#चिंतन.
महाराष्ट्रात कुठे कुठे "मराठी भाषा चळवळ" वेगाने सुरु आहे. चळवळ मग ती कशाहीसाठी असेना कां ? तिला जिवंत न् प्रवाही धार असते. संघटनेसारखी खोली न् स्थैर्य तिच्यात नसते. चालायचेच , प्रत्येकात गुणदोष असणारच .
मध्यंतरी सोशल मिडियावर "आत्म निर्भर" या शब्दावरून चर्चा झाली. मराठी चळवळीचे खंदे कार्यकर्ते असलेल्यांनी , "हा शब्द मराठी नाही" असं ठरवून मोकळे झाले.
त्यावर मी जरासा प्रतिवाद केला .
"मराठीला असं संकोचित कां करता ?
निर् +भर = भरणे , भरण , भरणी
हे शब्द याच मूळधातूपासून आहेत...
मराठीने तत्सम शब्द स्वीकारणे बंद करणे योग्य नाही. आत्म +निर्भर , आत्मनिर्भरता असे हे दोन्ही शब्द मराठीच आहेत.
पण त्यांच्या मते हा संस्कृत वा हिंदीच शब्द आहे म्हणून मराठीत तो त्याज्य ठरतो.
मग मी प्राचीन मराठी साहित्याचा दाखला दिला . सद्गुरु पासष्टी नावाचा लघुग्रंथ (श्री गुरु चरित्रातील निवडक ६५ अोळी ) मराठीत आहे , अशी सर्व वाचकांची समजूत आहे .
त्यातील एक श्लोक असा ,
"ऐसे ऐकतां राजपुत्र ।
हर्षे झाला निर्भर।
सांगतसे विस्तार ।
शिवलीला तेधवा ॥" {३५।२०६}
या श्लोकात निर्भर शब्द आला आहे , हे निदर्शनास आणून दिले.
त्यावर त्यांचे एकच तुणतुणे होते की कवितेत स्वातंत्र्य असते.
शेवटी मीच माझ्या कडून चर्चा संपवली. पण मनात चिंतन सुरू झाले.
भाषा हा एक समृद्ध मानवी वारसा असतो. अनेक शतकांचा प्रवास करून भाषेचे रूप वर्तमानात दिसत असते. मराठी ही एक भारतीय-भाषा आहे . जन्मभूमी ,जन्मभाषा यांचा अभिमान प्रत्येकाला असतो. तो असणं चूक नाही.
प्रत्येक भाषेचे काही स्तर असतात , प्राथमिक पासून प्रगल्भ , विद्वज्जड पर्यंत. प्रत्येक स्तरातील भाषा ही आपल्याच मूळ-भाषेचे रूप असते . त्यामुळे ती आपलीच भाषा असते.
दैनंदिन जीवनात सामान्य माणूस साधारणपणे प्रथम स्तरातील भाषा बोलतो. तर साहित्यानुरूप भाषेचे विविध नमुने आढळतात. हे वैविध्य म्हणजे भाषेचे दूषण नसून भूषण असतात. प्रत्येक स्तरातील भाषेचा स्वीकार व विकास करण्याची जाण असणे म्हणजे खरा भाषा-कार्यकर्ता होय.
कधी कधी एक भाषिक भूभाग दुस-या भाषिक भूभागाशी जुळलेला असतो . तेथे जरासा भाषा-संकर होतो. ते स्वाभाविक व योग्यही आहे.
मूळ भाषिक वैविध्यात अजूनच भर पडते . ' हे सर्वच वैविध्य माझ्याच भाषेचे आहे ' , हे समजणं म्हणजे भाषिक-आत्मभान होय.
भाषेच्या सर्व आवर्त-प्रत्यावर्त न् वर्तमान स्वरूपांसह तिचा अंगीकार करणं म्हणजे भाषा-प्रेमी असणं होय.
भाषेच्या विविध स्तरांचा आदर राखणे , ते स्तर समजून शिकणे , आज जास्त जरूरी आहे.
शिवाय एक मुद्दा प्रकर्षाने नमूद करावासा वाटतो की चळवळीतील भाषिकांचा भाषा-अभ्यास हवा तितका पक्का नाही. त्यांच्या बौद्धिक शब्दकोशात जे शब्द असतील तीच खरी भाषा , हा त्यांचा दुरभिमान कोणत्याही भाषेची पातळी खालवणारा ठरतो.
