Friday, May 29, 2020

#सहजोक्त.



नाति धैर्यं प्रदातव्यम्
नाति भीतिश्च रोगिणि ।
नैश्चिन्त्यानादिमे दानं
नैराश्यादेव  नाऽन्तिमे ॥
 कलिविडम्बनम् नावाचे एक रंजक-काव्य , महान संस्कृत कवी  निलकंठ दीक्षित यांनी रचले आहे.
या काव्यात विडम्बनातून सामाजिकवृत्तींवर  प्रहार केला आहे.

वरील श्लोकात कवी वैद्याला(डॉक्टरला)  सांगतो , की  , " रोग्याला अतिशय जास्त धीर देऊ नये. तसेच अतिशय जास्त निराशही करू नये . पहिल्या परिस्थितीत रोगी मनातून निश्चिंत होतो न् दान (फीज) देत नाही तर शेवटच्या परिस्थितीत रोगी जगण्याची उमेदच हरवून बसतो म्हणून दान (फीज) मिळत नाही.

श्लोक तसा वैद्यांना समुपदेशन आहे. रोग्याच्या मानसिकतेला जपूनच उपचार करावा जेणे करून सतत आवक र‍हील.
हीच बाब सर्वच क्षेत्राला लागू होते ना ?
"इतकेही ताणू नये की तुटून जाईल , नि इतकेही जुळू नये की अस्तित्वच र‍हणार नाही"
खयाल अपना अपना , नसीब अपना अपना ....
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

No comments:

Post a Comment

सहजोक्त.

  . शिवी ... अबबो आता शिवीवर पण लिहायचे कां? 😊 हं! लिहिता येऊ शकते. मराठी भाषेत 'शिवी' शब्द कुठून, कसा आला असेल बरे? मराठी भाषेतील ...