Saturday, May 16, 2020

सहजोक्त

#चिंतन .

संत तुकाराम महाराज म्हणजे एक विश्वविद्यालयच होय. त्यांची अभंग गाथा म्हणजे अनेकानेक ज्ञानप्रकारांचा खजिनाच होय. मानवी स्वभावाचे हुबेहूब वर्णन करणारे , मानवी मनाचे शब्दचित्र रेखाटणारे , न् वर्तनवादाची नुसती व्याख्या न करता सोदाहरण मांडणारे तुकोबा , अद्वितीय संत आहेत.

आजकाल अलक नावाचा साहित्य प्रकार आलाय. छानच आहे तो.
जुन्या वाङ्मयात जरा वेगळ्या प्रकाराने यायचा हा प्रकार .तुकोबांचे कित्तेक अभंग असे अलक प्रकारात मोडतात.
 दोन उच्च शिक्षित , लबाड , प्रचंड स्वार्थी  न् र‍ाजकारणी माणसं एकमेकांसमोर आले तर  त्यांचा संवाद  कसा असेल ? कोण माघार घेईल ? कोण पुरून उरेल ? त्या लबाडांमुळे इतर सामान्यांचे काय होईल ? आदी   याचे सुंदर चित्र तुकोबाच्या या अभंगातून मांडले आहे.

वाघें उपदेशिला कोल्हा । सुखें खाऊं द्यावें मला॥1॥
अंतीं मरसी तें न चुके । मज ही मारितोसी भुके ॥ध्रु.॥
येरू ह्मणे भला भला । निवाड तुझ्या तोंडें जाला ॥2॥
देह तंव जाणार । घडेल हा उपकार ॥3॥
येरू ह्मणे मनीं । ऐसें जावें समजोनि ॥4॥
गांठी पडली ठका ठका । त्याचा धर्म बोले तुका ॥5॥

तत्त्त्वज्ञान निव्वळ डोक्यात ठेवले न्  त्याचा उपयोग स्वतःच्या स्वार्थासाठी केला तर काय घडते ?  हेच   वाघ-कोल्ह्याच्या रूपकातून ( अभंगातून)  कळते.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

No comments:

Post a Comment