शिवाय शब्द-व्युत्पत्तीचे ज्ञानच नसणे , इतर भाषांचा दुस्वास करणे आदी दुर्गुण म्हणजे तर कुपमंडुकवृत्तीच होय . अशाने भाषा-सागर न होता भाषा-डबके तयार होईल की काय अशी शंका येते.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
महाराष्ट्रात कुठे कुठे "मराठी भाषा चळवळ" वेगाने सुरु आहे. चळवळ मग ती कशाहीसाठी असेना कां ? तिला जिवंत न् प्रवाही धार असते. संघटनेसारखी खोली न् स्थैर्य तिच्यात नसते. चालायचेच , प्रत्येकात गुणदोष असणारच .
मध्यंतरी सोशल मिडियावर "आत्म निर्भर" या शब्दावरून चर्चा झाली. मराठी चळवळीचे खंदे कार्यकर्ते असलेल्यांनी , "हा शब्द मराठी नाही" असं ठरवून मोकळे झाले.
त्यावर मी जरासा प्रतिवाद केला .
"मराठीला असं संकोचित कां करता ?
निर् +भर = भरणे , भरण , भरणी
हे शब्द याच मूळधातूपासून आहेत...
मराठीने तत्सम शब्द स्वीकारणे बंद करणे योग्य नाही. आत्म +निर्भर , आत्मनिर्भरता असे हे दोन्ही शब्द मराठीच आहेत.
पण त्यांच्या मते हा संस्कृत वा हिंदीच शब्द आहे म्हणून मराठीत तो त्याज्य ठरतो.
मग मी प्राचीन मराठी साहित्याचा दाखला दिला . सद्गुरु पासष्टी नावाचा लघुग्रंथ (श्री गुरु चरित्रातील निवडक ६५ अोळी ) मराठीत आहे , अशी सर्व वाचकांची समजूत आहे .
त्यातील एक श्लोक असा ,
"ऐसे ऐकतां राजपुत्र ।
हर्षे झाला निर्भर।
सांगतसे विस्तार ।
शिवलीला तेधवा ॥" {३५।२०६}
या श्लोकात निर्भर शब्द आला आहे , हे निदर्शनास आणून दिले.
त्यावर त्यांचे एकच तुणतुणे होते की कवितेत स्वातंत्र्य असते.
शेवटी मीच माझ्या कडून चर्चा संपवली. पण मनात चिंतन सुरू झाले.
भाषा हा एक समृद्ध मानवी वारसा असतो. अनेक शतकांचा प्रवास करून भाषेचे रूप वर्तमानात दिसत असते. मराठी ही एक भारतीय-भाषा आहे . जन्मभूमी ,जन्मभाषा यांचा अभिमान प्रत्येकाला असतो. तो असणं चूक नाही.
प्रत्येक भाषेचे काही स्तर असतात , प्राथमिक पासून प्रगल्भ , विद्वज्जड पर्यंत. प्रत्येक स्तरातील भाषा ही आपल्याच मूळ-भाषेचे रूप असते . त्यामुळे ती आपलीच भाषा असते.
दैनंदिन जीवनात सामान्य माणूस साधारणपणे प्रथम स्तरातील भाषा बोलतो. तर साहित्यानुरूप भाषेचे विविध नमुने आढळतात. हे वैविध्य म्हणजे भाषेचे दूषण नसून भूषण असतात. प्रत्येक स्तरातील भाषेचा स्वीकार व विकास करण्याची जाण असणे म्हणजे खरा भाषा-कार्यकर्ता होय.
कधी कधी एक भाषिक भूभाग दुस-या भाषिक भूभागाशी जुळलेला असतो . तेथे जरासा भाषा-संकर होतो. ते स्वाभाविक व योग्यही आहे.
मूळ भाषिक वैविध्यात अजूनच भर पडते . ' हे सर्वच वैविध्य माझ्याच भाषेचे आहे ' , हे समजणं म्हणजे भाषिक-आत्मभान होय.
भाषेच्या सर्व आवर्त-प्रत्यावर्त न् वर्तमान स्वरूपांसह तिचा अंगीकार करणं म्हणजे भाषा-प्रेमी असणं होय.
भाषेच्या विविध स्तरांचा आदर राखणे , ते स्तर समजून शिकणे , आज जास्त जरूरी आहे.
शिवाय एक मुद्दा प्रकर्षाने नमूद करावासा वाटतो की चळवळीतील भाषिकांचा भाषा-अभ्यास हवा तितका पक्का नाही. त्यांच्या बौद्धिक शब्दकोशात जे शब्द असतील तीच खरी भाषा , हा त्यांचा दुरभिमान कोणत्याही भाषेची पातळी खालवणारा ठरतो.
शिवाय शब्द-व्युत्पत्तीचे ज्ञानच नसणे , इतर भाषांचा दुस्वास करणे आदी दुर्गुण म्हणजे तर कुपमंडुकवृत्तीच होय . अशाने भाषा-सागर न होता भाषा-डबके तयार होईल की काय अशी शंका येते.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
No comments:
Post a Comment