने सांगितले की ," जंगलात एका जणाला चकवा लागला न् तो त्याच्या मागेच जाऊ लागला . मग तो गायब झाला . काही दिवसांनी तो माणूस पांढराफट्ट होऊन जंगलात मेलेला दिसला ".
हे सगळं ऐकल्यानंतर आईला विचारलं की चकवा काय असतो ? आईने त्यावेळी काही तरी उत्तर दिले. पुढे शाळेत गेल्यावर पुस्तकं वाचू लागले अर्थात अभ्यासाचे नाहीच . कथा-कादंब-यांतून चकवा , भुलवा वगैरे गोष्टी वाचू लागली. न् या अज्ञात गोष्टींची अनामिक भीती सुप्त मनात बसून गेली.
पुढे शिक्षण , संसार , नोकरी यांच्या चक्रात आकंठ बुडले न् तो अज्ञात भीतीचा चकवा बाजूला पडला , असं वाटलं. सध्या मनन-चिंतन करण्यासाठी वेळच वेळ आहे. मग "खाली दिमाख शैतान का घर ", धावू लागले.
वास्तवात चकवा असतो कां , याची कल्पना नाही. पण मानवी मनात अत्यंत गुंतागुंतीच्या भावभावना सतत उलथापालथ करीत असतात. आयुष्य कधी सरळ सरळ समोर जाते. तर कधी आडवळणं , खाजखळगे घेत समोर जाते. कधी कधी जायचे एका मार्गाने असते , ध्येय ठरलेले असते मात्र जराश्या अनवधानाने भलत्याच मार्गाला लागतो. परतीचा मार्ग विसरतो . चुकीच्या कां होईना रस्त्यावरून सतत पुढे गेले की काही तरी प्राप्त होतंच , फरक इतका की ते इप्सित असेलच असे नाही.
पण आयुष्यात चकवा लागला तर ?? . मुळात चकवा हा भास असतो वास्तव नाही . त्यामुळे त्याच्या मायाजालात अडकल्यावर सुटकेचा मार्ग सापडणं अवघड. पण आपलं पुण्य बलवत्तर असेल , पूर्वसुकृत चांगलं असेल न् गुरुबळ पाठीशी असेल सुटका होते त्यातून . अन्यथा आयुष्यातील चकव्यात ऊर फाटेस्तोवर गुरफटून शेवट होतो जीवनाचा. माणूस संपून जातो पण नेमका चकवा कुठे लागला ? केव्हा लागला ? कशाने लागला ? समजत नाही. न् त्यामुळे "पुढच्यास ठेच मागचा शहाणा " असेही घडत नाही.
चकवाग्रस्त माणूस धावधाव धावतो पण (मंझिल ) ध्येय साध्यच होऊ शकत नाही न् शेवटी संपतो.
संसारात काही व्यक्ती , काही प्रसंग , काही लालसा मानवापुढे "चकवा" बनून येतात. पार त्यांच्यात गुरफटून टाकतात. एकामागून एक टकळी सुरूच राहाते . धापा टाकत धावत माणूस मेतकुटीला येतो पण चकवा सोडत नाही. न् हाच तो चकवा हेही कळत नाही.
अशा वेळी लॉकडाऊन (म्हणजे सर्व व्यवहार बाजूला ठेवून 'स्व' वर केंद्रित करावं ) किंवा विपश्यना करावी त्याने मन तटस्थ होते न् सूर्यप्रकाशासारखं वास्तव समोर येतं .
त्यावेळी मात्र ,"हुआ सो हुआ" किंवा "आता काय होणार , जे आहे तेच समोर रेटू" असा विचार न करता त्या त्या चकव्यातून बाहेर पडावे . आपल्या मागे लागलेल्या चकव्यात दुस-याला अोढू नये. चकव्यातून सुटण्यासाठी जराशीही दया-माया-खंत बाळगू नये. अन्यथा आयुष्य संपूनही साफल्य , श्रेय मिळणार नाही.
तर असा हा असतो आयुष्याचा चकवा.
ज्याने त्याने शोधावा न् भेदून बाहेर यावे सहीसलामत त्यातून .
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
आमच्या लहानपणी खेड्यातल्या स्त्रिया , उन्हाळ्यात शेतावरची कामे कमी झाल्यामुळे, जंगलातील रानमेवा गोळा करायला जायच्या . उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यामुळे आम्ही देखील खेड्यात असायचो.
एखाद वेळेस त्यातील एखादी बाई घरी यायची आईशी गप्पा मारायला किंवा काही विचारपूस करायला.
नव्वद टक्के आदिवासी गाव ते. भुताखेत , करणी , जादुटोणा , आग्यावेताळ अशा गोष्टी खुप सांगायच्या तेव्हाच्या खेड्यातल्या म्हाता-या आजीबाई.
जंगलात जाणा-या या मध्यमवयीन बाया देखील 'जंगलात चकवा आहे' , असं सांगायच्या. त्या गोष्टी ऐकताना मजा वाटायची पण भयंकर भीतीही वाटायची. आईला सांगत असलेले किस्से आम्ही पूर्ण कान देऊन ऐकायचो. एखादा शब्द कळाला नाही की मध्येच विचारायचो. आई खूपदा रागवायची की मोठ्यांमध्ये बसू नये. पण परत आईच्या पदराशी बसून ऐकत रहायचे , हीपण करमणूकच होती.
एका बाईने सांगितले की ," जंगलात एका जणाला चकवा लागला न् तो त्याच्या मागेच जाऊ लागला . मग तो गायब झाला . काही दिवसांनी तो माणूस पांढराफट्ट होऊन जंगलात मेलेला दिसला ".
हे सगळं ऐकल्यानंतर आईला विचारलं की चकवा काय असतो ? आईने त्यावेळी काही तरी उत्तर दिले. पुढे शाळेत गेल्यावर पुस्तकं वाचू लागले अर्थात अभ्यासाचे नाहीच . कथा-कादंब-यांतून चकवा , भुलवा वगैरे गोष्टी वाचू लागली. न् या अज्ञात गोष्टींची अनामिक भीती सुप्त मनात बसून गेली.
पुढे शिक्षण , संसार , नोकरी यांच्या चक्रात आकंठ बुडले न् तो अज्ञात भीतीचा चकवा बाजूला पडला , असं वाटलं. सध्या मनन-चिंतन करण्यासाठी वेळच वेळ आहे. मग "खाली दिमाख शैतान का घर ", धावू लागले.
वास्तवात चकवा असतो कां , याची कल्पना नाही. पण मानवी मनात अत्यंत गुंतागुंतीच्या भावभावना सतत उलथापालथ करीत असतात. आयुष्य कधी सरळ सरळ समोर जाते. तर कधी आडवळणं , खाजखळगे घेत समोर जाते. कधी कधी जायचे एका मार्गाने असते , ध्येय ठरलेले असते मात्र जराश्या अनवधानाने भलत्याच मार्गाला लागतो. परतीचा मार्ग विसरतो . चुकीच्या कां होईना रस्त्यावरून सतत पुढे गेले की काही तरी प्राप्त होतंच , फरक इतका की ते इप्सित असेलच असे नाही.
पण आयुष्यात चकवा लागला तर ?? . मुळात चकवा हा भास असतो वास्तव नाही . त्यामुळे त्याच्या मायाजालात अडकल्यावर सुटकेचा मार्ग सापडणं अवघड. पण आपलं पुण्य बलवत्तर असेल , पूर्वसुकृत चांगलं असेल न् गुरुबळ पाठीशी असेल सुटका होते त्यातून . अन्यथा आयुष्यातील चकव्यात ऊर फाटेस्तोवर गुरफटून शेवट होतो जीवनाचा. माणूस संपून जातो पण नेमका चकवा कुठे लागला ? केव्हा लागला ? कशाने लागला ? समजत नाही. न् त्यामुळे "पुढच्यास ठेच मागचा शहाणा " असेही घडत नाही.
चकवाग्रस्त माणूस धावधाव धावतो पण (मंझिल ) ध्येय साध्यच होऊ शकत नाही न् शेवटी संपतो.
संसारात काही व्यक्ती , काही प्रसंग , काही लालसा मानवापुढे "चकवा" बनून येतात. पार त्यांच्यात गुरफटून टाकतात. एकामागून एक टकळी सुरूच राहाते . धापा टाकत धावत माणूस मेतकुटीला येतो पण चकवा सोडत नाही. न् हाच तो चकवा हेही कळत नाही.
अशा वेळी लॉकडाऊन (म्हणजे सर्व व्यवहार बाजूला ठेवून 'स्व' वर केंद्रित करावं ) किंवा विपश्यना करावी त्याने मन तटस्थ होते न् सूर्यप्रकाशासारखं वास्तव समोर येतं .
त्यावेळी मात्र ,"हुआ सो हुआ" किंवा "आता काय होणार , जे आहे तेच समोर रेटू" असा विचार न करता त्या त्या चकव्यातून बाहेर पडावे . आपल्या मागे लागलेल्या चकव्यात दुस-याला अोढू नये. चकव्यातून सुटण्यासाठी जराशीही दया-माया-खंत बाळगू नये. अन्यथा आयुष्य संपूनही साफल्य , श्रेय मिळणार नाही.
तर असा हा असतो आयुष्याचा चकवा.
ज्याने त्याने शोधावा न् भेदून बाहेर यावे सहीसलामत त्यातून .
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
No comments:
Post a Comment